शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आला पावसाळा, तरी टँकरने पाणीपुरवठा नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 22:35 IST

जिल्ह्यात यंदा जलसंकट अतिशय गडद झाले आहे. याकरिता टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबत ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागविण्यात आले; मात्र पावसाळ्याला सुरुवात होऊनही जिल्हा प्रशासनाच्या केवळ नियोजनाच्या दुष्काळामुळे टँकरद्वारे शहरालगतच्या ग्रामीण भागाला पाणीपुरवठा सुरू झालेला नाही.

ठळक मुद्देप्रशासनाच्या बोथट जाणिवा : ग्रामपंचायतींचे प्रस्ताव धूळ खात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात यंदा जलसंकट अतिशय गडद झाले आहे. याकरिता टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबत ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागविण्यात आले; मात्र पावसाळ्याला सुरुवात होऊनही जिल्हा प्रशासनाच्या केवळ नियोजनाच्या दुष्काळामुळे टँकरद्वारे शहरालगतच्या ग्रामीण भागाला पाणीपुरवठा सुरू झालेला नाही.गतवर्षी ६५ ते ७० टक्के इतका अत्यल्प पाऊस झाला. याचाच परिणाम जिल्ह्यातील लघु आणि मध्यम जलाशयांमध्ये पुरेसा जलसंचय नाही. यामुळेच शहरात आणि ग्रामीण भागात अनुक्रमे पाच ते सहा आणि १५ दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. दुसरीकडे शहरातील आणि लगतच्या ग्रामीण भागातील विहिरी, कूपनलिका, विंधन विहिरींनाही कोरड पडली आहे. त्यामुळे जलसंकट अतिशय तीव्र झाले आहे. यामुळे पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत नागरिकांची पाण्याकरिता दाहीदिशा भटकंती पाहायला मिळते. अनेक जण दुचाकी-चारचाकी वाहनाच्या माध्यमातून दूरवरून पाणी आणत असल्याचे चित्र दिसून येते. पाणी प्रश्न पेटल्याने शहरालगतच्या बहुतांश ग्रामपंचायतींकडून जिल्हा प्रशासनाकडे टँकरसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले. प्रथम जिल्हा प्रशासनाने मागविलेल्या अनेक प्रस्तावांमध्ये त्रुटी काढून ग्रामपंचायत प्रशासनाकडून सुधारित प्रस्ताव मागत वेळकाढू धोरण अवलंबिले. हे प्रस्ताव प्रशासनदरबारी टेबलांची शोभा वाढवत आहेत.शहरात टँकरद्वारे पाणीपुरवठा करणारे शंभरावर व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडून खासगीरीत्या टँकरद्वारे हव्या त्या भावात पाणीविक्री सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठ्याकरिता निविदा प्रक्रियाही राबविली. ५ ते ६ हजार लिटरच्या पाणीटँकरकरिता १२०० ते १३०० रुपये दर ठरविण्यात आला. मात्र, शासनदरापेक्षा खासगी पाणीविक्रीत अधिक फायदा होत असल्याने पाणी टँकर व्यावसायिकांनी जिल्हा प्रशासनाच्या निविदा प्रक्रियेकडे पाठ फिरविली. त्यामुळे पावसाळ्याला सुरुवात होऊनही केवळ नियोजनाचा अभाव आणि बोथट जाणिवांमुळे टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन कागदावरच राहिल्याचे बोलले जात आहे.२० जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठाशहरालगतच्या ११ ग्रामपंचायतींना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे सद्यस्थितीत पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र जलाशयात २० जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे पाण्यासाठी हाहा:कार होईल, असे पुढील चित्र आहे.निकषाचाही खोडा!जलसंकट तीव्र झाले असताना टँकरद्वारे अद्याप पाणीपुरवठा झाला नाही. याविषयी प्रशासनातीलच एका अधिकाऱ्याने मुळात ग्रामपंचायतींना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे निकषातच बसत नाही. मात्र, जनक्षोभ वाढू शकतो, याकरिता अधिकारी ही बाब स्पष्ट करीत नसल्याचे सांगितले. त्यामुळे केवळ प्रस्ताव मागवून प्रशासनाकडून वेळकाढू धोरण अवलंबिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई