शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

आला पावसाळा, तरी टँकरने पाणीपुरवठा नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 22:35 IST

जिल्ह्यात यंदा जलसंकट अतिशय गडद झाले आहे. याकरिता टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबत ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागविण्यात आले; मात्र पावसाळ्याला सुरुवात होऊनही जिल्हा प्रशासनाच्या केवळ नियोजनाच्या दुष्काळामुळे टँकरद्वारे शहरालगतच्या ग्रामीण भागाला पाणीपुरवठा सुरू झालेला नाही.

ठळक मुद्देप्रशासनाच्या बोथट जाणिवा : ग्रामपंचायतींचे प्रस्ताव धूळ खात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात यंदा जलसंकट अतिशय गडद झाले आहे. याकरिता टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबत ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागविण्यात आले; मात्र पावसाळ्याला सुरुवात होऊनही जिल्हा प्रशासनाच्या केवळ नियोजनाच्या दुष्काळामुळे टँकरद्वारे शहरालगतच्या ग्रामीण भागाला पाणीपुरवठा सुरू झालेला नाही.गतवर्षी ६५ ते ७० टक्के इतका अत्यल्प पाऊस झाला. याचाच परिणाम जिल्ह्यातील लघु आणि मध्यम जलाशयांमध्ये पुरेसा जलसंचय नाही. यामुळेच शहरात आणि ग्रामीण भागात अनुक्रमे पाच ते सहा आणि १५ दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. दुसरीकडे शहरातील आणि लगतच्या ग्रामीण भागातील विहिरी, कूपनलिका, विंधन विहिरींनाही कोरड पडली आहे. त्यामुळे जलसंकट अतिशय तीव्र झाले आहे. यामुळे पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत नागरिकांची पाण्याकरिता दाहीदिशा भटकंती पाहायला मिळते. अनेक जण दुचाकी-चारचाकी वाहनाच्या माध्यमातून दूरवरून पाणी आणत असल्याचे चित्र दिसून येते. पाणी प्रश्न पेटल्याने शहरालगतच्या बहुतांश ग्रामपंचायतींकडून जिल्हा प्रशासनाकडे टँकरसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले. प्रथम जिल्हा प्रशासनाने मागविलेल्या अनेक प्रस्तावांमध्ये त्रुटी काढून ग्रामपंचायत प्रशासनाकडून सुधारित प्रस्ताव मागत वेळकाढू धोरण अवलंबिले. हे प्रस्ताव प्रशासनदरबारी टेबलांची शोभा वाढवत आहेत.शहरात टँकरद्वारे पाणीपुरवठा करणारे शंभरावर व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडून खासगीरीत्या टँकरद्वारे हव्या त्या भावात पाणीविक्री सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठ्याकरिता निविदा प्रक्रियाही राबविली. ५ ते ६ हजार लिटरच्या पाणीटँकरकरिता १२०० ते १३०० रुपये दर ठरविण्यात आला. मात्र, शासनदरापेक्षा खासगी पाणीविक्रीत अधिक फायदा होत असल्याने पाणी टँकर व्यावसायिकांनी जिल्हा प्रशासनाच्या निविदा प्रक्रियेकडे पाठ फिरविली. त्यामुळे पावसाळ्याला सुरुवात होऊनही केवळ नियोजनाचा अभाव आणि बोथट जाणिवांमुळे टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन कागदावरच राहिल्याचे बोलले जात आहे.२० जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठाशहरालगतच्या ११ ग्रामपंचायतींना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे सद्यस्थितीत पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र जलाशयात २० जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे पाण्यासाठी हाहा:कार होईल, असे पुढील चित्र आहे.निकषाचाही खोडा!जलसंकट तीव्र झाले असताना टँकरद्वारे अद्याप पाणीपुरवठा झाला नाही. याविषयी प्रशासनातीलच एका अधिकाऱ्याने मुळात ग्रामपंचायतींना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे निकषातच बसत नाही. मात्र, जनक्षोभ वाढू शकतो, याकरिता अधिकारी ही बाब स्पष्ट करीत नसल्याचे सांगितले. त्यामुळे केवळ प्रस्ताव मागवून प्रशासनाकडून वेळकाढू धोरण अवलंबिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई