शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

नो एनआरसी; नो सीएए

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 06:00 IST

देशातील नागरिकत्व कायदा रद्द करण्याच्या मागणीकरिता बहुजन क्रांती मोर्चाने देशभरात आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाची सुरुवात २० डिसेंबरपासून झाली असून पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर ८ जानेवारीला जिल्हास्तरावर मोर्चा काढून निवेदन दिले, तर आज २९ जानेवारीला भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते.

ठळक मुद्देबंदला संमिश्र प्रतिसाद : शाळांना सुुटी, दुपारपर्यंत बाजारपेठेत शुकशुकाट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने नागरिकत्व कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या भारत बंदला वर्ध्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. यावेळी बहुजन क्रांती मोर्चाने शहरातून रॅली काढत ‘नो एनआरसी, नो सीएए’ अशा घोषणा देत बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यामुळे दुपारपर्यंत शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट होता. सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील काही शाळांनी विद्यार्थ्यांना सुटी दिली होती.देशातील नागरिकत्व कायदा रद्द करण्याच्या मागणीकरिता बहुजन क्रांती मोर्चाने देशभरात आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाची सुरुवात २० डिसेंबरपासून झाली असून पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर ८ जानेवारीला जिल्हास्तरावर मोर्चा काढून निवेदन दिले, तर आज २९ जानेवारीला भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे वर्ध्यात बहुजन क्रांती मोर्चाला इतरही पक्षासह सामाजिक संघटनांनी सहकार्य करून बंदला प्रतिसाद दिला. सकाळी आंदोलनकर्त्यांनी शहरातून रॅली काढून प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यानुसार बाजारपेठेतील काही दुकाने बंद करण्यात आली. सोबतच शहरातील पेट्रोलपंप बंद करून शाळांनाही सुटी देण्यात आली. शहरातील आॅटो, स्कूलबस, ट्रॅव्हल्स तसेच महामंडळाच्या बसही काही काळाकरिता थांबविण्यात आल्या होत्या. शहरात दिवसभर पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. शहरातील पावडे चौकात काही आंदोलनकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना पोलिसांनी आपला हिसका दाखविला. आंदोलनकर्त्यांनी केवळ धरणे आदोलनाचीच परवानगी घेतली होती. मात्र, त्यांनी शहरातून विनापरवानगी रॅली काढल्याने पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत स्थानबद्ध केले. या बंदमुळे दुपारपर्यंत शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट होता. सेवाग्राम व पवनार येथेही बंद पाळण्यात आला.देवळीत कापसाचा लिलाव खोळंबलादेवळी : येथे नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी रस्ता रोखून एनआरसीविरोधात नारेबाजी केली. या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने केले असून त्यांना विविध पक्षांसह समाजिक संघटनांचा पाठिंबा मिळाला. या आंदोलनाने दुपारी पावणेबारा वाजतापर्यंत कापसाचा लिलाव खोळंबला होता. सध्या शेतकऱ्यांची कापूस बाजारात मोठी गर्दी आहे. बुधवारी बाजारात दहा हजार क्विंटल कापसाची आवक असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी दुपारी बारा वाजता लिलाव सुरू करण्यात आला. यावेळी उपस्थित कास्तकारांनी एनआरसीबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या आंदोलनाचे नेतृत्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अयुब अली पटेल, अमोल कसनारे, देवानंद भगत तसेच नगरसेवक पवन महाजन, अब्दुल रहेमान तंवर, किरण पारिसे, बाभूळगावचे सरपंच सचिन बोबडे, प्रमोद ठाकरे, मोहम्मद हारून तंवर, मंगेश पिंपळकर, नदीम शेख व अजझर शेख यांनी केले. या बंदच्या काळात देवळी शहरातील बाजारपेठ मात्र सुरळीत सुरू होती.

टॅग्स :National Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी