शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल्समध्ये झळकणार ‘नो फूड वेस्ट’चे फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 06:00 IST

अन्न हे पूर्णब्रह्म असे आपण म्हणतो. असे असताना अन्नाची मोठी नासाडी होताना दिसते. भारतात दरवर्षी ६५० लाख टन्न अन्नाची नासाडी होते. इतक्या अन्नाचे उत्पादन ब्रिटन एका वर्षात सुद्धा करू शकत नाही. बेंगळूरुमध्ये दरवर्षी लग्न समारंभ आणि पार्ट्यांमध्ये ९४३ टन अन्न वाया जाते.

ठळक मुद्देएफडीएचा अभिनव उपक्रम : कार्यशाळांतून होतोय जागर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मात्र, लग्न समारंभ व इतर समारंभांतून मोठ्या प्रमाणावर अन्नाची नासाडी होती. अन्नाच्या या नासाडीला पायबंद घालण्यासाठी फूट सेफ्टी स्टॅण्डर्ड अथॉरिटी आॅफ इंडिया, अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तरीत्या ‘नो फूट वेस्ट’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हाभरात जनजागृतीदेखील केली जात आहे.अन्न हे पूर्णब्रह्म असे आपण म्हणतो. असे असताना अन्नाची मोठी नासाडी होताना दिसते. भारतात दरवर्षी ६५० लाख टन्न अन्नाची नासाडी होते. इतक्या अन्नाचे उत्पादन ब्रिटन एका वर्षात सुद्धा करू शकत नाही. बेंगळूरुमध्ये दरवर्षी लग्न समारंभ आणि पार्ट्यांमध्ये ९४३ टन अन्न वाया जाते.यामध्ये २.५० कोटी लोकांना जेवण दिले जाऊ शकते. याची किंमत ५० हजार कोटी इतकी आहे. भारतात एका दिवसात १३७ कोटी रुपयांचे जेवण वाया जाते. अन्न नासाडीच्या बाबतीत भारताचा जगात सातवा क्रमांक लागतो. एकीकडे भारतात एक तृतियांश लोकांना अन्नाअभावी उपाशी राहावे लागते, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर अन्नाची नासाडी होते. अन्नाच्या नासाडीमुळे देशाची आर्थिक आणि सामाजिकदेखील घसरण होते. अन्नाच्या नासाडीला पायबंद घालण्याकरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यापुढे शहरातील प्रमुख हॉटेल्स, रेस्टॉरेंटमध्ये नो फूड वेस्टचे फलक लावण्यात येणार आहेत.या उपक्रमांतर्गत शहरातील काही हॉटेल्समध्ये फलक लावण्यात आले आहेत. कार्यशाळा आयोजनाच्या माध्यमातून याविषयी जागरही केला जात आहे. या उपक्रमाकरिता फलक लॉयन्सकडून उपलब्ध करून दिले जात आहेत.सामाजिक न्यायभवनात उपक्रमाचा प्रारंभअन्न व औषध प्रशासन आणि लॉयन्स क्लबच्या मदतीने सामाजिक न्यायभवनात आयोजित कार्यक्रमात ‘नो फुड वेस्ट’ या उपक्रमाचा खासदार रामदास तडस यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी सहायक आयुक्त जयंत वाणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, अन्नसुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे, किरण गेडाम, घनश्याम दंदे, लाळन्सचे अध्यक्ष प्रदीप पशिने, रितुराज चुडीवाले, प्रतिभा वाळके, सुनीता मेहर-तडस आदी उपस्थित होते.जिल्ह्यात मध्यम ते मोठे असे एकूण ३० ते ४० आणि लहान हॉटेल्स अंदाजे ५० आहेत. या सर्व हॉटेल्समध्ये येत्या काळात नो फूड वेस्टचे फलक लावण्यात येणार असून अन्न नासाडी हो नये याकरिता जागर केला जाणार आहे.- जयंत वाणे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, वर्धा.

टॅग्स :FDAएफडीएhotelहॉटेल