शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

हॉटेल्समध्ये झळकणार ‘नो फूड वेस्ट’चे फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 06:00 IST

अन्न हे पूर्णब्रह्म असे आपण म्हणतो. असे असताना अन्नाची मोठी नासाडी होताना दिसते. भारतात दरवर्षी ६५० लाख टन्न अन्नाची नासाडी होते. इतक्या अन्नाचे उत्पादन ब्रिटन एका वर्षात सुद्धा करू शकत नाही. बेंगळूरुमध्ये दरवर्षी लग्न समारंभ आणि पार्ट्यांमध्ये ९४३ टन अन्न वाया जाते.

ठळक मुद्देएफडीएचा अभिनव उपक्रम : कार्यशाळांतून होतोय जागर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मात्र, लग्न समारंभ व इतर समारंभांतून मोठ्या प्रमाणावर अन्नाची नासाडी होती. अन्नाच्या या नासाडीला पायबंद घालण्यासाठी फूट सेफ्टी स्टॅण्डर्ड अथॉरिटी आॅफ इंडिया, अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तरीत्या ‘नो फूट वेस्ट’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हाभरात जनजागृतीदेखील केली जात आहे.अन्न हे पूर्णब्रह्म असे आपण म्हणतो. असे असताना अन्नाची मोठी नासाडी होताना दिसते. भारतात दरवर्षी ६५० लाख टन्न अन्नाची नासाडी होते. इतक्या अन्नाचे उत्पादन ब्रिटन एका वर्षात सुद्धा करू शकत नाही. बेंगळूरुमध्ये दरवर्षी लग्न समारंभ आणि पार्ट्यांमध्ये ९४३ टन अन्न वाया जाते.यामध्ये २.५० कोटी लोकांना जेवण दिले जाऊ शकते. याची किंमत ५० हजार कोटी इतकी आहे. भारतात एका दिवसात १३७ कोटी रुपयांचे जेवण वाया जाते. अन्न नासाडीच्या बाबतीत भारताचा जगात सातवा क्रमांक लागतो. एकीकडे भारतात एक तृतियांश लोकांना अन्नाअभावी उपाशी राहावे लागते, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर अन्नाची नासाडी होते. अन्नाच्या नासाडीमुळे देशाची आर्थिक आणि सामाजिकदेखील घसरण होते. अन्नाच्या नासाडीला पायबंद घालण्याकरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यापुढे शहरातील प्रमुख हॉटेल्स, रेस्टॉरेंटमध्ये नो फूड वेस्टचे फलक लावण्यात येणार आहेत.या उपक्रमांतर्गत शहरातील काही हॉटेल्समध्ये फलक लावण्यात आले आहेत. कार्यशाळा आयोजनाच्या माध्यमातून याविषयी जागरही केला जात आहे. या उपक्रमाकरिता फलक लॉयन्सकडून उपलब्ध करून दिले जात आहेत.सामाजिक न्यायभवनात उपक्रमाचा प्रारंभअन्न व औषध प्रशासन आणि लॉयन्स क्लबच्या मदतीने सामाजिक न्यायभवनात आयोजित कार्यक्रमात ‘नो फुड वेस्ट’ या उपक्रमाचा खासदार रामदास तडस यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी सहायक आयुक्त जयंत वाणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, अन्नसुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे, किरण गेडाम, घनश्याम दंदे, लाळन्सचे अध्यक्ष प्रदीप पशिने, रितुराज चुडीवाले, प्रतिभा वाळके, सुनीता मेहर-तडस आदी उपस्थित होते.जिल्ह्यात मध्यम ते मोठे असे एकूण ३० ते ४० आणि लहान हॉटेल्स अंदाजे ५० आहेत. या सर्व हॉटेल्समध्ये येत्या काळात नो फूड वेस्टचे फलक लावण्यात येणार असून अन्न नासाडी हो नये याकरिता जागर केला जाणार आहे.- जयंत वाणे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, वर्धा.

टॅग्स :FDAएफडीएhotelहॉटेल