शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘नो एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 06:00 IST

जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून राष्ट्रीय आपत्ती ठरू पाहणाºया कोरोनाला अटकाव घालण्यासाठी ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यात कलम १४४ लागू केली आहे. या आदेशानुसार पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. शिवाय आदेशाचा भंग करणाऱ्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

ठळक मुद्दे‘कोरोना’साठी प्रतिबंधात्मक उपाययोजना : नागरिकांनी ई-मेलद्वारे तक्रारी नोंदवाव्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना हा विषाणूजन्य आजाराचा प्रसार गर्दीच्या ठिकाणी झपाट्याने होण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसला तरी प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात कलम १४४ लागू झाल्यानंतर कुठल्याही व्यक्तीला विनाकारण जिल्हाकचेरीत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर कुठलीही समस्या असल्यास नागरिकांनी थेट ई-मेलवर तक्रारी नोंदविण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून राष्ट्रीय आपत्ती ठरू पाहणाºया कोरोनाला अटकाव घालण्यासाठी ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यात कलम १४४ लागू केली आहे. या आदेशानुसार पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. शिवाय आदेशाचा भंग करणाऱ्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, आतापर्यंत वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही.कोरोना या विषाणू जन्य आजाराचा वर्धा जिल्ह्यात कुठल्याही परिस्थितीत प्रसार होऊ नये. शिवाय नेहमी गर्दी होणाºया ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात कुठल्याही नागरिकांला विनाकारण प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी बुधवारपासून सुरू करण्यात आली आहे.सुरक्षा रक्षक अन् कर्मचारी करताय नागरिकांचा गैरसमज दूरविविध कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात नेहमी नागरिक गर्दी करतात. याच इमारतीत जिल्हाधिकारी कार्यालयासह उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय आहे. त्यामुळे कार्यालयीन दिवशी येथे नागरिकांची मोठी गर्दी राहते. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामानिमित्त आलेल्या नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य द्वारावर कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकासह कर्मचाºयांनी कार्यालयात काय म्हणून प्रवेश बंदी आहे. तुमचे कुठलेही काम असल्यास भिंतीवर चिटकविलेल्या सूचना फलकावरील अधिकाऱ्यांची थेट मोबाईलवर संपर्क साधा. शिवाय कुठलीही तक्रार असल्यास ई-मेलवर नोंदवा याची माहिती दिली. तर अनेक नागरिकांच्या तक्रारी आज स्विकारण्यात आल्या. असे असले तरी नागरिकांनी जमेतोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याचे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केले आहे.जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. परंतु, दक्षता म्हणून गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी जाणे टाळावे. शिवाय नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आली आहे. दक्षता म्हणून नागरिकांनी जिल्हाधिकरी, उपविभागीय महसूल अधिकारी तसेच तहसील कार्यालयात येण्याचे टाळावे. कुठलीही तक्रार असल्यास वर्धाआरडीस, एसडीओवर्धा आणि आरओवर्धा या जीमेलच्या ुमेल आयडीवर तक्रार नोंदवावी.- प्रीती डुडुलकर, तहसीलदार, वर्धा.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस