शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वर्धा जिल्ह्यातील आकोलीत नऊ दिवसांनंतर येते नळाला पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 10:40 IST

आकोली येथे नळ योजनेच्या पाण्याचा पुरवठा नऊ दिवसाआड होतो त्यातही केवळ अर्धा तासच नळ सोडले जातात त्यामुळे गृहिणींना गावाशेजारच्या शेतातील विहिरीतून पाणी आणावे लागत आहे.

ठळक मुद्देगृहिणी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: आकोली येथे नळ योजनेच्या पाण्याचा पुरवठा नऊ दिवसाआड होतो त्यातही केवळ अर्धा तासच नळ सोडले जातात त्यामुळे गृहिणींना गावाशेजारच्या शेतातील विहिरीतून पाणी आणावे लागत आहे.येथील पाणीपुरवठ्याची विहीर पूर्ती सिंचन प्रकल्पाच्या नदीकाठच्या अरुण काकडे यांच्या शेतात आहे. पुर्ती सिंचन कालव्यामुळे विहिरीला मुबलक पाणी राहील ही आशा फोल ठरली असून मार्च महिन्यातातच विहीर आचके देते.पावसाळा व हिवाळ्यात दर दिवशी पाणी सोडले जाते मात्र आता विहिरीला पाणी नसल्याने नऊ दिवसाआड पाणी सोडले जाते. घरात पाण्याचा ठणठणाट असल्याने उन्हाळा सुरू झाला तरी कुलर अद्याप सुरु करण्यात आले नाहीत. त्यामुळे लहान मुले व वयोवृद्ध यांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो. विहीर अधिग्रहण करून पाणी समस्या सोङवता येऊ शकते पण काम करण्याची तळमळ व इच्छाशक्तीचा अभाव यामुळे लोकांना चटके सहन करावे लागत आहेत. अधिकारी व ग्रामसेवक विहीर अधिग्रहण करण्याच्या विचाराचे असले तरी पदाधिकारी मात्र उदासीन आहेत.नळ सोडणाऱ्या शिपायाच्या वॉर्डात मुबलक पाणी पुरवठा केला जात असल्याचा आरोप आहे. त्याच वॉर्डात सरपंच व पाणी पुरवठा सभापतीचे घर आहे त्यामुळे तिथे अधिक काळ नळ सुरु ठेवले जात असल्याची चर्चा असते. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई