शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

ग्रामस्वच्छता अभियानाला ग्रामपंचायतीची बगल

By admin | Updated: May 8, 2014 02:11 IST

संपूर्ण राज्यातील ग्रा.पं. मध्ये शासनाच्या आदेशानुसार ग्रामस्वच्छता अभियान व हागणदारी मुक्त गाव हा कार्यक्रम धडाक्यात सुरू आहे.

विरूळ (आ.) : संपूर्ण राज्यातील ग्रा.पं. मध्ये शासनाच्या आदेशानुसार ग्रामस्वच्छता अभियान व हागणदारी मुक्त गाव हा कार्यक्रम धडाक्यात सुरू आहे. शासनाच्या या चांगल्या कार्यक्रमाने राज्यातील अनेक गावे स्वच्छ झालीत; पण आर्वीतालुक्यात महत्त्वाचे असलेल्या विरूळ येथील ग्रा.पं. तीन वर्षांपासून स्वच्छता अभियानच राबविले नाही. यामुळे गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.ग्रामस्वच्छता अभियानामुळे अनेक गावे आरशासारखी चकचकीत झाली असून ती आदर्शवत ठरलीत; पण आर्वी तालुक्यात सर्वात मोठे सामाजिक व राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणार्‍या विरूळ गावाने दोन ते तीन वर्षांत कधीही ग्रामस्वच्छता अभियान राबविले नाही. यामुळे गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गावातील नाल्या तुंबल्या असून भवानी वॉर्डातील नाल्या पूर्णपणे बुजल्या आहेत. यामुळे गावातील सांडपाणी रस्त्यांवरून वाहताना दिसते. गावात सर्वत्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.सांडपाणी तुंबल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. डेंग्यू, मलेरीया आदी आजारांचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गाव अस्वच्छ व दुर्गंधीमध्ये हरविले असताना ग्रामपंचायत प्रशासन झोपेचे सोंग घेऊन असल्याचे दिसते. रसुलाबाद, सोरटा, हुसेनपूर या गावांजही हीच परिस्थिती पाहायला मिळते. केवळपिंपळगाव, वडाळा येथील सरपंच व नागरिकांनी गाव आरशासारख चकचकीत केले आहे. या गावाची प्रेरणा इतर गावातील नागरिक व ग्रामपंचायत प्रशासनाने घेणे गरजेचे झाले आहे. शासनाचे आदेश असताना येथील ग्रामसेवकाने स्वच्छता अभियानाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. विरूळ, रसुलाबाद, सोरटा या गावांतील ग्रामसेवकांना स्वच्छता अभियानाचा विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. केवळ शासकीय आदेश आहे म्हणून अनेक गावांत हे अभियान कागदोपत्रीच राबविले गेल्याचे पाहायला मिळते.गावात रस्त्याच्या कडेला कचर्‍याचे ढिगारे साचलेले असून रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी त्रासदायक ठरत आहे. ग्रामस्वच्छता अभियान राबविण्याची मागणी ग्रामस्थांद्वारे होत असतानाही स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने असंतोष पसरला आहे. गावातून वर्धेकडे जाणार्‍या रस्त्याच्या दोन्ही बाजूला कचर्‍याचे ढिगारे असून गावातील मुख्य चौकातही नाल्या तुंबल्याचे दिसून येते. गावातील अंतर्गत रस्त्यांचीही अत्यंत दुरवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देत साथीच्या आजारांचा उद्रेक होण्यापूर्वी ग्रामस्वच्छता अभियान राबवावे, अशी मागणी ग्रामस्थांद्वारे करण्यात येत आहे. शिवाय नागरिकांनीही स्वच्छता राखणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)