शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
5
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
6
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
7
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
8
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
9
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
10
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
12
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
13
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
14
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
15
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
16
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
17
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
18
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
19
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
20
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'

४८ तासात ४५० व्यक्तींना सूचनापत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 23:39 IST

परिवहन विभाग व वाहतूक नियंत्रण शाखा वर्धाच्यावतीने २९ वे रस्ता सुरक्षा अभियान राबविल्या जात आहे. याच अभियानादरम्यान सुरक्षीत प्रवास या हेतूने प्रत्येक दुचाकी चालकाला यापूढे हेल्मेटचा वापर करणे क्रमप्राप्त करण्यात आले आहे.

ठळक मुद्देरस्ता सुरक्षा अभियान : वाहतूक नियंत्रण शाखेचा ‘लोकसहभागतून हेल्मेट वापर’ उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : परिवहन विभाग व वाहतूक नियंत्रण शाखा वर्धाच्यावतीने २९ वे रस्ता सुरक्षा अभियान राबविल्या जात आहे. याच अभियानादरम्यान सुरक्षीत प्रवास या हेतूने प्रत्येक दुचाकी चालकाला यापूढे हेल्मेटचा वापर करणे क्रमप्राप्त करण्यात आले आहे. सदर अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमानंतर ४८ तासात हेल्मेटचा वापर न करणाऱ्या सुमारे ४५० वाहनचालकांना यापुढे हेल्मेटचा वापर करावा अशा आशयाचे सूचनापत्र वाहतूक पोलिसांच्यावतीने देण्यात आले आहेत. सदर व्यक्ती यापूढे हेल्मेटचा वापर न करताना आढल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्या जाणार आहे.दुचाकी वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर न केल्याने विविध ठिकाणी झालेल्या रस्ता अपघातात मोठ्या प्रमाणात अनेकांना प्राण गमवावे लागल्याचे वास्तव आहे. त्यामुळे न्यायालयानेही याची दखल घेत सुरक्षीत प्रवासाच्या दृष्टीने योग्य पावले संबंधित प्रशासनाने उचलावित, अशा सूचना केल्या आहेत. न्यायालयाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून हेल्मेट सक्ती नव्हे तर लोकसहभागातून हेल्मेटचा वापर हा अभिनव उपक्रम वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेने २३ एप्रिलपासून हाती घेतला आहे. हा उपक्रम राबविताना कर्तव्य बजाविणारे प्रत्येक वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचारी हेल्मेटचा वापर न करणाºया व्यक्तीला सुरूवातीला सूचनापत्र देणार आहेत. हेल्मेटचा वापर न करणाºयांना वाहतूक पोलिसांकडून ७ मे रस्ता सुरक्षा पंधरवाड्याच्या समारोपीय कार्यक्रमापर्यंत सूचनापत्र दिले जाणार असले तरी पुर्वी ज्यांना सूचना पत्र देण्यात आले; पण त्यानंतरही ते वाहनचालविताना हेल्मेटचा वापर न करताना आढळून आले अशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. गत दोन दिवसात वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने हेल्मेटचा वापर न करणाºया सुमारे ४५० वाहनचालकांना सूचनापत्र देण्यात आले आहे. तर याच कालावधीत कुणालाही हेल्मेटचा वापर न केल्यामुळे दंड ठोठावण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले.हेल्मेटमुळे वाचले दुग्ध व्यावसायिकाचे प्राणभरधाव कारने दुचाकीला धडक दिली. यात दुग्ध व्यावसायीक सुधाकर काकडे रा. सुसुंद हे किरकोळ जखमी झाले. हा अपघात बुधवारी सकाळी ९ वाजता वर्धा-आर्वी मार्गावरील जुना पाणी चौकात झाला. दुचाकीचालक काकडे हे वाहनचालविताना हेल्मेट घालून असल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला नाही. हेल्मेटमुळेच पुढील अनर्थ टळल्याची चर्चा परिसरात होती.नागरिकांनी सुरक्षीत प्रवास या हेतूने दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा. हेल्मेटचा वापर क्रमप्राप्त केल्यानंतर अनेक ठिकाणी हेल्मेटची विक्री होताना दिसते. कुठल्या कंपनीचे हेल्मेट आहे हे बघण्यापेक्षा ते आयएसआय मार्क आहे काय याची चाचपडताळणी करूनच हेल्मेटची खरेदी करावी.- दत्तात्रय गुरव, पोलीस उपनिरीक्षक,वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा.