शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

४८ तासात ४५० व्यक्तींना सूचनापत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 23:39 IST

परिवहन विभाग व वाहतूक नियंत्रण शाखा वर्धाच्यावतीने २९ वे रस्ता सुरक्षा अभियान राबविल्या जात आहे. याच अभियानादरम्यान सुरक्षीत प्रवास या हेतूने प्रत्येक दुचाकी चालकाला यापूढे हेल्मेटचा वापर करणे क्रमप्राप्त करण्यात आले आहे.

ठळक मुद्देरस्ता सुरक्षा अभियान : वाहतूक नियंत्रण शाखेचा ‘लोकसहभागतून हेल्मेट वापर’ उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : परिवहन विभाग व वाहतूक नियंत्रण शाखा वर्धाच्यावतीने २९ वे रस्ता सुरक्षा अभियान राबविल्या जात आहे. याच अभियानादरम्यान सुरक्षीत प्रवास या हेतूने प्रत्येक दुचाकी चालकाला यापूढे हेल्मेटचा वापर करणे क्रमप्राप्त करण्यात आले आहे. सदर अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमानंतर ४८ तासात हेल्मेटचा वापर न करणाऱ्या सुमारे ४५० वाहनचालकांना यापुढे हेल्मेटचा वापर करावा अशा आशयाचे सूचनापत्र वाहतूक पोलिसांच्यावतीने देण्यात आले आहेत. सदर व्यक्ती यापूढे हेल्मेटचा वापर न करताना आढल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्या जाणार आहे.दुचाकी वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर न केल्याने विविध ठिकाणी झालेल्या रस्ता अपघातात मोठ्या प्रमाणात अनेकांना प्राण गमवावे लागल्याचे वास्तव आहे. त्यामुळे न्यायालयानेही याची दखल घेत सुरक्षीत प्रवासाच्या दृष्टीने योग्य पावले संबंधित प्रशासनाने उचलावित, अशा सूचना केल्या आहेत. न्यायालयाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून हेल्मेट सक्ती नव्हे तर लोकसहभागातून हेल्मेटचा वापर हा अभिनव उपक्रम वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेने २३ एप्रिलपासून हाती घेतला आहे. हा उपक्रम राबविताना कर्तव्य बजाविणारे प्रत्येक वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचारी हेल्मेटचा वापर न करणाºया व्यक्तीला सुरूवातीला सूचनापत्र देणार आहेत. हेल्मेटचा वापर न करणाºयांना वाहतूक पोलिसांकडून ७ मे रस्ता सुरक्षा पंधरवाड्याच्या समारोपीय कार्यक्रमापर्यंत सूचनापत्र दिले जाणार असले तरी पुर्वी ज्यांना सूचना पत्र देण्यात आले; पण त्यानंतरही ते वाहनचालविताना हेल्मेटचा वापर न करताना आढळून आले अशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. गत दोन दिवसात वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने हेल्मेटचा वापर न करणाºया सुमारे ४५० वाहनचालकांना सूचनापत्र देण्यात आले आहे. तर याच कालावधीत कुणालाही हेल्मेटचा वापर न केल्यामुळे दंड ठोठावण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले.हेल्मेटमुळे वाचले दुग्ध व्यावसायिकाचे प्राणभरधाव कारने दुचाकीला धडक दिली. यात दुग्ध व्यावसायीक सुधाकर काकडे रा. सुसुंद हे किरकोळ जखमी झाले. हा अपघात बुधवारी सकाळी ९ वाजता वर्धा-आर्वी मार्गावरील जुना पाणी चौकात झाला. दुचाकीचालक काकडे हे वाहनचालविताना हेल्मेट घालून असल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला नाही. हेल्मेटमुळेच पुढील अनर्थ टळल्याची चर्चा परिसरात होती.नागरिकांनी सुरक्षीत प्रवास या हेतूने दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा. हेल्मेटचा वापर क्रमप्राप्त केल्यानंतर अनेक ठिकाणी हेल्मेटची विक्री होताना दिसते. कुठल्या कंपनीचे हेल्मेट आहे हे बघण्यापेक्षा ते आयएसआय मार्क आहे काय याची चाचपडताळणी करूनच हेल्मेटची खरेदी करावी.- दत्तात्रय गुरव, पोलीस उपनिरीक्षक,वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा.