शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नवे कामगार कल्याण केंद्र दीड वर्षांपासून बंदच

By admin | Updated: May 21, 2017 01:07 IST

शहरातील कॉटन मिल बंद झाला आणि शासनाने संलग्नित योजनाही गुंडाळल्या.

विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून तर कामगार सुविधांपासून वंचित प्रभाकर शहाकार। लोकमत न्यूज नेटवर्क पुलगाव : शहरातील कॉटन मिल बंद झाला आणि शासनाने संलग्नित योजनाही गुंडाळल्या. मागणीनंतर १ आॅक्टोबर २०१५ पासून कामगार कल्याण केंद्र नवीन स्वरूपात सुरू करण्यात आले; पण सुरू झाल्यापासूनच हे कार्यालय बंदच आहे. परिणामी, विद्यार्थी, पालक व कामगार कुटुंबांचे शैक्षणिकदृष्ट्या मोठे नुकसान होत आहे. पुलगाव कॉटन मील, विदर्भ सुपर फॉस्फेट कारखाना, बॅँक, परिवहन मंडळ आदी क्षेत्रात कार्यरत कामगार, कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक सुविधा, शिष्यवृत्ती, कामगार परिवारातील महिलांना विविध प्रकारच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा म्हणून शहरात अनेक वर्षांपासून कामगार कल्याण केंद्र कार्यरत होते. या उद्योगांतील कामगारांना आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी म्हणून कर्मचारी राज्य विमा योजनेंतर्गत दवाखाना सुरू होता. आॅगस्ट २००३ मध्ये पुलगाव कॉटन मील बंद झाला आणि शासनाने सर्व योजना गुंडाळल्या. या प्रकारामुळे कामगार क्षेत्रात कार्यरत कामगार व त्यांच्या पाल्यांचे अतोनात नुकसान झाले. मागील कित्येक वर्षे हे कार्यालय एका शाळेजवळ जीर्ण इमारतीत सुरू होते. त्याचा लाभ समाजातील घटक व विद्यार्थ्यांना मिळत होता. कामगार परिवाराला मिळत होत; पण पुलगाव कॉटन मील सोबतच हे कामगार कल्याण केंद्रही बंद झाले. शहरात पुन्हा नव्याने जयभारत टेक्सटाईल व बीईसी फर्टिलाईझर हा खत कारखाना सुरू झाला; पण कामगार कल्याण केंद्र बंदच आहे. वारंवार मागणी केल्यानंतर हे कामगार कल्याण केंद्र नव्याने सुरू करण्यात आले. १५ आॅक्टोबर २०१५ रोजी तत्कालीन नगराध्यक्ष मनीष साहू यांच्या अध्यक्षतेत या कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे सदस्य रमेश सावरकर व प्रमोद मोहोड यांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रारंभी हे कामगार कल्याण केंद्र काही दिवस सुरू होते; पण एक वर्षापासून कर्मचाऱ्याअभावी बंद आहे. केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी कल्याण सहआयुक्त सतीश दाभाडे अकोला विभाग यांनी या कल्याण केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, महिलांसाठी शिवणकला वर्ग, शिशुमंदिर सुरू होणार असल्याची ग्वाही दिली होती; पण तसे काहीच झाले नाही. कामगार क्षेत्रातील कामगारांच्या वेतनातून दरवर्षी १२ रुपये वर्गणी कपात केली जाते; पण बंद कामगार कल्याण केंद्रामुळे विद्यार्थी, कामगार कुटुंबाचे नुकसान होत आहे. याकडे लक्ष देत केंद्र सुरू करून विद्यार्थी, कामगारांना न्याय देणे गरजेचे झाले आहे. केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांचाही अभाव पुलगाव कॉटन मीलसोबत बंद झालेले कामगार कल्याण केंद्र मागणीचा रेटा वाढल्याने नव्याने सुरू करण्यात आले; पण या केंद्रांत कर्मचाऱ्यांचा भरणा करण्यात आलेला नाही. परिणामी, उद्घाटनानंतर काही काळ अनियमित सुरू राहणारे केंद्र कालांतराने बंदच झाले. मागील एक वर्षापासून कामगार कल्याण केंद्राचे दारच उघडले गेले नसल्याचे सांगण्यात येते. या प्रकारामुळे कामगारांच्या कुटुंबीयांना शासनाच्या कुठल्याही योजनांचा लाभ मिळत नसल्याचेच चित्र आहे. शिवाय शिष्यवृत्तीपासूनही विद्यार्थी वंचित आहेत. कामगार कुटुंबातील महिलांना प्रशिक्षण दिले जात नाही. यामुळे स्वयंरोजगारातही मागासलेपण दिसते. याकडे लक्ष देत कल्याण केंद्र अद्ययावत करून सुरू करणे गरजेचे आहे.