शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

नवे कामगार कल्याण केंद्र दीड वर्षांपासून बंदच

By admin | Updated: May 21, 2017 01:07 IST

शहरातील कॉटन मिल बंद झाला आणि शासनाने संलग्नित योजनाही गुंडाळल्या.

विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून तर कामगार सुविधांपासून वंचित प्रभाकर शहाकार। लोकमत न्यूज नेटवर्क पुलगाव : शहरातील कॉटन मिल बंद झाला आणि शासनाने संलग्नित योजनाही गुंडाळल्या. मागणीनंतर १ आॅक्टोबर २०१५ पासून कामगार कल्याण केंद्र नवीन स्वरूपात सुरू करण्यात आले; पण सुरू झाल्यापासूनच हे कार्यालय बंदच आहे. परिणामी, विद्यार्थी, पालक व कामगार कुटुंबांचे शैक्षणिकदृष्ट्या मोठे नुकसान होत आहे. पुलगाव कॉटन मील, विदर्भ सुपर फॉस्फेट कारखाना, बॅँक, परिवहन मंडळ आदी क्षेत्रात कार्यरत कामगार, कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक सुविधा, शिष्यवृत्ती, कामगार परिवारातील महिलांना विविध प्रकारच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा म्हणून शहरात अनेक वर्षांपासून कामगार कल्याण केंद्र कार्यरत होते. या उद्योगांतील कामगारांना आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी म्हणून कर्मचारी राज्य विमा योजनेंतर्गत दवाखाना सुरू होता. आॅगस्ट २००३ मध्ये पुलगाव कॉटन मील बंद झाला आणि शासनाने सर्व योजना गुंडाळल्या. या प्रकारामुळे कामगार क्षेत्रात कार्यरत कामगार व त्यांच्या पाल्यांचे अतोनात नुकसान झाले. मागील कित्येक वर्षे हे कार्यालय एका शाळेजवळ जीर्ण इमारतीत सुरू होते. त्याचा लाभ समाजातील घटक व विद्यार्थ्यांना मिळत होता. कामगार परिवाराला मिळत होत; पण पुलगाव कॉटन मील सोबतच हे कामगार कल्याण केंद्रही बंद झाले. शहरात पुन्हा नव्याने जयभारत टेक्सटाईल व बीईसी फर्टिलाईझर हा खत कारखाना सुरू झाला; पण कामगार कल्याण केंद्र बंदच आहे. वारंवार मागणी केल्यानंतर हे कामगार कल्याण केंद्र नव्याने सुरू करण्यात आले. १५ आॅक्टोबर २०१५ रोजी तत्कालीन नगराध्यक्ष मनीष साहू यांच्या अध्यक्षतेत या कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे सदस्य रमेश सावरकर व प्रमोद मोहोड यांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रारंभी हे कामगार कल्याण केंद्र काही दिवस सुरू होते; पण एक वर्षापासून कर्मचाऱ्याअभावी बंद आहे. केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी कल्याण सहआयुक्त सतीश दाभाडे अकोला विभाग यांनी या कल्याण केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, महिलांसाठी शिवणकला वर्ग, शिशुमंदिर सुरू होणार असल्याची ग्वाही दिली होती; पण तसे काहीच झाले नाही. कामगार क्षेत्रातील कामगारांच्या वेतनातून दरवर्षी १२ रुपये वर्गणी कपात केली जाते; पण बंद कामगार कल्याण केंद्रामुळे विद्यार्थी, कामगार कुटुंबाचे नुकसान होत आहे. याकडे लक्ष देत केंद्र सुरू करून विद्यार्थी, कामगारांना न्याय देणे गरजेचे झाले आहे. केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांचाही अभाव पुलगाव कॉटन मीलसोबत बंद झालेले कामगार कल्याण केंद्र मागणीचा रेटा वाढल्याने नव्याने सुरू करण्यात आले; पण या केंद्रांत कर्मचाऱ्यांचा भरणा करण्यात आलेला नाही. परिणामी, उद्घाटनानंतर काही काळ अनियमित सुरू राहणारे केंद्र कालांतराने बंदच झाले. मागील एक वर्षापासून कामगार कल्याण केंद्राचे दारच उघडले गेले नसल्याचे सांगण्यात येते. या प्रकारामुळे कामगारांच्या कुटुंबीयांना शासनाच्या कुठल्याही योजनांचा लाभ मिळत नसल्याचेच चित्र आहे. शिवाय शिष्यवृत्तीपासूनही विद्यार्थी वंचित आहेत. कामगार कुटुंबातील महिलांना प्रशिक्षण दिले जात नाही. यामुळे स्वयंरोजगारातही मागासलेपण दिसते. याकडे लक्ष देत कल्याण केंद्र अद्ययावत करून सुरू करणे गरजेचे आहे.