शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नवे कामगार कल्याण केंद्र दीड वर्षांपासून बंदच

By admin | Updated: May 21, 2017 01:07 IST

शहरातील कॉटन मिल बंद झाला आणि शासनाने संलग्नित योजनाही गुंडाळल्या.

विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून तर कामगार सुविधांपासून वंचित प्रभाकर शहाकार। लोकमत न्यूज नेटवर्क पुलगाव : शहरातील कॉटन मिल बंद झाला आणि शासनाने संलग्नित योजनाही गुंडाळल्या. मागणीनंतर १ आॅक्टोबर २०१५ पासून कामगार कल्याण केंद्र नवीन स्वरूपात सुरू करण्यात आले; पण सुरू झाल्यापासूनच हे कार्यालय बंदच आहे. परिणामी, विद्यार्थी, पालक व कामगार कुटुंबांचे शैक्षणिकदृष्ट्या मोठे नुकसान होत आहे. पुलगाव कॉटन मील, विदर्भ सुपर फॉस्फेट कारखाना, बॅँक, परिवहन मंडळ आदी क्षेत्रात कार्यरत कामगार, कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक सुविधा, शिष्यवृत्ती, कामगार परिवारातील महिलांना विविध प्रकारच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा म्हणून शहरात अनेक वर्षांपासून कामगार कल्याण केंद्र कार्यरत होते. या उद्योगांतील कामगारांना आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी म्हणून कर्मचारी राज्य विमा योजनेंतर्गत दवाखाना सुरू होता. आॅगस्ट २००३ मध्ये पुलगाव कॉटन मील बंद झाला आणि शासनाने सर्व योजना गुंडाळल्या. या प्रकारामुळे कामगार क्षेत्रात कार्यरत कामगार व त्यांच्या पाल्यांचे अतोनात नुकसान झाले. मागील कित्येक वर्षे हे कार्यालय एका शाळेजवळ जीर्ण इमारतीत सुरू होते. त्याचा लाभ समाजातील घटक व विद्यार्थ्यांना मिळत होता. कामगार परिवाराला मिळत होत; पण पुलगाव कॉटन मील सोबतच हे कामगार कल्याण केंद्रही बंद झाले. शहरात पुन्हा नव्याने जयभारत टेक्सटाईल व बीईसी फर्टिलाईझर हा खत कारखाना सुरू झाला; पण कामगार कल्याण केंद्र बंदच आहे. वारंवार मागणी केल्यानंतर हे कामगार कल्याण केंद्र नव्याने सुरू करण्यात आले. १५ आॅक्टोबर २०१५ रोजी तत्कालीन नगराध्यक्ष मनीष साहू यांच्या अध्यक्षतेत या कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे सदस्य रमेश सावरकर व प्रमोद मोहोड यांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रारंभी हे कामगार कल्याण केंद्र काही दिवस सुरू होते; पण एक वर्षापासून कर्मचाऱ्याअभावी बंद आहे. केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी कल्याण सहआयुक्त सतीश दाभाडे अकोला विभाग यांनी या कल्याण केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, महिलांसाठी शिवणकला वर्ग, शिशुमंदिर सुरू होणार असल्याची ग्वाही दिली होती; पण तसे काहीच झाले नाही. कामगार क्षेत्रातील कामगारांच्या वेतनातून दरवर्षी १२ रुपये वर्गणी कपात केली जाते; पण बंद कामगार कल्याण केंद्रामुळे विद्यार्थी, कामगार कुटुंबाचे नुकसान होत आहे. याकडे लक्ष देत केंद्र सुरू करून विद्यार्थी, कामगारांना न्याय देणे गरजेचे झाले आहे. केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांचाही अभाव पुलगाव कॉटन मीलसोबत बंद झालेले कामगार कल्याण केंद्र मागणीचा रेटा वाढल्याने नव्याने सुरू करण्यात आले; पण या केंद्रांत कर्मचाऱ्यांचा भरणा करण्यात आलेला नाही. परिणामी, उद्घाटनानंतर काही काळ अनियमित सुरू राहणारे केंद्र कालांतराने बंदच झाले. मागील एक वर्षापासून कामगार कल्याण केंद्राचे दारच उघडले गेले नसल्याचे सांगण्यात येते. या प्रकारामुळे कामगारांच्या कुटुंबीयांना शासनाच्या कुठल्याही योजनांचा लाभ मिळत नसल्याचेच चित्र आहे. शिवाय शिष्यवृत्तीपासूनही विद्यार्थी वंचित आहेत. कामगार कुटुंबातील महिलांना प्रशिक्षण दिले जात नाही. यामुळे स्वयंरोजगारातही मागासलेपण दिसते. याकडे लक्ष देत कल्याण केंद्र अद्ययावत करून सुरू करणे गरजेचे आहे.