शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

नवे कामगार कल्याण केंद्र दीड वर्षांपासून बंदच

By admin | Updated: May 21, 2017 01:07 IST

शहरातील कॉटन मिल बंद झाला आणि शासनाने संलग्नित योजनाही गुंडाळल्या.

विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून तर कामगार सुविधांपासून वंचित प्रभाकर शहाकार। लोकमत न्यूज नेटवर्क पुलगाव : शहरातील कॉटन मिल बंद झाला आणि शासनाने संलग्नित योजनाही गुंडाळल्या. मागणीनंतर १ आॅक्टोबर २०१५ पासून कामगार कल्याण केंद्र नवीन स्वरूपात सुरू करण्यात आले; पण सुरू झाल्यापासूनच हे कार्यालय बंदच आहे. परिणामी, विद्यार्थी, पालक व कामगार कुटुंबांचे शैक्षणिकदृष्ट्या मोठे नुकसान होत आहे. पुलगाव कॉटन मील, विदर्भ सुपर फॉस्फेट कारखाना, बॅँक, परिवहन मंडळ आदी क्षेत्रात कार्यरत कामगार, कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक सुविधा, शिष्यवृत्ती, कामगार परिवारातील महिलांना विविध प्रकारच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा म्हणून शहरात अनेक वर्षांपासून कामगार कल्याण केंद्र कार्यरत होते. या उद्योगांतील कामगारांना आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी म्हणून कर्मचारी राज्य विमा योजनेंतर्गत दवाखाना सुरू होता. आॅगस्ट २००३ मध्ये पुलगाव कॉटन मील बंद झाला आणि शासनाने सर्व योजना गुंडाळल्या. या प्रकारामुळे कामगार क्षेत्रात कार्यरत कामगार व त्यांच्या पाल्यांचे अतोनात नुकसान झाले. मागील कित्येक वर्षे हे कार्यालय एका शाळेजवळ जीर्ण इमारतीत सुरू होते. त्याचा लाभ समाजातील घटक व विद्यार्थ्यांना मिळत होता. कामगार परिवाराला मिळत होत; पण पुलगाव कॉटन मील सोबतच हे कामगार कल्याण केंद्रही बंद झाले. शहरात पुन्हा नव्याने जयभारत टेक्सटाईल व बीईसी फर्टिलाईझर हा खत कारखाना सुरू झाला; पण कामगार कल्याण केंद्र बंदच आहे. वारंवार मागणी केल्यानंतर हे कामगार कल्याण केंद्र नव्याने सुरू करण्यात आले. १५ आॅक्टोबर २०१५ रोजी तत्कालीन नगराध्यक्ष मनीष साहू यांच्या अध्यक्षतेत या कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे सदस्य रमेश सावरकर व प्रमोद मोहोड यांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रारंभी हे कामगार कल्याण केंद्र काही दिवस सुरू होते; पण एक वर्षापासून कर्मचाऱ्याअभावी बंद आहे. केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी कल्याण सहआयुक्त सतीश दाभाडे अकोला विभाग यांनी या कल्याण केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, महिलांसाठी शिवणकला वर्ग, शिशुमंदिर सुरू होणार असल्याची ग्वाही दिली होती; पण तसे काहीच झाले नाही. कामगार क्षेत्रातील कामगारांच्या वेतनातून दरवर्षी १२ रुपये वर्गणी कपात केली जाते; पण बंद कामगार कल्याण केंद्रामुळे विद्यार्थी, कामगार कुटुंबाचे नुकसान होत आहे. याकडे लक्ष देत केंद्र सुरू करून विद्यार्थी, कामगारांना न्याय देणे गरजेचे झाले आहे. केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांचाही अभाव पुलगाव कॉटन मीलसोबत बंद झालेले कामगार कल्याण केंद्र मागणीचा रेटा वाढल्याने नव्याने सुरू करण्यात आले; पण या केंद्रांत कर्मचाऱ्यांचा भरणा करण्यात आलेला नाही. परिणामी, उद्घाटनानंतर काही काळ अनियमित सुरू राहणारे केंद्र कालांतराने बंदच झाले. मागील एक वर्षापासून कामगार कल्याण केंद्राचे दारच उघडले गेले नसल्याचे सांगण्यात येते. या प्रकारामुळे कामगारांच्या कुटुंबीयांना शासनाच्या कुठल्याही योजनांचा लाभ मिळत नसल्याचेच चित्र आहे. शिवाय शिष्यवृत्तीपासूनही विद्यार्थी वंचित आहेत. कामगार कुटुंबातील महिलांना प्रशिक्षण दिले जात नाही. यामुळे स्वयंरोजगारातही मागासलेपण दिसते. याकडे लक्ष देत कल्याण केंद्र अद्ययावत करून सुरू करणे गरजेचे आहे.