शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

नवे शैक्षणिक धोरण नवा भारताचा पाया ठरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 05:00 IST

शिक्षणमंत्री पोखरियाल म्हणाले की, आमचे शिक्षक हेच भारत गौरव पुढे घेऊन शकतात. वर्धा एक साधनेची धरती आहे. महात्मा गांधीजींनी सेवाग्राम येथे राहून आपले अनेक कार्यक्रम राबविले. सत्य, अहिंसा आणि प्रेम हा संदेश संपूर्ण जगाला देण्याचे काम त्यांनी केले. येथील विद्यार्थी गांधी योद्धा म्हणून जगात सत्य, अहिंसा, शांतता, आत्मीयता,सौहार्द आणि संस्कृती यांचे प्रसारक झाले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी ऑनलाईनच्या माध्यामातून व्यक्त केली.

ठळक मुद्देरमेश पोखरियाल : आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यापीठात ऑनलाईन संकुलाचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नवीन शैक्षणिक धोरण हे नव भारताच्या निर्मितीचा पाया ठरणार आहे. या धोरणामध्ये महात्मा गांधीजी यांच्या नई तालीमला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी साकेत संकुलाच्या ऑनलाईन लोकार्पण सोहळ्यादरम्यान केले.हबीब तनवीर सभागृहात आयोजित ऑनलाईन लोकार्पण सोहळ्याला कुलगुरु प्रा. रजनीश कुमार शुक्ल, खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, प्रकुलगुरु प्रा. हनुमानप्रसाद शुक्ल, प्रा. चंद्रकांत रागीट, कुलसचिव कादर नवाज खान, नियोजन अधिकारी अरविंद टेंभुर्णे यांची उपस्थिती होती.यावेळी ५६ निवासस्थान असलेल्या साकेत संकुलाचे ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले. साहित्य विद्यापीठाच्या अधिष्ठाता प्रा. प्रिती सागर यांनी साकेत वैभव आणि बौद्ध ग्रंथ सुत्तपिटकमधील मज्झिम निकाय यांचे वाचन केले.शिक्षणमंत्री पोखरियाल म्हणाले की, आमचे शिक्षक हेच भारत गौरव पुढे घेऊन शकतात. वर्धा एक साधनेची धरती आहे. महात्मा गांधीजींनी सेवाग्राम येथे राहून आपले अनेक कार्यक्रम राबविले. सत्य, अहिंसा आणि प्रेम हा संदेश संपूर्ण जगाला देण्याचे काम त्यांनी केले. येथील विद्यार्थी गांधी योद्धा म्हणून जगात सत्य, अहिंसा, शांतता, आत्मीयता,सौहार्द आणि संस्कृती यांचे प्रसारक झाले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी ऑनलाईनच्या माध्यामातून व्यक्त केली.कुलगुरु प्रा. रजनीशकुमार शुक्ल यांनी हिंदी विश्वविद्यालय हिंदी माध्यमातून सर्व भारतीय भाषांमध्ये संशोधन आणि अनुवाद करण्यात महत्वाची भूमिका पार पाडेल, असे ते म्हणाले. यावेळी कोरोना संकटात वर्धा जिल्हा सुरक्षित असून त्यासाठी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांचे कौतुकही करण्यात आले. येत्या पाच सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी वर्ध्यातून शिक्षण घेऊन विदेशात गेलेल्या विदेशी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन संमेलन घेण्यात येणार असल्याची माहिती प्रा. शुक्ल यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमीत कमी उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला असून विश्वविद्यालयातील शिक्षक व विद्याथ्यांसह आदींसाठी यूट्यूब, चॅनलवर लोकार्पण कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले. संचालन कुलसचिव कादर नवाज खान यांनी केले. आभार प्रकुलगुरु प्रा. हनुमान प्रसाद शुक्ल यांनी मानले.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस