शहरं
Join us  
Trending Stories
1
लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
2
११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत
3
बँक खाते, पेन्शन, टॅक्स स्लॅब ते GST बदल... २०२५ मध्ये पैशांसंबंधी झाले ७ मोठे बदल; तुम्हाला किती फायदा?
4
Shashi Tharoor: "पत्नीच्या संमतीशिवाय संबंध ठेवणे वैवाहिक बलात्कारच, पतीला सूट का द्यावी?"- शशी थरूर
5
"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा
6
Nashik Leopard: बिबट्याची नाशिक पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालय आवारातच एन्ट्री, सीसीटीव्हीमध्ये दिसला
7
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
8
आता परत सलमानवर जोक करणार का? पापाराझीच्या प्रश्नावर प्रणित मोरेने हातच जोडले; म्हणाला...
9
...हे ५६ हजार लोक जगातील संपत्तीवर ठेवतात नियंत्रण; श्रीमंतीच्या नव्या आकडेवारीनं सर्वच हैराण
10
पाकिस्तान हेरगिरी नेटवर्क: गुरुग्राम कोर्टातील वकील नय्यूमला अटक, हवाला कनेक्शनचा संशय!
11
U19 Asia Cup 2025 : वैभव सूर्यवंशीचा धमाका! सिक्सर मारत स्टाईलमध्ये साजरी केली फिफ्टी
12
खळबळजनक! ३ वर्षे इंजिनिअरने केले रुग्णांवर उपचार; भावोजींची डिग्री, पण औषधं द्यायचा मेहुणा
13
‘शेतात जाणाऱ्या महिलाही सुरक्षित नाहीत’, पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर हजारो जोडप्यांचे व्हिडीओ बनल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट
14
नगराध्यक्ष ते राज्यपाल! कसा होता शिवराज पाटील चाकूरकरांचा प्रवास; तब्बल ७ वेळा बनले खासदार
15
उत्तर प्रदेशातील दुसरी सीमा हैदर! लग्नानंतर बांगलादेशी महिला रीना बेगम नेपाळमार्गे थेट भारतात
16
Flipperachi Net Worth: धुरंदरचं व्हायरल गाणं FA9LA गाणाऱ्या फ्लिपरॅचीची संपत्ती किती? दरवर्षी किती करतो कमाई, जाणून घ्या
17
Ghodbunder Road Update: घोडबंदर मार्गावर पुन्हा ३ दिवस अवजड वाहनांना बंदी,  पर्यायी मार्ग कोणते?
18
"मनोरंजनाच्या नावाखाली फक्त हिंसाच...", सध्याच्या कंटेंटवर राधिका आपटेने व्यक्त केली चिंता
19
मेक्सिकोच्या ५०% टॅक्समागे अमेरिकेचा हात? भारतातील 'या' क्षेत्राला बसणार सर्वाधिक झळ
20
IND vs SA: द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ
Daily Top 2Weekly Top 5

देशज चिकित्सा पद्धतीला चालना देण्याची गरज : कुलगुरु प्रो. शुक्ल

By अभिनय खोपडे | Updated: July 16, 2023 18:02 IST

विशिष्ट अतिथी वैभव सुरंगी म्हणाले की ज्ञानाच्या प्राचीन परंपरेकडे फारसे लक्ष दिले गेले नाही.

वर्धा : पारंपरिक पद्धतीने बीमारीचा इलाज करणारे चिकित्सक लोक स्वास्थ्य चिकित्सक आहेत.  ‌आजच्या चिकित्सा प्रणालीत आधुनिक वैदूगण नंदादीपासारखे आहेत. मानवी स्वास्थ्य प्रणाली सुदृढ ठेवण्यासाठी पारंपरिक चिकित्सेला चालना देण्याची गरज आहे. असे प्रतिपादन कुलगुरु प्रो. रजनीश कुमार शुक्ल यांनी केले.

महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी‍ विश्‍वविद्यालयात विश्वविद्यालयाचा मानवविज्ञान विभाग व आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने  15 व 16 रोजी आयोजित ‘विदर्भ परिक्षेत्रातील देशज चिकित्सक : विद्या प्रदर्शनी व सम्मेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

श्यामाप्रसाद मुखर्जी भवनात कार्यक्रमाचा समारोप रविवारी झाला. यावेळी ‘आम्‍ही आमच्‍या आरोग्‍यासाठी’ संस्‍थेचे संस्‍थापक डॉ. सतीश गोगुलवार, आय.आय.एम., नागपूचे निदेशक प्रो. भीमराया मैत्री, वनवासी कल्याण आश्रम, नागपूरचे अखिल भारतीय युवा कार्य प्रमुख वैभव सुरंगी यांनी विचार मांडले. प्र कुलगुरु प्रो. चंद्रकांत रागीट व मानविकी तथा सामाजिक विज्ञान विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो. अनिल कुमार राय हेही मंचावर उपस्थित होते.  या प्रसंगी कुलगुरु प्रो. शुक्ल यांनी विदर्भातील वैदुंचा सन्मान सूतमाला, अंगवस्त्र, सन्मान पत्र व प्रतीक चिह्न देऊन केला. कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्ज्वलन व कुलगीताने करण्यात आला.

मुख्य अतिथी प्रो. भीमराया मैत्री म्हणाले की विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे  संपूर्ण विश्व भारताकडे बघत आहे. समृद्ध देशज चिकित्सा पद्धतीच्या प्रभावाने ज्ञानार्जनाकरिता आम्ही आता शहराकडून खेड्यांकडे जात आहोत. भारतात देशज चिकित्सा व्यापक झाली असून तिला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. 

विशिष्ट अतिथी वैभव सुरंगी म्हणाले की ज्ञानाच्या प्राचीन परंपरेकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. शैक्षणिक संस्थांनी सामाजिक व्यवस्थेचा अभ्यास करुन संशोधन करावे असे आवाहन त्यांनी केले. मुख्य वक्ता डॉ. सतीश गोगुलवार यांनी आचार्य विनोबा भावे यांचे पुस्तक आरोग्य विचार व तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता यांचा उल्लेख केला. 

40 वर्षांपासून जनजाती समुदायासोबतचे अनुभव सांगतांना ते म्हणाले की परंपरागतरितीने उपचार करणारे वैद्य हळू-हळू कमी होत आहेत. नवी पीढी हे काम करतांना दिसत नाही. या उपचार पद्धतीचे अध्ययन व दस्तावेजीकरण आवश्यक झाले आहे व हे काम विद्यापीठांनी हाती घेतले पाहिजे. देशज चिकित्सा प्रदर्शनात 40 हून अधिक वैद्यांनी  वनस्पति, जड़ी - बुटी व वस्तुंचे स्टाॅल लावले होते. कार्यक्रमात स्वागत भाषण प्रो. अनिल कुमार राय यांनी केले. प्रास्ताविक मानवविज्ञान विभागाचे प्रो. फरहद मलिक यांनी केले. संचालन डॉ.अर्चना भालकर यांनी केले तर डॉ. निशीथ राय यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. 

कुलगुरु प्रो. शुक्ल व आमंत्रित पाहुण्यांनी प्रदर्शनाचे अवलोकन केले. यावेळी अध्यापक, शोधार्थी, विद्यार्थी, गणमान्य नागरिक सेवाग्रामचे डाॅ. ओ. पी. गुप्ता, डॉ. अनुपमा गुप्ता, विधि सेवा प्राधिकरणचे विवेक देशमुख, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, आधारवड संस्थेचे शेख हाशम, बहार नेचर फाउंडेशनचे प्राध्यापक किशोर वानखेड़े, जयंत सबाने, वन्य जीव प्रतिपालक संजय इंगळे तिगावकर, डॉ. मेहरे, डॉ. प्रशांत खातदेव उपस्थित होते.