शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
2
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
4
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
5
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
6
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
7
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
9
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
10
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
11
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
12
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
13
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
14
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
15
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
16
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
17
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
18
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
19
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
20
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!

देशाला सुराज्याकडे नेण्याची गरज

By admin | Updated: August 17, 2016 00:50 IST

देशाला स्वराज्य मिळून आज ६९ वर्षे झाली आहे. आता या स्वराज्याचे सुराज्य बनविण्याची गरज असून यासाठी शासन प्रयत्नशील आहे;

मदन येरावार : स्वातंत्र्याचा ६९ वा वर्धापन दिन वर्धा : देशाला स्वराज्य मिळून आज ६९ वर्षे झाली आहे. आता या स्वराज्याचे सुराज्य बनविण्याची गरज असून यासाठी शासन प्रयत्नशील आहे; पण जनतेनेही सक्रीय सहभागी होऊन आपले अमूल्य योगदान द्यावे, असे आवाहन उर्जा व बांधकाम, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मैदानावर राज्यमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस अधीक्षक अंकित गोयल उपस्थित होते. येरावार पुढे म्हणाले की, स्वच्छ भारत मिशनच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली आहे. अभियान अधिक गतिमान करण्यासाठी २२ आॅगस्ट ते २ आॅक्टोबर दरम्यान स्वच्छ महाराष्ट्रासाठी ‘१८ लाख भेटी’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. शौचालय नसलेल्या १८ लाख कुटुंबांपर्यंत पोहोचून त्यांना पे्ररीत केले जाईल. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने एक वर्षात सर्व शौचालय बांधण्याचे नियोजन केले. या अभियानास लोकचळवळीचे स्वरुप देत शौचालयाचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनतेने सहभागी होत जिल्हा हागणदारीमुक्त करण्याच्या मोहिमेला गती द्यावी, असेही त्यांनी सांगितले. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत वर्धा : सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्व जिल्ह्यात सायबर लॅब सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील सायबर गुन्ह्याच्या शोधासाठी मदत होईल, असेही ना. मदन येरावार म्हणाले. जिल्ह्यातील कृषी व पुरक उद्योगास चालना देऊन ग्रामीण भागातील आर्थिक विकासाचा दर उंचावण्यासाठी भूपृष्ठ वाहतुकीच्या दर्जात वाढ करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी राज्य शासनाने नागपूर-मुंबई हा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. ७१० किमी लांबी व १२० मीटर रूंदी असलेला हा महामार्ग जिल्ह्यातील वर्धा, सेलू व आर्वी या तीन तालुक्यातून जाणार आहे. यात ३५ गावांचा समावेश आहे. या महामार्गावर जिल्ह्यात तीन ठिकाणी कृषी समृद्धी केंद्रे उभारण्यात येणार आहे. याच मार्गावर विमानासाठी आपातकालीन धावपट्टी वर्धा जिल्ह्यात तयार होणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या समृद्ध विकासाचा हा महामार्ग ठरेल, असेही ते म्हणाले. यावेळी येरावार यांच्या हस्ते संत तुकाराम वनग्राम योजनेंतर्गत कारंजा, समुद्रपूर व आर्वी येथील वन व्यवस्थापन समितीला प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जिल्ह्यात दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतल्याबद्दल सामाजिक वनिकरण विभागाद्वारे वृक्ष लागवडीत सहभागी व्यक्ती, संस्था, शाळा व अधिकारी यांचा गौरव करून प्रशस्तीपत्र देण्यात आले. जिल्ह्यातील ४ जि.प. शाळांना आयएसओ मानांकन प्राप्त झाल्याबद्दल मुख्याध्यापकांना सन्मानित करण्यात आले. महिला बाल कल्याण विभागाच्या माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी स्वातंत्र्य संग्राम सैनिक, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, शालेय विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)