शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गांधीजींचे विचार व कार्ये लोकांपर्यंत पोहचविण्याची गरज : प्रा. अपूर्वानंद झा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 19:40 IST

 गांधीजींच्या ७१ व्या पुण्यतिथी निमित्ताने सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान व वर्धा परिसरातील सहकारी यांच्यावतीने 'गांधींचा मृत्यू' यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

सेवाग्राम : गांधीजी या देशात जातीय समानता, अस्पृश्यता निवारण, सर्व धर्म समभाव, मूल्य या राष्ट्रात रूजविण्यासाठी कार्य करीत होते. कारण हा देश जेवढा हिंदूचा आहे तेवढाच या देशावर मुसलमानांचा अधिकार आहे, असे ते लोकांना सांगत. तर दुसरीकडे आपल्याच लोकांचा विरोध पत्करण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. देशात अल्पसंख्यकांना नैतिक अधिकाराचे संरक्षण मिळाले पाहिजे असा त्यांचा प्रयत्न होता. गांधीजींचे वचन, भजन करून स्मरण न करता त्यांचे विचार व कार्ये लोकांपर्यंत पोहचविण्याची गरज असल्याचे मत प्रा. डॉ. अपूर्वानंद झा यांनी मांडले.

 गांधीजींच्या ७१ व्या पुण्यतिथी निमित्ताने सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान व वर्धा परिसरातील सहकारी यांच्यावतीने 'गांधींचा मृत्यू' यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी आश्रमचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू तर अतीथी म्हणून सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही उपस्थित होते.      व्याख्यानात डॉ. अपूर्वानंद म्हणाले गांधीजींनी प्रार्थनेला खूप महत्त्व दिले होते. जिथे गांधीजी जात त्या ठिकाणी प्रार्थना होत असे. कलकत्ता येथे प्रार्थनेत कुराण आयात म्हणण्यावरून विरोध केला. बापूंनी समजावून सांगितले. प्रार्थना व वचने कायम ठेवली. बदल हा हळूहळू होत असतो. तसेच गांधीजी सुध्दा हळूहळू घडायला लागले. गांधीजींनी नेहमीच परिवर्तन स्विकारले होते. त्यांनी फक्त सत्याची पर्वा केलेली आहे. 

 देश स्वातंत्र्याच्या अंतिम टप्प्यात असताना दंगली शांत करणासाठी जाण्याचा निर्णय गांधीजींनी घेतला. तिथे जाण्यासाठी मोठा विरोध झाला. पण काही निवडक कार्यकर्त्यांना घेउन घाबरू नका, घर दार सोडू नका, हि़ंसा करू नका असे आवाहन करू लागले. भेटी, शांती आणि उपोषणामुळे तेथील हिंसा थांबविण्यात यश मिळाले.       

 गांधीजीवर सहा हल्ले झाले. यात एक सेवाग्राम आश्रम पुढे प्रकार घडला. बापूंना इंग्रजांनी मारले नाही. लाँर्ड माऊंटबॅटन व विंस्टन चर्चिल यांनी पण गांधीजींचे विचार व कार्य मानले होते. ब्रिटीश साम्राज्याला सर्वात जास्त धोका गांधीजी पासून असल्याचे ते मानत. गांधीजींना अभिप्रेत असलेला भारत हवा होता जो सनातन्यांना नको होता. गांधीजींचा खून झाला. तो पण प्रार्थनेला जाताना. नथूराम गोडसेने बापूंच्या पाया पडण्याचे नाटक करत गोळ्या झाडल्या. गांधीचा मृत्यू नाही तर हत्या झाली, असे डॉ. झा म्हणाले.

  समारोप रघुपती राघव या भजनाने झाला. प्रास्ताविक टी. आर. एन. प्रभू, परिचय महादेव विद्रोही तर आभार प्रदर्शन अविनाश काकडे यांनी केले. कार्यक्रमाला सेवाग्राम आश्रम, नयी तालिम समिती, सर्व सेवा संघ, गांधी संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, वर्धेतील नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीSewagramसेवाग्राम