शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

गांधीजींचे विचार व कार्ये लोकांपर्यंत पोहचविण्याची गरज : प्रा. अपूर्वानंद झा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 19:40 IST

 गांधीजींच्या ७१ व्या पुण्यतिथी निमित्ताने सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान व वर्धा परिसरातील सहकारी यांच्यावतीने 'गांधींचा मृत्यू' यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

सेवाग्राम : गांधीजी या देशात जातीय समानता, अस्पृश्यता निवारण, सर्व धर्म समभाव, मूल्य या राष्ट्रात रूजविण्यासाठी कार्य करीत होते. कारण हा देश जेवढा हिंदूचा आहे तेवढाच या देशावर मुसलमानांचा अधिकार आहे, असे ते लोकांना सांगत. तर दुसरीकडे आपल्याच लोकांचा विरोध पत्करण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. देशात अल्पसंख्यकांना नैतिक अधिकाराचे संरक्षण मिळाले पाहिजे असा त्यांचा प्रयत्न होता. गांधीजींचे वचन, भजन करून स्मरण न करता त्यांचे विचार व कार्ये लोकांपर्यंत पोहचविण्याची गरज असल्याचे मत प्रा. डॉ. अपूर्वानंद झा यांनी मांडले.

 गांधीजींच्या ७१ व्या पुण्यतिथी निमित्ताने सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान व वर्धा परिसरातील सहकारी यांच्यावतीने 'गांधींचा मृत्यू' यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी आश्रमचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू तर अतीथी म्हणून सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही उपस्थित होते.      व्याख्यानात डॉ. अपूर्वानंद म्हणाले गांधीजींनी प्रार्थनेला खूप महत्त्व दिले होते. जिथे गांधीजी जात त्या ठिकाणी प्रार्थना होत असे. कलकत्ता येथे प्रार्थनेत कुराण आयात म्हणण्यावरून विरोध केला. बापूंनी समजावून सांगितले. प्रार्थना व वचने कायम ठेवली. बदल हा हळूहळू होत असतो. तसेच गांधीजी सुध्दा हळूहळू घडायला लागले. गांधीजींनी नेहमीच परिवर्तन स्विकारले होते. त्यांनी फक्त सत्याची पर्वा केलेली आहे. 

 देश स्वातंत्र्याच्या अंतिम टप्प्यात असताना दंगली शांत करणासाठी जाण्याचा निर्णय गांधीजींनी घेतला. तिथे जाण्यासाठी मोठा विरोध झाला. पण काही निवडक कार्यकर्त्यांना घेउन घाबरू नका, घर दार सोडू नका, हि़ंसा करू नका असे आवाहन करू लागले. भेटी, शांती आणि उपोषणामुळे तेथील हिंसा थांबविण्यात यश मिळाले.       

 गांधीजीवर सहा हल्ले झाले. यात एक सेवाग्राम आश्रम पुढे प्रकार घडला. बापूंना इंग्रजांनी मारले नाही. लाँर्ड माऊंटबॅटन व विंस्टन चर्चिल यांनी पण गांधीजींचे विचार व कार्य मानले होते. ब्रिटीश साम्राज्याला सर्वात जास्त धोका गांधीजी पासून असल्याचे ते मानत. गांधीजींना अभिप्रेत असलेला भारत हवा होता जो सनातन्यांना नको होता. गांधीजींचा खून झाला. तो पण प्रार्थनेला जाताना. नथूराम गोडसेने बापूंच्या पाया पडण्याचे नाटक करत गोळ्या झाडल्या. गांधीचा मृत्यू नाही तर हत्या झाली, असे डॉ. झा म्हणाले.

  समारोप रघुपती राघव या भजनाने झाला. प्रास्ताविक टी. आर. एन. प्रभू, परिचय महादेव विद्रोही तर आभार प्रदर्शन अविनाश काकडे यांनी केले. कार्यक्रमाला सेवाग्राम आश्रम, नयी तालिम समिती, सर्व सेवा संघ, गांधी संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, वर्धेतील नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीSewagramसेवाग्राम