शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

गांधीजींचे विचार व कार्ये लोकांपर्यंत पोहचविण्याची गरज : प्रा. अपूर्वानंद झा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 19:40 IST

 गांधीजींच्या ७१ व्या पुण्यतिथी निमित्ताने सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान व वर्धा परिसरातील सहकारी यांच्यावतीने 'गांधींचा मृत्यू' यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

सेवाग्राम : गांधीजी या देशात जातीय समानता, अस्पृश्यता निवारण, सर्व धर्म समभाव, मूल्य या राष्ट्रात रूजविण्यासाठी कार्य करीत होते. कारण हा देश जेवढा हिंदूचा आहे तेवढाच या देशावर मुसलमानांचा अधिकार आहे, असे ते लोकांना सांगत. तर दुसरीकडे आपल्याच लोकांचा विरोध पत्करण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. देशात अल्पसंख्यकांना नैतिक अधिकाराचे संरक्षण मिळाले पाहिजे असा त्यांचा प्रयत्न होता. गांधीजींचे वचन, भजन करून स्मरण न करता त्यांचे विचार व कार्ये लोकांपर्यंत पोहचविण्याची गरज असल्याचे मत प्रा. डॉ. अपूर्वानंद झा यांनी मांडले.

 गांधीजींच्या ७१ व्या पुण्यतिथी निमित्ताने सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान व वर्धा परिसरातील सहकारी यांच्यावतीने 'गांधींचा मृत्यू' यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी आश्रमचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू तर अतीथी म्हणून सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही उपस्थित होते.      व्याख्यानात डॉ. अपूर्वानंद म्हणाले गांधीजींनी प्रार्थनेला खूप महत्त्व दिले होते. जिथे गांधीजी जात त्या ठिकाणी प्रार्थना होत असे. कलकत्ता येथे प्रार्थनेत कुराण आयात म्हणण्यावरून विरोध केला. बापूंनी समजावून सांगितले. प्रार्थना व वचने कायम ठेवली. बदल हा हळूहळू होत असतो. तसेच गांधीजी सुध्दा हळूहळू घडायला लागले. गांधीजींनी नेहमीच परिवर्तन स्विकारले होते. त्यांनी फक्त सत्याची पर्वा केलेली आहे. 

 देश स्वातंत्र्याच्या अंतिम टप्प्यात असताना दंगली शांत करणासाठी जाण्याचा निर्णय गांधीजींनी घेतला. तिथे जाण्यासाठी मोठा विरोध झाला. पण काही निवडक कार्यकर्त्यांना घेउन घाबरू नका, घर दार सोडू नका, हि़ंसा करू नका असे आवाहन करू लागले. भेटी, शांती आणि उपोषणामुळे तेथील हिंसा थांबविण्यात यश मिळाले.       

 गांधीजीवर सहा हल्ले झाले. यात एक सेवाग्राम आश्रम पुढे प्रकार घडला. बापूंना इंग्रजांनी मारले नाही. लाँर्ड माऊंटबॅटन व विंस्टन चर्चिल यांनी पण गांधीजींचे विचार व कार्य मानले होते. ब्रिटीश साम्राज्याला सर्वात जास्त धोका गांधीजी पासून असल्याचे ते मानत. गांधीजींना अभिप्रेत असलेला भारत हवा होता जो सनातन्यांना नको होता. गांधीजींचा खून झाला. तो पण प्रार्थनेला जाताना. नथूराम गोडसेने बापूंच्या पाया पडण्याचे नाटक करत गोळ्या झाडल्या. गांधीचा मृत्यू नाही तर हत्या झाली, असे डॉ. झा म्हणाले.

  समारोप रघुपती राघव या भजनाने झाला. प्रास्ताविक टी. आर. एन. प्रभू, परिचय महादेव विद्रोही तर आभार प्रदर्शन अविनाश काकडे यांनी केले. कार्यक्रमाला सेवाग्राम आश्रम, नयी तालिम समिती, सर्व सेवा संघ, गांधी संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, वर्धेतील नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीSewagramसेवाग्राम