शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी उपाययोजनांची गरज

By admin | Updated: June 24, 2017 00:58 IST

शहरात ग्रामीण भागातून अनेक मुले-मुली शिक्षणाकरिता येतात. प्रवासादरम्यान विद्यार्थिनींना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.

पोलीस अधीक्षकांना साकडे : चिडीमारीचे प्रकार वाढले लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शहरात ग्रामीण भागातून अनेक मुले-मुली शिक्षणाकरिता येतात. प्रवासादरम्यान विद्यार्थिनींना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. तसेच सेवाग्राम स्टेशन रोड ते महाविद्यालयापर्यंतच्या मार्गावर विद्यार्थिनींना चिडीमारीचा सामना करावा लागत आहे. टवाळखोर मुले स्टेशन रोड परिसरात ठिय्या मांडून असतात. पोलीस प्रशासनाने या प्रकाराला आळा घालण्याकरिता प्रभावी उपाययोजना करावी, अशी मागणी सागर युवा संघटनेन केली आहे. या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले. निवेदनानुसार, स्टेशनरोड ते शहरातील न्यू आर्टस्, यशवंत महाविद्यालय व अन्य महाविद्यालयापर्यंत जाताना विद्यार्थिनींचा टवाळखोर मुलांकडून अनेकवार पाठलाग केला जातो. ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलींकडे वाहन व्यवस्था नसल्याने त्यांना पायीच ये-जा करावी लागते. या संधीचा फायदा घेवून टवाळखोर मुले दुचाकी अथवा चालत जावून मुलींचा पाठलाग करतात. तसेच अश्लिल भाषेचा वापर करून मानसिक त्रास दिला जातो. मुलींनी चिडीमारी प्रकाराचा विरोध केला असता टवाळखोर मुलांकडून त्यांना धमकाविण्याचे प्रकार घडले आहे. नियमित प्रवास करणाऱ्या काही विद्यार्थिनींनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधून सदर प्रकाराची माहिती दिली. त्यानुसार निवेदन देण्यात येत असून तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे. या मागणीचे निवेदन अपर पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत यांनी स्वीकारले. निवेदन देतेवेळी अध्यक्ष संदीप कुत्तरमारे, जिल्हा उपाध्यक्ष उमाकांत काळे, कोषाध्यक्ष रिजवान अली, शहर अध्यक्ष गुंजन मेंढुले, प्रियंका महाबुधे, रोशनी मडावी, अश्विनी महाबुधे, प्राजक्ता धनविज, अपर्णा घुंगरूड, रितु मसराम, अमोल मसराम, सूरज हरगे, सूरज वाणी, अमित बोबडे, चंद्रशेखर वाणी आदी पदाधिकारी उपस्थित होते. सागर युवा सामाजिक संघटनेचे निवेदन या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यास हा प्रकार गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याला निमंत्रण देणारा ठरू शकतो. त्यामुळे या प्रकाराला वेळीच आळा घालून प्रभावी उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. ग्रामीण विद्यार्थिनींना रस्त्याने ये-जा करताना असुरक्षितेची भावना जाणवते. या भागात पोलीस बंदोबस्त वाढविण्याची गरज व्यक्त केली.