शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
4
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
5
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
6
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
7
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
8
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
9
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
10
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
11
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
12
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
13
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
14
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
15
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
16
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
17
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
18
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
19
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
20
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला

आत्महत्या रोखण्यासाठी पुढाकाराची गरज

By admin | Updated: January 3, 2015 23:08 IST

शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून गाव पातळीवर पोलीस पाटील, ग्रामसेवक, कृषी सहायक आदींसह गावातील प्रमुख व्यक्तींची समिती स्थापन करण्याचा विचार व्हावा. तसेच सर्व यंत्रणांनी पुढाकार घ्यावा,

एन. नवीन सोना : आत्महत्या प्रकरणासंदर्भात बैठक; १८ पैकी ११ प्रकरणे पात्र, दोन अपात्रवर्धा : शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून गाव पातळीवर पोलीस पाटील, ग्रामसेवक, कृषी सहायक आदींसह गावातील प्रमुख व्यक्तींची समिती स्थापन करण्याचा विचार व्हावा. तसेच सर्व यंत्रणांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी प्रशासनाला दिल्या. तसेच शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढेल, आत्मविश्वास निर्माण होईल. अशा कार्यशाळा आयोजित कराव्यात, असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शेतकरी आत्महत्या प्रकरणासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्वांना सूचना देताना अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर, हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊ बऱ्हाटे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, पंचायत समिती सभापती मंजु दुधबडे, शेतकरी सदस्य अनिल मेघे, डॉ. नंदकिशोर तोटे, केम प्रकल्पाचे जिल्हा व्यवस्थापक संजय सोनटक्के, वैद्यकीय अधिकारी नितीन निमोदिया, सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप डोंगरे आदी उपस्थित होते. समितीसमोर एकूण १८ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे समोर आली. त्यामध्ये ११ प्रकरणे पात्र ठरविण्यात आली. सेलू तालुक्यातील चाणकी येथील आशिष पाटील, रिधोऱ्यातील गजानन भलावी, वडगाव(खुर्द) येथील कवडू तितरे, आर्वी तालुक्यातील बोरगावचे वासुदेव कौरती, वाढोणा येथील रुपाली कामडी, सोरट्यातील छबु चवरे, हिंगणघाट तालुक्यातील डोरला येथील सचिन हिवरे, काचनगाव येथील राष्ट्रपाल ढोरे, देवळी(दिघी) येथील श्रावण वानखडे, वर्धा तालुक्यातील कुरझडी(फो) येथील नितीन कठाणे, वडद येथील ज्ञानेश्वर इंगोले या मृतकांची प्रकरणे पात्र ठरविण्यात आली. आर्वी तालुक्यातील पाचोडच्या रेणुका राठोड आणि वर्धा तालुक्यातील मांडवा येथील राजू मडावी या मृतकांची प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. तसेच कारंजा तालुक्यातील डायगव्हाण येथील दिवाकर कामडी, आष्टी तालुक्यातील साहूर येथील नीलेश वरकड या मृतकांच्या प्रकरणांची फेरचौकशी करावी, असे समितीने ठरविले. शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा तात्काळ निपटारा करण्यासाठी लागणारे दस्तऐवज संबंधित विभागांनी प्राधान्यानी द्यावेत, तसेच आत्महत्याग्रस्त कुटुंबाना शासनाची तत्काळ मदत उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या. बैठकीमध्ये आमदार डॉ. भोयर, आ. कुणावार यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी विविध कार्यशाळा, शेती मेळावे, कृषी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी प्रशासनासह लोकप्रतिनिधीही पुढाकार घेतील, असे सांगितले.यावेळी शेतकरी सदस्य मेघे, डॉ. तोटे यांनीही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्याबरोबरच शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा निपटारा तत्काळ करण्यासाठी उपाय सुचविले. प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम यांनी करून आभार मानले. शेतकरी आत्महत्या संदर्भातील अडचणी, प्रकरणे आदींवर यावेळी चर्चा करण्यात आली. इतरही अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)