शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या रोखण्यासाठी पुढाकाराची गरज

By admin | Updated: January 3, 2015 23:08 IST

शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून गाव पातळीवर पोलीस पाटील, ग्रामसेवक, कृषी सहायक आदींसह गावातील प्रमुख व्यक्तींची समिती स्थापन करण्याचा विचार व्हावा. तसेच सर्व यंत्रणांनी पुढाकार घ्यावा,

एन. नवीन सोना : आत्महत्या प्रकरणासंदर्भात बैठक; १८ पैकी ११ प्रकरणे पात्र, दोन अपात्रवर्धा : शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून गाव पातळीवर पोलीस पाटील, ग्रामसेवक, कृषी सहायक आदींसह गावातील प्रमुख व्यक्तींची समिती स्थापन करण्याचा विचार व्हावा. तसेच सर्व यंत्रणांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी प्रशासनाला दिल्या. तसेच शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढेल, आत्मविश्वास निर्माण होईल. अशा कार्यशाळा आयोजित कराव्यात, असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शेतकरी आत्महत्या प्रकरणासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्वांना सूचना देताना अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर, हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊ बऱ्हाटे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, पंचायत समिती सभापती मंजु दुधबडे, शेतकरी सदस्य अनिल मेघे, डॉ. नंदकिशोर तोटे, केम प्रकल्पाचे जिल्हा व्यवस्थापक संजय सोनटक्के, वैद्यकीय अधिकारी नितीन निमोदिया, सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप डोंगरे आदी उपस्थित होते. समितीसमोर एकूण १८ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे समोर आली. त्यामध्ये ११ प्रकरणे पात्र ठरविण्यात आली. सेलू तालुक्यातील चाणकी येथील आशिष पाटील, रिधोऱ्यातील गजानन भलावी, वडगाव(खुर्द) येथील कवडू तितरे, आर्वी तालुक्यातील बोरगावचे वासुदेव कौरती, वाढोणा येथील रुपाली कामडी, सोरट्यातील छबु चवरे, हिंगणघाट तालुक्यातील डोरला येथील सचिन हिवरे, काचनगाव येथील राष्ट्रपाल ढोरे, देवळी(दिघी) येथील श्रावण वानखडे, वर्धा तालुक्यातील कुरझडी(फो) येथील नितीन कठाणे, वडद येथील ज्ञानेश्वर इंगोले या मृतकांची प्रकरणे पात्र ठरविण्यात आली. आर्वी तालुक्यातील पाचोडच्या रेणुका राठोड आणि वर्धा तालुक्यातील मांडवा येथील राजू मडावी या मृतकांची प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. तसेच कारंजा तालुक्यातील डायगव्हाण येथील दिवाकर कामडी, आष्टी तालुक्यातील साहूर येथील नीलेश वरकड या मृतकांच्या प्रकरणांची फेरचौकशी करावी, असे समितीने ठरविले. शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा तात्काळ निपटारा करण्यासाठी लागणारे दस्तऐवज संबंधित विभागांनी प्राधान्यानी द्यावेत, तसेच आत्महत्याग्रस्त कुटुंबाना शासनाची तत्काळ मदत उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या. बैठकीमध्ये आमदार डॉ. भोयर, आ. कुणावार यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी विविध कार्यशाळा, शेती मेळावे, कृषी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी प्रशासनासह लोकप्रतिनिधीही पुढाकार घेतील, असे सांगितले.यावेळी शेतकरी सदस्य मेघे, डॉ. तोटे यांनीही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्याबरोबरच शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा निपटारा तत्काळ करण्यासाठी उपाय सुचविले. प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम यांनी करून आभार मानले. शेतकरी आत्महत्या संदर्भातील अडचणी, प्रकरणे आदींवर यावेळी चर्चा करण्यात आली. इतरही अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)