शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

नैतिक शिक्षणाकरिता गांधी विचारांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 21:57 IST

आजच्या काळात नैतिक शिक्षणाचे पतन होत आहे. अशा परिस्थितीत महात्मा गांधी यांचा नैतिक शिक्षणाचा विचार आज अत्यंत प्रासंगिक आहे. गांधीजींनी सर्वधर्म समानतेचा विचार मांडला होता. तो अमलात आणण्याकरिता कार्य करण्याची गरज आहे, असे मत केरळच्या साहित्यिक प्रो. के. एम. मालती यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देके. एम. मालती : सेवाग्राममध्ये ‘गांधी विचाराची प्रासंगिकता’ विषयावर चिंतन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आजच्या काळात नैतिक शिक्षणाचे पतन होत आहे. अशा परिस्थितीत महात्मा गांधी यांचा नैतिक शिक्षणाचा विचार आज अत्यंत प्रासंगिक आहे. गांधीजींनी सर्वधर्म समानतेचा विचार मांडला होता. तो अमलात आणण्याकरिता कार्य करण्याची गरज आहे, असे मत केरळच्या साहित्यिक प्रो. के. एम. मालती यांनी व्यक्त केले.त्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय आणि भारतीय इतिहास अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांचा विद्यमाने महात्मा गांधींंच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘गांधी आणि त्यांची समसामयिक प्रासंगिकता : समाज, संस्कृती आणि स्वराज’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिसंवादाच्या चवथ्या सत्राच्या अध्यक्षा म्हणून बोलत होत्या.सेवाग्राम आश्रमातील गांधी भवनात २०, २१ आणि २२ आॅगस्टला या राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या चवथ्या सत्रात दिल्ली विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरु प्रख्यात गणितज्ज्ञ पद्मश्री दिनेश सिंह, मुंबईच्या सेंट जेवियर महाविद्यालयाचे गांधी तत्वज्ञानाचे अध्यापक डॉ. अवकाश जाधव, बनारस हिंदू विश्वविद्यालय वाराणसीचे गांधी विचार विभागाचे संस्थापक अध्यक्ष प्रो. राम प्रकाश द्विवेदी यांनी विचार मांडले. पद्मश्री दिनेश सिंह यांनी ‘आधुनिक युगात गांधींचे महात्म्य’ या विषयावर विचार मांडले. डॉ. अवकाश जाधव यांनी ‘शरीराच्या माध्यमातून संदेश’ हा विषय मांडताना गांधीजींची देहबोली आणि त्यांचा सामाजिक संदेश या विषयावर भाष्य केले. प्रो. राम प्रकाश द्विवेदी यांनी ‘समन्वित विकास आणि महात्मा गाधी’ या विषयावर विचार मांडले. या सत्राचे संचालन डॉ.मनोज कुमार राय यांनी केले.आज होणार समारोपराष्ट्रीय परिसंवादाचा समारोप गुरुवारी दुपारी २ वाजता प्रो. कुमार रत्नम यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यावेळी प्रो. अशोक मोडक, राघवशरण शर्मा, प्रो. वी. के.वशिष्ठ, आर. सी. प्रधान, प्रो. पुष्पा मोतियानी, प्रो. के. एम. मालती, डॉ. सुरेशकुमार, देवजानी चक्रबोर्ती, डॉ. नवी खानगी, प्रो. जी. गोपीनाथन, डॉ. शैलेश कुमार मिश्र, प्रो. मेधा तापियालवाला, डॉ. ऐंजला गंगमई, डॉ. रवि शेखर सिंह, डॉ. राणा सांनिया हे विचार मांडतील.

टॅग्स :Sewagramसेवाग्राम