शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

नैतिक शिक्षणाकरिता गांधी विचारांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 21:57 IST

आजच्या काळात नैतिक शिक्षणाचे पतन होत आहे. अशा परिस्थितीत महात्मा गांधी यांचा नैतिक शिक्षणाचा विचार आज अत्यंत प्रासंगिक आहे. गांधीजींनी सर्वधर्म समानतेचा विचार मांडला होता. तो अमलात आणण्याकरिता कार्य करण्याची गरज आहे, असे मत केरळच्या साहित्यिक प्रो. के. एम. मालती यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देके. एम. मालती : सेवाग्राममध्ये ‘गांधी विचाराची प्रासंगिकता’ विषयावर चिंतन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आजच्या काळात नैतिक शिक्षणाचे पतन होत आहे. अशा परिस्थितीत महात्मा गांधी यांचा नैतिक शिक्षणाचा विचार आज अत्यंत प्रासंगिक आहे. गांधीजींनी सर्वधर्म समानतेचा विचार मांडला होता. तो अमलात आणण्याकरिता कार्य करण्याची गरज आहे, असे मत केरळच्या साहित्यिक प्रो. के. एम. मालती यांनी व्यक्त केले.त्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय आणि भारतीय इतिहास अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांचा विद्यमाने महात्मा गांधींंच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘गांधी आणि त्यांची समसामयिक प्रासंगिकता : समाज, संस्कृती आणि स्वराज’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिसंवादाच्या चवथ्या सत्राच्या अध्यक्षा म्हणून बोलत होत्या.सेवाग्राम आश्रमातील गांधी भवनात २०, २१ आणि २२ आॅगस्टला या राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या चवथ्या सत्रात दिल्ली विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरु प्रख्यात गणितज्ज्ञ पद्मश्री दिनेश सिंह, मुंबईच्या सेंट जेवियर महाविद्यालयाचे गांधी तत्वज्ञानाचे अध्यापक डॉ. अवकाश जाधव, बनारस हिंदू विश्वविद्यालय वाराणसीचे गांधी विचार विभागाचे संस्थापक अध्यक्ष प्रो. राम प्रकाश द्विवेदी यांनी विचार मांडले. पद्मश्री दिनेश सिंह यांनी ‘आधुनिक युगात गांधींचे महात्म्य’ या विषयावर विचार मांडले. डॉ. अवकाश जाधव यांनी ‘शरीराच्या माध्यमातून संदेश’ हा विषय मांडताना गांधीजींची देहबोली आणि त्यांचा सामाजिक संदेश या विषयावर भाष्य केले. प्रो. राम प्रकाश द्विवेदी यांनी ‘समन्वित विकास आणि महात्मा गाधी’ या विषयावर विचार मांडले. या सत्राचे संचालन डॉ.मनोज कुमार राय यांनी केले.आज होणार समारोपराष्ट्रीय परिसंवादाचा समारोप गुरुवारी दुपारी २ वाजता प्रो. कुमार रत्नम यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यावेळी प्रो. अशोक मोडक, राघवशरण शर्मा, प्रो. वी. के.वशिष्ठ, आर. सी. प्रधान, प्रो. पुष्पा मोतियानी, प्रो. के. एम. मालती, डॉ. सुरेशकुमार, देवजानी चक्रबोर्ती, डॉ. नवी खानगी, प्रो. जी. गोपीनाथन, डॉ. शैलेश कुमार मिश्र, प्रो. मेधा तापियालवाला, डॉ. ऐंजला गंगमई, डॉ. रवि शेखर सिंह, डॉ. राणा सांनिया हे विचार मांडतील.

टॅग्स :Sewagramसेवाग्राम