शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

मानवी अस्तित्वासाठी मधमाशा संवर्धनाची नितांत गरज

By admin | Updated: December 8, 2015 02:56 IST

केवळ मध मिळते म्हणून नव्हे तर मानवी अस्तित्वाकरिता मधमाश्यांचे संवर्धन आणि संगोपन करणे गरजेचे आहे.

वर्धा : केवळ मध मिळते म्हणून नव्हे तर मानवी अस्तित्वाकरिता मधमाश्यांचे संवर्धन आणि संगोपन करणे गरजेचे आहे. याकरीता मोठ्या प्रमाणावर जाणीव जागृती व्हायला पाहिजे, असे मत सेंटर फॉर बी डेव्हलपमेन्टचे संचालक डॉ. गोपाल पालिवाल यांनी व्यक्त केले. खादी ग्रामोद्योग आयोग, नागपूर कार्यालय आणि ग्रामविकास तंत्र निकेतन, पिपरी यांच्यावतीने मधमाशी पालनावर आयोजित जाणीव जागृती कार्यशाळेत ते बोलत होते. याप्रसंगी खादी ग्रामोद्योग आयोग, नागपूर कार्यालयाचे सहाय्यक विकास अधिकारी सुरेश गुढे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. स्वयंरोजगाराकरिता खादी ग्रामोद्योग आयोगाच्या योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. यानंतर डॉ. पालिवाल यांनी मधमाश्यांचा जीवनक्रम, वैशिष्ट्ये, परागकण आणि मकरंदसाठी उपयुक्त पिके, फळ-झाडे, वनस्पती याबाबत पावर पार्इंट सादरीकरणातून सविस्तर माहिती दिली. मधमाश्यांना न जाळता अहिंसक पध्दतीने मध संकलन करण्यासाठी आवश्यक गणवेश, संकलनाची पध्दती प्रात्यक्षिकातून सांगितली. शिवारात आढळणारी गावरान माशी आणि सातपुडी माशीच्या मोहोळातून मध कसे काढता येते याचेही प्रात्यक्षिक त्यांनी दिले. सातपुडी माशी पेटीत कशी ठेवावी यावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे स्वागत भाषण संस्थेचे प्राचार्य मोहन शिरभाते यांनी केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक अधिष्ठाता अतुल शर्मा यांनी केले. कृषीसाठी आवश्यक घटक म्हणून मधमाश्यांचा समावेश करावा अशी मागणी त्यांनी केली. कार्यशाळेचे संचालन समन्वयक आशिष चौहान यांनी केले.कार्यशाळेला जिल्ह्यातील २५ गावातील १० संस्थेतून ९८ महिला व पुरुष सहभागी झाले होते. कार्यशाळेला राजेंद्र खर्चे, वासुदेव खाडे, आरती, नीलेश आंबोरे, नागोराव नेहारे, सुनील पराये यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)परागीकरणाची प्रक्रिया४निसर्गामधील सपुष्प वनस्पतीच्या परागीकरणाचे ८० टक्के काम मधमाशा करतात. भाजी, फळे, तेलबियाणे, डाळवर्गीय पिकांसह जंगलातील वृक्ष, वनस्पती, गवत यांच्याही परागीकरणाचे कार्य मधमाश्या करतात. ४परागीकरण वेळेवर आणि नीट झाले नाही तर बी-फळ लागण्याची शक्यताच संंपते. त्यामुळे त्या वनस्पतींचा पुढे प्रसार होत नाही. ती वनस्पती नष्ट होण्याचा धोका असतो. जैवविविधता टिकविण्यासाठी परागीकरणासारखी महत्त्वाची नैसर्गिक प्रक्रिया खंडित होऊअ नये याकरिता मधमाश्यांचे संवर्धन व्हायला हवे, असे मत तज्ज्ञांनी सांगितले.