शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

मानवी अस्तित्वासाठी मधमाशा संवर्धनाची नितांत गरज

By admin | Updated: December 8, 2015 02:56 IST

केवळ मध मिळते म्हणून नव्हे तर मानवी अस्तित्वाकरिता मधमाश्यांचे संवर्धन आणि संगोपन करणे गरजेचे आहे.

वर्धा : केवळ मध मिळते म्हणून नव्हे तर मानवी अस्तित्वाकरिता मधमाश्यांचे संवर्धन आणि संगोपन करणे गरजेचे आहे. याकरीता मोठ्या प्रमाणावर जाणीव जागृती व्हायला पाहिजे, असे मत सेंटर फॉर बी डेव्हलपमेन्टचे संचालक डॉ. गोपाल पालिवाल यांनी व्यक्त केले. खादी ग्रामोद्योग आयोग, नागपूर कार्यालय आणि ग्रामविकास तंत्र निकेतन, पिपरी यांच्यावतीने मधमाशी पालनावर आयोजित जाणीव जागृती कार्यशाळेत ते बोलत होते. याप्रसंगी खादी ग्रामोद्योग आयोग, नागपूर कार्यालयाचे सहाय्यक विकास अधिकारी सुरेश गुढे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. स्वयंरोजगाराकरिता खादी ग्रामोद्योग आयोगाच्या योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. यानंतर डॉ. पालिवाल यांनी मधमाश्यांचा जीवनक्रम, वैशिष्ट्ये, परागकण आणि मकरंदसाठी उपयुक्त पिके, फळ-झाडे, वनस्पती याबाबत पावर पार्इंट सादरीकरणातून सविस्तर माहिती दिली. मधमाश्यांना न जाळता अहिंसक पध्दतीने मध संकलन करण्यासाठी आवश्यक गणवेश, संकलनाची पध्दती प्रात्यक्षिकातून सांगितली. शिवारात आढळणारी गावरान माशी आणि सातपुडी माशीच्या मोहोळातून मध कसे काढता येते याचेही प्रात्यक्षिक त्यांनी दिले. सातपुडी माशी पेटीत कशी ठेवावी यावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे स्वागत भाषण संस्थेचे प्राचार्य मोहन शिरभाते यांनी केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक अधिष्ठाता अतुल शर्मा यांनी केले. कृषीसाठी आवश्यक घटक म्हणून मधमाश्यांचा समावेश करावा अशी मागणी त्यांनी केली. कार्यशाळेचे संचालन समन्वयक आशिष चौहान यांनी केले.कार्यशाळेला जिल्ह्यातील २५ गावातील १० संस्थेतून ९८ महिला व पुरुष सहभागी झाले होते. कार्यशाळेला राजेंद्र खर्चे, वासुदेव खाडे, आरती, नीलेश आंबोरे, नागोराव नेहारे, सुनील पराये यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)परागीकरणाची प्रक्रिया४निसर्गामधील सपुष्प वनस्पतीच्या परागीकरणाचे ८० टक्के काम मधमाशा करतात. भाजी, फळे, तेलबियाणे, डाळवर्गीय पिकांसह जंगलातील वृक्ष, वनस्पती, गवत यांच्याही परागीकरणाचे कार्य मधमाश्या करतात. ४परागीकरण वेळेवर आणि नीट झाले नाही तर बी-फळ लागण्याची शक्यताच संंपते. त्यामुळे त्या वनस्पतींचा पुढे प्रसार होत नाही. ती वनस्पती नष्ट होण्याचा धोका असतो. जैवविविधता टिकविण्यासाठी परागीकरणासारखी महत्त्वाची नैसर्गिक प्रक्रिया खंडित होऊअ नये याकरिता मधमाश्यांचे संवर्धन व्हायला हवे, असे मत तज्ज्ञांनी सांगितले.