शहरं
Join us  
Trending Stories
1
मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
2
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
3
"माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
4
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
5
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
6
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
7
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
8
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
9
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...
10
दिवाळीला बायकोला द्या स्कूटर गिफ्ट! ८०,००० रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये मिळतायेत बेस्ट पर्याय
11
शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र
12
बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!
13
Chaitanyananda Saraswati : "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती
14
"फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर
15
GST नंतर आता तुमचा EMI स्वस्त होणार? RBI च्या पतधोरण समितीची बैठक आजपासून, रेपो दरात किती कपात
16
एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण...
17
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
18
विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान
19
दुकाने,रस्ते बंद, इंटरनेटही बंद, लोक रस्त्यावर उतरली; पीओकेमधील जनता पाकिस्तान सरकारवर का नाराज आहेत?
20
Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय?

मानवी अस्तित्वासाठी मधमाशा संवर्धनाची नितांत गरज

By admin | Updated: December 8, 2015 02:56 IST

केवळ मध मिळते म्हणून नव्हे तर मानवी अस्तित्वाकरिता मधमाश्यांचे संवर्धन आणि संगोपन करणे गरजेचे आहे.

वर्धा : केवळ मध मिळते म्हणून नव्हे तर मानवी अस्तित्वाकरिता मधमाश्यांचे संवर्धन आणि संगोपन करणे गरजेचे आहे. याकरीता मोठ्या प्रमाणावर जाणीव जागृती व्हायला पाहिजे, असे मत सेंटर फॉर बी डेव्हलपमेन्टचे संचालक डॉ. गोपाल पालिवाल यांनी व्यक्त केले. खादी ग्रामोद्योग आयोग, नागपूर कार्यालय आणि ग्रामविकास तंत्र निकेतन, पिपरी यांच्यावतीने मधमाशी पालनावर आयोजित जाणीव जागृती कार्यशाळेत ते बोलत होते. याप्रसंगी खादी ग्रामोद्योग आयोग, नागपूर कार्यालयाचे सहाय्यक विकास अधिकारी सुरेश गुढे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. स्वयंरोजगाराकरिता खादी ग्रामोद्योग आयोगाच्या योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. यानंतर डॉ. पालिवाल यांनी मधमाश्यांचा जीवनक्रम, वैशिष्ट्ये, परागकण आणि मकरंदसाठी उपयुक्त पिके, फळ-झाडे, वनस्पती याबाबत पावर पार्इंट सादरीकरणातून सविस्तर माहिती दिली. मधमाश्यांना न जाळता अहिंसक पध्दतीने मध संकलन करण्यासाठी आवश्यक गणवेश, संकलनाची पध्दती प्रात्यक्षिकातून सांगितली. शिवारात आढळणारी गावरान माशी आणि सातपुडी माशीच्या मोहोळातून मध कसे काढता येते याचेही प्रात्यक्षिक त्यांनी दिले. सातपुडी माशी पेटीत कशी ठेवावी यावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे स्वागत भाषण संस्थेचे प्राचार्य मोहन शिरभाते यांनी केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक अधिष्ठाता अतुल शर्मा यांनी केले. कृषीसाठी आवश्यक घटक म्हणून मधमाश्यांचा समावेश करावा अशी मागणी त्यांनी केली. कार्यशाळेचे संचालन समन्वयक आशिष चौहान यांनी केले.कार्यशाळेला जिल्ह्यातील २५ गावातील १० संस्थेतून ९८ महिला व पुरुष सहभागी झाले होते. कार्यशाळेला राजेंद्र खर्चे, वासुदेव खाडे, आरती, नीलेश आंबोरे, नागोराव नेहारे, सुनील पराये यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)परागीकरणाची प्रक्रिया४निसर्गामधील सपुष्प वनस्पतीच्या परागीकरणाचे ८० टक्के काम मधमाशा करतात. भाजी, फळे, तेलबियाणे, डाळवर्गीय पिकांसह जंगलातील वृक्ष, वनस्पती, गवत यांच्याही परागीकरणाचे कार्य मधमाश्या करतात. ४परागीकरण वेळेवर आणि नीट झाले नाही तर बी-फळ लागण्याची शक्यताच संंपते. त्यामुळे त्या वनस्पतींचा पुढे प्रसार होत नाही. ती वनस्पती नष्ट होण्याचा धोका असतो. जैवविविधता टिकविण्यासाठी परागीकरणासारखी महत्त्वाची नैसर्गिक प्रक्रिया खंडित होऊअ नये याकरिता मधमाश्यांचे संवर्धन व्हायला हवे, असे मत तज्ज्ञांनी सांगितले.