शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

शेतीला शासकीय योजनांची नव्हे तर परिवर्तनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:37 IST

जगात कृषीप्रधान देश अशी भारताची ओळख. परंतु, सध्या कृषीक्षेत्रातील अनेक अडचणीमुळे शेती करणेही कठीण झाले आहे. आज शेतीतून अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षण या मूलभूत गरजा भागवण्याचे सामर्थ्यही बळीराजात नाही.

ठळक मुद्देशैलेश अग्रवाल : कान्हापूर येथील शेतकरी परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जगात कृषीप्रधान देश अशी भारताची ओळख. परंतु, सध्या कृषीक्षेत्रातील अनेक अडचणीमुळे शेती करणेही कठीण झाले आहे. आज शेतीतून अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षण या मूलभूत गरजा भागवण्याचे सामर्थ्यही बळीराजात नाही. आर्थिक विवंचनेतून शेतकरी आत्महत्या करीत असून शेतीला शासकीय योजनाची नव्हे तर परिर्वनाची गरज आहे, असे प्रतिपादन शैलेश अग्रवाल यांनी केले. ते कान्हापूर येथे आयोजित शेतकरी परिषदेत मार्गदर्शन करताना बोलत होते.नजीकच्या कान्हापूर येथे शिवसेना वर्धा विधानसभा प्रमुख राजेश सराफ यांच्या नेतृत्त्वात शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे किशोर बोकडे, किशोर कारंजेकर, रवी चौव्हाण, विशाल व्यास, प्रवीण साठवणे, संदीप हिवरे, राहुल पाटणकर, किरण गोमासे, नवनीत साखरकर, अमोल थुल, वीरेंद्र भट, गणेश पाटील, येळणे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.अग्रवाल पुढे म्हणाले, शेतकरी हितार्थ असलेल्या अनेक शासकीय योजनांची माहिती अधिकारी शेतकºयांपर्यंत प्रभावी पणे पोहोचवित नाहीत. त्यामुळे समाजातील शिक्षित वर्गाने हे काम प्राधान्यक्रमाणे केले पाहिजे. विकासाच्या दृष्टीकोणातून वेगवेगळ्या प्रकल्पांतर्गत शेतीयोग्य जमीनही अधिग्रहित केल्या जात आहे. त्यामुळे शेतीसाठी पहिलेसारखी पुरेशी जमीन नाही. रसायनिक खत, किटकनाशके आदींमुळे जमिनीची पोत घसरत आहे.शिवाय विकासाच्या नावाखाली होणारी जंगलतोड ही निसर्गाच्या लहरीपणाला कारणीभुत ठरत आहे. होत असलेल्या विभक्त कुटुंबपद्धतीमुळे आणि पर्यायी रोजगार उपलब्ध नसल्याने शेत जमिनीचे छोटे-छोटे तुकडे पडत आहेत. ही तुकड्याची शेती न परवडणारीच आहे. यामुळे छुपी बेरोजगारी वाढत आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांनी सेंद्रीय शेतीकडे वळणे गरजेचे असल्याचे शैलेश अग्रवाल यांनी यावेळी सांगितले.प्रत्येक वर्षी शेतमालाला योग्य भाव देणे गरजेचेशेती व दुग्ध व्यवसायात थेट उत्पादक ते ग्राहक हिच व्यवहार पद्धती टिकवून ठेवण्याची गरज होती. त्यात शेतकºयांना त्यांच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार अबाधित ठेवून प्रगती करता आली असती. सरकारने शेतमाल विक्री पद्धतीत अनेक बदल घडवून आणले असले तरी अजुनही उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतमालाला भाव दिल्या जात नसल्याचे वास्तव आहे. केंद्र व राज्य सरकारने शेतकरी हिताचा विचार करता प्रत्येक वर्षी शेतमालाला योग्य भाव दिला पाहिजे, असे अग्रवाल यांनी सांगितले.