शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

दुरावलेल्या २११ दाम्पत्यांना आणले जवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 23:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कौटुंबिक हिंसाचारातून महिलावरील अन्याय-अत्याचार वाढत असल्याने पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात जिल्हा महिला तक्रार निवारण कक्षाची निर्मिती करण्यात आली. या कक्षाकडे अकरा महिन्यात ५७३ तक्रारी आल्या. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत त्यापैकी ५३२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून तब्बल २११ दुरावलेल्या दाम्पत्यांना जवळ आणत त्यांचा विस्कटलेला संसार जुळविण्यात यश आले आहे.जिल्हा ...

ठळक मुद्देमहिला तक्रार निवारण कक्षाची कामगिरी : ५७३ पैकी ५३२ प्रकरणांचा केला निपटारा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कौटुंबिक हिंसाचारातून महिलावरील अन्याय-अत्याचार वाढत असल्याने पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात जिल्हा महिला तक्रार निवारण कक्षाची निर्मिती करण्यात आली. या कक्षाकडे अकरा महिन्यात ५७३ तक्रारी आल्या. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत त्यापैकी ५३२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून तब्बल २११ दुरावलेल्या दाम्पत्यांना जवळ आणत त्यांचा विस्कटलेला संसार जुळविण्यात यश आले आहे.जिल्हा महिला तक्रार निवारण समितीकडे जानेवारी २०१७ ते डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कौटुंबिकहिंसाचाराच्या एकूण ५७३ तक्रारी प्राप्त झाल्या. विविध कारणांनी पत्नीचा छळ करणे तिला शारीरिक तसेच मानसिक त्रास देणे शिवाय हुंड्यांसाठी सासरच्या मंडळीकडून छळ करणे आदी कारणे या आशयाच्या तक्रारी या आहेत. प्राप्त तक्रारींपैकी महिला तक्रार निवारण समितीने ५३४ तक्रारींचा निपटारा केला. त्यापैकी २११ प्रकरणी पती-पत्नी यांच्यात आपसी समझोता करून त्याचे संसार जोडले आहे. इतकेच नव्हे तर २६७ प्रकरणे दप्तरी दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ही प्रकरणे निवारण समितीत निपटारा न झाल्याने न्यायालयात वर्ग करण्यात आले आहे. तर ५१ प्रकरणे कौटुंबिक हिंसाचार कायदा २००५ अंतभूत पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच तक्रारी दाखल करून तक्रारकर्ते अथवा दोन्ही पक्षाकडील कुणीच उपस्थित न राहिल्याने व अन्य कारणांमुळे सदर महिला समितीकडे १०८ प्रकरणे प्रलंबित असल्याचेही सांगण्यात आले. जिल्हा महिला तक्रार समितीकडे येणारी प्रत्येक तक्रार जमेपर्यंत आपसी समझोत्याने निपटारा करण्यासाठी पोलीस अधीक्षक निर्मला देवी एस. यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक रेखा काळे, सुरेखा खापर्डे, अणु राऊत, सविता मुुंडे, अंजू वाघ, व्ही.ना. क्षीरसागर आदी करीत आहेत.७ प्रकरणी गुन्हे दाखलदुरावलेल्या २११ दाम्पत्यांना एकत्र आणण्यात सदर केंद्राच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांना यश आले असले तरी १०८ प्रकरणे अद्यापही विविध कारणांमुळे प्रलंबित आहेत. सात प्रकरणी चौकशीत तत्थ आढळल्याने अखेर भादंविच्या कलम ४९८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.