शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दुरावलेल्या २११ दाम्पत्यांना आणले जवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 23:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कौटुंबिक हिंसाचारातून महिलावरील अन्याय-अत्याचार वाढत असल्याने पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात जिल्हा महिला तक्रार निवारण कक्षाची निर्मिती करण्यात आली. या कक्षाकडे अकरा महिन्यात ५७३ तक्रारी आल्या. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत त्यापैकी ५३२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून तब्बल २११ दुरावलेल्या दाम्पत्यांना जवळ आणत त्यांचा विस्कटलेला संसार जुळविण्यात यश आले आहे.जिल्हा ...

ठळक मुद्देमहिला तक्रार निवारण कक्षाची कामगिरी : ५७३ पैकी ५३२ प्रकरणांचा केला निपटारा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कौटुंबिक हिंसाचारातून महिलावरील अन्याय-अत्याचार वाढत असल्याने पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात जिल्हा महिला तक्रार निवारण कक्षाची निर्मिती करण्यात आली. या कक्षाकडे अकरा महिन्यात ५७३ तक्रारी आल्या. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत त्यापैकी ५३२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून तब्बल २११ दुरावलेल्या दाम्पत्यांना जवळ आणत त्यांचा विस्कटलेला संसार जुळविण्यात यश आले आहे.जिल्हा महिला तक्रार निवारण समितीकडे जानेवारी २०१७ ते डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कौटुंबिकहिंसाचाराच्या एकूण ५७३ तक्रारी प्राप्त झाल्या. विविध कारणांनी पत्नीचा छळ करणे तिला शारीरिक तसेच मानसिक त्रास देणे शिवाय हुंड्यांसाठी सासरच्या मंडळीकडून छळ करणे आदी कारणे या आशयाच्या तक्रारी या आहेत. प्राप्त तक्रारींपैकी महिला तक्रार निवारण समितीने ५३४ तक्रारींचा निपटारा केला. त्यापैकी २११ प्रकरणी पती-पत्नी यांच्यात आपसी समझोता करून त्याचे संसार जोडले आहे. इतकेच नव्हे तर २६७ प्रकरणे दप्तरी दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ही प्रकरणे निवारण समितीत निपटारा न झाल्याने न्यायालयात वर्ग करण्यात आले आहे. तर ५१ प्रकरणे कौटुंबिक हिंसाचार कायदा २००५ अंतभूत पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच तक्रारी दाखल करून तक्रारकर्ते अथवा दोन्ही पक्षाकडील कुणीच उपस्थित न राहिल्याने व अन्य कारणांमुळे सदर महिला समितीकडे १०८ प्रकरणे प्रलंबित असल्याचेही सांगण्यात आले. जिल्हा महिला तक्रार समितीकडे येणारी प्रत्येक तक्रार जमेपर्यंत आपसी समझोत्याने निपटारा करण्यासाठी पोलीस अधीक्षक निर्मला देवी एस. यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक रेखा काळे, सुरेखा खापर्डे, अणु राऊत, सविता मुुंडे, अंजू वाघ, व्ही.ना. क्षीरसागर आदी करीत आहेत.७ प्रकरणी गुन्हे दाखलदुरावलेल्या २११ दाम्पत्यांना एकत्र आणण्यात सदर केंद्राच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांना यश आले असले तरी १०८ प्रकरणे अद्यापही विविध कारणांमुळे प्रलंबित आहेत. सात प्रकरणी चौकशीत तत्थ आढळल्याने अखेर भादंविच्या कलम ४९८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.