शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

राष्ट्रवादी काँग्रेस-बसपा युतीवर विचारमंथन

By admin | Updated: January 28, 2017 01:11 IST

काँग्रेससोबतची आघाडीची शक्यता मावळत असताना बहुजन समाज पार्टीसोबत हात मिळवणी करुन जिल्हा परिषद

चर्चा सकारात्मक : निर्णयाचा चेंडू बसपाश्रेष्ठींच्या कोर्टात राजेश भोजेकर ल्ल वर्धा काँग्रेससोबतची आघाडीची शक्यता मावळत असताना बहुजन समाज पार्टीसोबत हात मिळवणी करुन जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या बोलणीला यश येत नसल्यामुळे नवा पर्याय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने बसपासोबत युतीबाबत बोलणी सुरू केलेली आहे. बसपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही या युतीबाबत उत्साही आहे. मात्र बसपाने कुणाशीही युती न करता स्वबळावरच लढावे, असा पक्षश्रेष्ठींचा आग्रह असल्यामुळे ही युती होईल किंवा नाही याबाबत साशंकताच आहे. युती केल्यास काही जागांवर बसपाला हमखास यश मिळण्याची शक्यता आहे. हा पक्ष प्रत्येक निवडणुकीला सामोरे जात आला आहे. मात्र काही मतांनी पक्षाच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागत आहे. ही बाब हेरुन स्थानिक पातळीवर युती करण्यास वरिष्ठांनी हिरवी झेंडी दिल्यास पक्षाला सत्तेत सहभागी होता येणे कठीण नाही. या पद्धतीने बसपाचे स्थानिक पदाधिकारी पक्षश्रेष्ठींना पटवून देण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती आहे. मात्र याबाबत वरिष्ठ पातळीवरुन अद्याप होकार आला नसल्याची माहिती आहे. बसपाने उत्तर प्रदेशात सत्ता मिळविण्यासाठी अनेकदा अन्य पक्षांशी हातमिळवणी केली आहे. मग इतर राज्यातील कार्यकर्त्यांनाही आपण सत्तेत सहभागी होण्यासाठी युती करायला काय हरकत, असा प्रश्न पडला आहे. बसपाकडे कॅडर आहे. मात्र विजयाचा आकडा गाठता येणे जड जात आहे. विजयश्री खेचून आणायची असेल, तर युतीशिवाय पर्याय नाही, असा सूरही बसपा कार्यकर्त्यांत उमटत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसकडून युतीचा प्रस्ताव आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार सुरेश देशमुख यांनी सकारात्मक पाऊल उचलले आहे. एक पाऊल बसपालाही टाकायचे आहे. यासाठी परवानगीचा चेंडू बसपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या कोर्टात आहे. याकडे बसपा कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. बसपाने स्थानिक पातळीवर युती करुन निवडणुका लढल्यास पक्षाला हमखास यश मिळेल, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसकडून युतीबाबतचा प्रस्ताव आलेला आहे. हा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडे पाठविला आहे. त्यांची हिरवी झेंडी मिळाल्यास युतीबाबतचा निर्णय होईल. - मोहन राईकवार, जिल्हाध्यक्ष, बसपा, वर्धा.