शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेस-बसपा युतीवर विचारमंथन

By admin | Updated: January 28, 2017 01:11 IST

काँग्रेससोबतची आघाडीची शक्यता मावळत असताना बहुजन समाज पार्टीसोबत हात मिळवणी करुन जिल्हा परिषद

चर्चा सकारात्मक : निर्णयाचा चेंडू बसपाश्रेष्ठींच्या कोर्टात राजेश भोजेकर ल्ल वर्धा काँग्रेससोबतची आघाडीची शक्यता मावळत असताना बहुजन समाज पार्टीसोबत हात मिळवणी करुन जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या बोलणीला यश येत नसल्यामुळे नवा पर्याय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने बसपासोबत युतीबाबत बोलणी सुरू केलेली आहे. बसपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही या युतीबाबत उत्साही आहे. मात्र बसपाने कुणाशीही युती न करता स्वबळावरच लढावे, असा पक्षश्रेष्ठींचा आग्रह असल्यामुळे ही युती होईल किंवा नाही याबाबत साशंकताच आहे. युती केल्यास काही जागांवर बसपाला हमखास यश मिळण्याची शक्यता आहे. हा पक्ष प्रत्येक निवडणुकीला सामोरे जात आला आहे. मात्र काही मतांनी पक्षाच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागत आहे. ही बाब हेरुन स्थानिक पातळीवर युती करण्यास वरिष्ठांनी हिरवी झेंडी दिल्यास पक्षाला सत्तेत सहभागी होता येणे कठीण नाही. या पद्धतीने बसपाचे स्थानिक पदाधिकारी पक्षश्रेष्ठींना पटवून देण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती आहे. मात्र याबाबत वरिष्ठ पातळीवरुन अद्याप होकार आला नसल्याची माहिती आहे. बसपाने उत्तर प्रदेशात सत्ता मिळविण्यासाठी अनेकदा अन्य पक्षांशी हातमिळवणी केली आहे. मग इतर राज्यातील कार्यकर्त्यांनाही आपण सत्तेत सहभागी होण्यासाठी युती करायला काय हरकत, असा प्रश्न पडला आहे. बसपाकडे कॅडर आहे. मात्र विजयाचा आकडा गाठता येणे जड जात आहे. विजयश्री खेचून आणायची असेल, तर युतीशिवाय पर्याय नाही, असा सूरही बसपा कार्यकर्त्यांत उमटत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसकडून युतीचा प्रस्ताव आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार सुरेश देशमुख यांनी सकारात्मक पाऊल उचलले आहे. एक पाऊल बसपालाही टाकायचे आहे. यासाठी परवानगीचा चेंडू बसपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या कोर्टात आहे. याकडे बसपा कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. बसपाने स्थानिक पातळीवर युती करुन निवडणुका लढल्यास पक्षाला हमखास यश मिळेल, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसकडून युतीबाबतचा प्रस्ताव आलेला आहे. हा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडे पाठविला आहे. त्यांची हिरवी झेंडी मिळाल्यास युतीबाबतचा निर्णय होईल. - मोहन राईकवार, जिल्हाध्यक्ष, बसपा, वर्धा.