शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

‘नवतपा’ची उष्णता अंगाची करणार लाहीलाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 22:06 IST

जिल्ह्यात उष्णतेचा कहर सुरू असून उष्णतेच्या लाटेने जनजीवन प्रभावीत झाले आहे. सकाळी ८ वाजतापासूनच सूर्यप्रहार सुरू असल्यामुळे उष्णतेच्या लाटेत अंगाची लाहीलाही होत आहे. शनिवार, २५ मे पासून नवतपाला प्रारंभ होणार आहे. याच दिवशी रोहिणी नक्षत्राला सुरुवात होणार असून नवतपातील उष्णतेचा कहर ८ जूनपर्यंत असणार आहे.

ठळक मुद्दे२५ पासून रोहिणीला सुरुवात, मृग नक्षत्र ७ जूनपासून : कूलरही देईना गारवा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात उष्णतेचा कहर सुरू असून उष्णतेच्या लाटेने जनजीवन प्रभावीत झाले आहे. सकाळी ८ वाजतापासूनच सूर्यप्रहार सुरू असल्यामुळे उष्णतेच्या लाटेत अंगाची लाहीलाही होत आहे. शनिवार, २५ मे पासून नवतपाला प्रारंभ होणार आहे. याच दिवशी रोहिणी नक्षत्राला सुरुवात होणार असून नवतपातील उष्णतेचा कहर ८ जूनपर्यंत असणार आहे.दररोज सूर्य आग ओकत असल्याने दुपारच्या सुमारास रस्त्यावरून जाणे अवघड झाले आहे. शहराच्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. ग्रामीण भागात शेतशिवारात मात्र शेतकरी, शेतमजूर दुपारी १२ ते १ वाजतापर्यंत अंगातून घामाच्या धारा निघेपर्यंत काम करीत असल्याचे चित्र आहे.शहरातील नागरिक उष्णतेच्या उकाड्यापासून दिलासा मिळावा म्हणून वातानुकूलित यंत्रांसोबतच कूलर, पंख्यांचा वापर करीत आहेत. मात्र, उष्णतेचा उकाडा त्यालाही जुमानत नाही. कूलरमध्ये पाणी भरूनसुद्धा गारवा निर्माण होत नाही, यावर्षी अशी परिस्थिती आहे.जिल्ह्यात काही भागात पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. दुपारी रस्ते निर्मनुष्य होत आहेत. शहरासह ग्रामीण भागातील नागरिक उष्णतेच्या लाटेत होळपळून निघत असताना प्रत्येक जण उष्णतेपासून दिलासा मिळावा म्हणून कूलर, पंखा व वातानुकूलित यंत्राचा आधार घेत आहेत.मात्र, जंगलात उन्हातान्हात गुराखी, मेंढपाळ, उंटपाळ हे हिरव्याकंच झाडाखाली शेळ्या मेंढ्यांचे कळप घेऊन उष्णतेपासून बचाव करीत असल्याचे चित्र जंगल शिवारात दिसत आहे. नवतपात उष्णतेचा कहर राहणार आहे.जिल्ह्याच्या तापमानाचा पारा ४४ अंशांच्या वरचएकीकडे १३ कोटी वृक्ष लागवडीचा दावा केला जात आहे, असे असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरूच आहे. लावलेले वृक्ष जगविण्यासाठी कुठलीच प्रभावी यंत्रणा उभारण्यात शासनाला यश आले नाही. त्यामुळे वृक्षलागवड एक इव्हेंटच ठरली आहे. यामुळेच शहरासह ग्रामीण भागातील वनाच्छादित जमिनीचा टक्का लोप पावत आहे. विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर सावली देणारे वृक्ष जमीनदोस्त झाल्याने तापमानाचे चटके अधिक जाणवत आहेत.उन्हाळ्याचा सर्वात मोठा फटका ज्याप्रमाणे माणसांना बसला; त्यापेक्षा कितीतरी अधिक फटका हा मुक्या प्राण्यांना बसला. तीव्र उन्हामुळे पाणवठे आटल्याने बिबट, नीलगाय, माकड मानवी वस्तीकडे वळत आहेत. काही गावांमध्ये तर मोर आणि पोपट तसेच अन्य पक्ष्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. परंतु त्याची कुठे नोंद नसल्याने हा प्रश्न दुर्लक्षित राहिला. उन्हाचा फटका पिण्याच्या पाण्यालाही बसला. बाष्पीभवनाचे प्रमाण अधिक वाढल्याने आहे ते जलसाठेही कोरडे पडले आहेत.

टॅग्स :Temperatureतापमान