शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस अन् मविआला नव्या भिडूची गरज नाही; मनसेला सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळांचा नकार
2
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
3
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
4
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट
5
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरला अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; PSU Stocks मध्ये आजही खरेदी
7
'७ विमाने पाडली होती', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा जुनाच सूर लावला; भारत आणि पाकिस्तानबद्दल काय म्हणाले?
8
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
9
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
10
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
11
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
12
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
13
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
14
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
15
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
16
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
17
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
18
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
19
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
20
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 

थंडीची ‘नव्हाळी’, पारा नऊ अंशावर

By admin | Updated: December 26, 2015 02:11 IST

डिसेंबर महिन्याचा उत्तरार्धही संपत आला; पण थंडीचा जोर वाढत नव्हता. यामुळे यंदा गुलाबी थंडीपासून जिल्हावासी वंचितच राहतात की काय, असे वाटू लागले होते;

जिल्ह्यात शीतलहर : शेकोट्या पेटायला सुरुवातवर्धा : डिसेंबर महिन्याचा उत्तरार्धही संपत आला; पण थंडीचा जोर वाढत नव्हता. यामुळे यंदा गुलाबी थंडीपासून जिल्हावासी वंचितच राहतात की काय, असे वाटू लागले होते; पण गत दोन दिवसांपासून जिल्हा गारठायला सुरूवात झाली आहे. सर्वत्र थंडीची लाट पसरून गुरूवारी रात्री पारा एकदम नऊ अंशांपर्यंत घसरल्याने सर्वांना कापरे भरले. यंदा जिल्ह्यात विशेष पावसाची नोंद झाली नाही. डिसेंबर महिना संपत आला असतानाही विशेष असा गारठा जाणवत नव्हता. नोव्हेंबर महिन्यात दक्षिण भारतातील चेन्नई परिसरात झालेल्या पावसामुळे सुरू झालेली थंडीची लाट पुन्हा ओसरली होती. यामुळे यंदा थंडी पडणार काय, असाच प्रश्न सर्वांना पडला होता; पण आठ ते दिवसांपासून दिल्ली, कोलकाता, गुजरात आदी राज्यांमध्ये तापमान घसरायला लागले आहे. काहीच दिवसांत महाराष्ट्रातही थंडीची लाट पसरणार, असे सांगितले जात होते. चार दिवसांपूर्वी असलेले ढगाळ वातावरण हटून बुधवारपासून जिल्ह्यात गारठा जाणवायला सुरुवात झाली. शुक्रवारी पहाटेपर्यंत जिल्ह्यात पारा ९ अंशांपर्यंत खाली उतरला. या हंगामातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक कमी तापमान असून आणखी काही दिवस गारठा कायम राहणार, असे सांगण्यात येत आहे.(शहर प्रतिनिधी)गरम कपड्यांच्या खरेदीची लगबगउनी कपडे घेऊन दरवर्षी तिब्बती शरणार्थी जिल्ह्यात दाखल होतात. यंदा डिसेंबर महिना ओसरेपर्यंत विशेष गारठा न जाणवल्याने त्यांची दुकानेही आतापर्यंत ओस पडली होती. या चार ते पाच दिवसांपासून गारठ्यात वाढ झाल्याने आता-आता दुकाने सजू लागली आहेत. यावर्षी विशेष व्यवसाय होत नसल्याची भावना तिब्बती विक्रेते व्यक्त करीत आहेत.उशिरा का होईना शेकोट्या पेटल्याडिसेंबर महिना संपायला आला तरीही विशेष थंडी आतापर्यंत जाणवत नव्हती. यामुळे ग्रामीण भागात शेकोट्या अद्याप पेटल्या नव्हत्या; पण आठवडाभरापासून तापमान कमी व्हायला लागल्याने शेकोट्या पेटायला सुरुवात झाली आहे. नागरिक गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत.पिकांच्या वाढीस मदतगहू, चना आदी रबी हंगामातील प्रमुख पिकांसाठी थंड वातावरण आवश्यक असते. आतापर्यंत गारठा नसल्याने पिकांच्या वाढीवर विपरित परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती; पण थंडी वाढल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे. स्वच्छ वातावरणामुळे वाढला गारठाढगाळ वातावरण असल्यास तापमानात घट होते. यामुळे मधले काही दिवस गारठ्यात घट झाली होती; पण आता हवेचा दाब वाढून वातावरण स्वच्छ झाल्याने गारठा वाढायला लागला आहे. शिवाय गार वारे वाहत असल्याने थंडीचा तडाखा अधिकच जाणवत आहे.