शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
4
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
5
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
6
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
7
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
8
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
9
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
10
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
11
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
12
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
13
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
14
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
15
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
16
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
17
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

थंडीची ‘नव्हाळी’, पारा नऊ अंशावर

By admin | Updated: December 26, 2015 02:11 IST

डिसेंबर महिन्याचा उत्तरार्धही संपत आला; पण थंडीचा जोर वाढत नव्हता. यामुळे यंदा गुलाबी थंडीपासून जिल्हावासी वंचितच राहतात की काय, असे वाटू लागले होते;

जिल्ह्यात शीतलहर : शेकोट्या पेटायला सुरुवातवर्धा : डिसेंबर महिन्याचा उत्तरार्धही संपत आला; पण थंडीचा जोर वाढत नव्हता. यामुळे यंदा गुलाबी थंडीपासून जिल्हावासी वंचितच राहतात की काय, असे वाटू लागले होते; पण गत दोन दिवसांपासून जिल्हा गारठायला सुरूवात झाली आहे. सर्वत्र थंडीची लाट पसरून गुरूवारी रात्री पारा एकदम नऊ अंशांपर्यंत घसरल्याने सर्वांना कापरे भरले. यंदा जिल्ह्यात विशेष पावसाची नोंद झाली नाही. डिसेंबर महिना संपत आला असतानाही विशेष असा गारठा जाणवत नव्हता. नोव्हेंबर महिन्यात दक्षिण भारतातील चेन्नई परिसरात झालेल्या पावसामुळे सुरू झालेली थंडीची लाट पुन्हा ओसरली होती. यामुळे यंदा थंडी पडणार काय, असाच प्रश्न सर्वांना पडला होता; पण आठ ते दिवसांपासून दिल्ली, कोलकाता, गुजरात आदी राज्यांमध्ये तापमान घसरायला लागले आहे. काहीच दिवसांत महाराष्ट्रातही थंडीची लाट पसरणार, असे सांगितले जात होते. चार दिवसांपूर्वी असलेले ढगाळ वातावरण हटून बुधवारपासून जिल्ह्यात गारठा जाणवायला सुरुवात झाली. शुक्रवारी पहाटेपर्यंत जिल्ह्यात पारा ९ अंशांपर्यंत खाली उतरला. या हंगामातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक कमी तापमान असून आणखी काही दिवस गारठा कायम राहणार, असे सांगण्यात येत आहे.(शहर प्रतिनिधी)गरम कपड्यांच्या खरेदीची लगबगउनी कपडे घेऊन दरवर्षी तिब्बती शरणार्थी जिल्ह्यात दाखल होतात. यंदा डिसेंबर महिना ओसरेपर्यंत विशेष गारठा न जाणवल्याने त्यांची दुकानेही आतापर्यंत ओस पडली होती. या चार ते पाच दिवसांपासून गारठ्यात वाढ झाल्याने आता-आता दुकाने सजू लागली आहेत. यावर्षी विशेष व्यवसाय होत नसल्याची भावना तिब्बती विक्रेते व्यक्त करीत आहेत.उशिरा का होईना शेकोट्या पेटल्याडिसेंबर महिना संपायला आला तरीही विशेष थंडी आतापर्यंत जाणवत नव्हती. यामुळे ग्रामीण भागात शेकोट्या अद्याप पेटल्या नव्हत्या; पण आठवडाभरापासून तापमान कमी व्हायला लागल्याने शेकोट्या पेटायला सुरुवात झाली आहे. नागरिक गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत.पिकांच्या वाढीस मदतगहू, चना आदी रबी हंगामातील प्रमुख पिकांसाठी थंड वातावरण आवश्यक असते. आतापर्यंत गारठा नसल्याने पिकांच्या वाढीवर विपरित परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती; पण थंडी वाढल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे. स्वच्छ वातावरणामुळे वाढला गारठाढगाळ वातावरण असल्यास तापमानात घट होते. यामुळे मधले काही दिवस गारठ्यात घट झाली होती; पण आता हवेचा दाब वाढून वातावरण स्वच्छ झाल्याने गारठा वाढायला लागला आहे. शिवाय गार वारे वाहत असल्याने थंडीचा तडाखा अधिकच जाणवत आहे.