शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

नऊ भरारी पथकांची कृषी केंद्रांवर करडी नजर

By admin | Updated: May 31, 2014 23:40 IST

यंदाच्या खरीप हंगामात बियाण्यांच्या असलेल्या तुटवड्यामुळे बोगस बियाणे विक्रीचे प्रमाण वाढणार असल्याचे संकेत मिळाले आहे. त्यावर लगाम लावण्याकरिता जिल्ह्यात एकूण नऊ पथक तयार करण्यात आले

वर्धा : यंदाच्या खरीप हंगामात बियाण्यांच्या असलेल्या तुटवड्यामुळे बोगस बियाणे विक्रीचे प्रमाण वाढणार असल्याचे संकेत मिळाले आहे. त्यावर लगाम लावण्याकरिता जिल्ह्यात एकूण नऊ पथक तयार करण्यात आले असून ते पथक जिल्ह्यातील कृषी केंद्रांची तपासणी करणार आहे. यात एक जिल्हास्तरावर तर आठ पथके तालुका स्तरावर कार्यरत राहणार आहेत. खरिपात कापाशीचा पेरा वाढणार असल्याचे भाकीत करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यात कपाशिच्या बियाण्यांची एकूण ८.२१ लाख पाकीटे आवश्यक आहेत. असे असले तरी जिल्ह्यात आजच्या घडीला अर्धेच बियाणे उपलब्ध आहे. येत्या एक दोन दिवसात जिल्ह्यात बियाणे येणार असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.  सोयाबीनच्या बियाण्याचा तुटवडाही यंदाही जानवणार आहे. यामुळे शेतकर्‍यांनी त्यांच्या घरी असलेल्या बियाण्यांचा वापर करण्याच्या सूचना यापूर्वीच केल्या आहेत. जिल्ह्यात नियोजित असलेल्या पेर्‍याकरिता १.0८ लाख क्विंटल बियाण्यांची गरज आहे. या दोन्ही पिकांच्या बियाण्यांचा आज तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे जिल्ह्यात बोगस बियाणे येणार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यातून होणारा काळाबाजार रोखण्याकरिता जिल्ह्यात नऊ पथक तयार करण्यात आले आहेत. या पथकाद्वारे तपासणी करण्यात येत आहे. शिवाय शेतकर्‍यांना कुठे कोणती अडचण निर्माण झाल्यास त्या कृषी विभागाला पुरविण्याकरिता एक तक्रार निवारण केंद्र तयार करण्यात आली आहे. या  केंद्रावर संपर्क साधत शेतकर्‍यांनी त्यांच्या तक्रारी सादर करण्याच्या सूचना आहेत. (प्रतिनिधी)