शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

२६० हेक्टरवरील तूर पिकावर निसर्गाची वक्रदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 06:00 IST

धुक्याच्या सावटाने आर्वी तालुक्यातील तूर उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. अतीथंडी व धूक्यामुळे उभ्या तुरीवर दव गेल्याने तूर पीक वाकल्यागत अवस्थेत बघावयास मिळत आहे. तूर पिकावरील या व्हायरस गोगामुळे आर्वी तालुक्यातील २६० हेक्टरवरील पीक हातचे जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देथंडी, धुके अन् दवाने वाढविली चिंता । गोगा व्हायरसचा प्रादुर्भाव

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : मागील आठ दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरणासह धुक्याचे सावट आहे. इतकेच नव्हे, तर दिवसेंदिवस पारा खाली सरकत आहे. यामुळे तूर पिकाला याचा सर्वाधिक फटका बसत आहे. अशातच तूर पिकावर गोगा व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून येत असून पीकही वाकल्यागत दिसून येत आहे. एकूणच तालुक्यातील २६० हेक्टरवरील तूर पिकांवर सध्या निसर्गाची वक्रदृष्टीच असल्याचे शेतकरी सांगतात.धुक्याच्या सावटाने आर्वी तालुक्यातील तूर उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. अतीथंडी व धूक्यामुळे उभ्या तुरीवर दव गेल्याने तूर पीक वाकल्यागत अवस्थेत बघावयास मिळत आहे. तूर पिकावरील या व्हायरस गोगामुळे आर्वी तालुक्यातील २६० हेक्टरवरील पीक हातचे जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. रोख पीक म्हणून तूर पिकाकडे बघितले जाते. परंतु, डिसेंबर महिन्यात याच पिकावर किडींनी अटॅक केला. तर आता निसर्गाची वक्रदृष्टीच या पिकावर पडली आहे. परतीच्या पावसामुळे पूर्वीच तालुक्यातील शेतकरी हवालदील झाला. अशातच खरिपातील सोयाबीनचे उत्पन्नही समाधानकारक राहिले नाही. परतीच्या पावसाचा फटकाच सोयाबीन पिकाला बसला. कपाशी पिकावर बोंडअळीने आक्रमण केल्याने उत्पादनातही घट येत आहे. शिवाय कपाशीने दगा दिल्याने तूर पिकावर तालुक्यातील शेतकऱ्यांची भिस्त होती. परंतु, मागील आठ दिवसापासून शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. तालुक्यातील वाठोडा, वागदा, अहिरवाडा, इठलापूर, नांदपूर, सर्कसपूर, निंबोली (शेंडे), लाडेगाव, टाकरखेडा, जळगाव, वर्धमनेर, देऊरवाडा, टोणा, एकलारा, मांडला, सावलापूर, हरदेली, गुमगाव, दहेगाव, पाचेगाव, पिंपळखुटा, खुबगाव, नांदोरा, रोहणा, वडगाव, चिंचोली, पाचोड यासह तालुक्यातील २६ गावामधील २६० तूर पिकावर या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा ‘अटॅक’चिकणी (जामणी) : मागील काही दिवसांपासून परिसरात ढगाळी वातावरण आहे. या ढगाळी वातावरणामुळे तूर पिकांवर शेंगा पोखरणाºया अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सदर किडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तूर उत्पादकांना पिकावर फवारणी करावी लागणार आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होणार असून तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. वास्तविक पाहला २०१९ हे वर्ष शेतकऱ्यांच्या अडचणीत वेळोवेळी भर टाकणारेच ठरले आहे. खरिपाच्या सुरूवातीला पावसाने दगा दिला. तर त्यानंतरच्या सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाला फटका बसला. कसे बसे कपाशी पीक बहरले असता त्यावर गुलाबी बोंडअळीने अटॅक केला. तर आता तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. इतकेच नव्हे, तर थंडीतही वाढ झाली असून पहाटेच्या सुमारास दव पडत असल्याने चणा व गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. एकूणच यंदाच्या वर्षी शेतमालाला मिळत असलेल्या भावाच्या तुलनेत परिसरातील शेतकºयांना उत्पादन खर्च जादाच लागल्याचे वयोवृद्ध शेतकरी सांगतात. शेतातील तणाची विल्हेवाट लावताना परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी तणनाशकाचा वापर केला. अशातच काही शेतकऱ्यांना कपाशी पिकाला मुकावे लागले. तर परतीच्या पावसाने सोयाबीन उत्पादकांचे कंबर्डे मोडले. सध्या तूर पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. परंतु, अळीचा प्रादुर्भाव या पिकावर असल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी करावी लागतेय तारेवरची कसरतचिकणी (जामणी) परिसरात रोही, रान डुक्कर आदी वन्यप्राण्यांचे मोठाले कळप आहेत. त्यांच्याकडून कापूस, तूर, चणा, गहू आदी पिकांची नासाडी केली जात आहे. शेतातील उभ्या पिकाच्या संगोपनासह वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. वन्यप्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी आहे.