शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अस्थिविसर्जनातून निसर्ग संगोपनाचा संदेश

By admin | Updated: May 20, 2016 01:53 IST

अंत्यसंस्कारानंतर चितेची राख तसेच अस्थी नदीत विसर्जन केल्याने नदी प्रदूषित होते.

चिलवीरवार कुटुंबियांनी ठेवला आदर्श : अस्थी, रक्षा स्मशानभूमीत पुरून त्यावर वृक्षारोपणहिंगणघाट : अंत्यसंस्कारानंतर चितेची राख तसेच अस्थी नदीत विसर्जन केल्याने नदी प्रदूषित होते. हे प्रदूषण टाळण्याकरिता स्मशानभूमीतच खड्डा करून त्यात अस्थी, चितेची राख पुरून त्यावर वटवृक्षाचे रोपटे लावत येथील तहसील वॉर्डातील लेबर कॉलनीत चिलवीरवार कुटुंबियांनी निसर्ग संगोपणाचा नवीन पायंडा घालून दिला आहे.अस्थी, चितेची राख, पूजाविधीत काढलेले डोक्यांवरील केस नदीत विसर्जन करण्याची परंपरा आहे; पण यातून नदीपात्राचे प्रदूषण होते. हे प्रदूषण थांबविण्याचा निर्णय चिलवीरवार कुटुंबियांनी घेतला. यातून समाजापुढे पर्यावरण रक्षणाचा एक आगळा आदर्श ठेवला गेला.खड्ड्यात ही राख, अस्थी ठेवून त्यावर वटवृक्षाचे रोपटे लावले. या वटवृक्षाच्या सुरक्षेकरिता सुरक्षा कठडाही चिलवीरवार कुटुंबियांनी बसविला. या झाडातून आपल्या वडिलांची आठवण जपण्याचा संकल्पही त्यांनी येथे सोडला. येथील श्याम बळीराम चिलवीरवार यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वणा नदीच्या तिरावरील स्मशानभूमीत अग्निसंस्कार करण्यात आला; पण यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी मृतदेहावरील निर्माल्य, कापलेले केस नदीत विसर्जित न करता स्मशानभूमीवर खड्डा करून त्यात टाकले. यानंतर अस्थी, चितेच्या राखेचे विसर्जन कुठल्याही नदीत वा तलावात न करता स्मशानभूमित एका खड्ड्यात पुरून त्यावर वडाचे रोप लावण्यात आले. यावेळी श्यामराव चिलवीरवार यांची मुले विष्णु चिलवीरवार, अनिल चिलवीरवार, उषा परकोटवार, सामाजिक कार्यकर्ते धनराज गोल्हर आदी उपस्थित होते. सामाजिक बांधिलकीतून आणि पर्यावरण रक्षणाला हातभार लावता यावा म्हणून आम्ही हा निर्णय घेतला, असे विचार चिलवीरवार कुटुंबातील सदस्यांनी यावेळी व्यक्त केले.(तालुका प्रतिनिधी)