शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
4
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
5
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
6
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
7
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
8
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
9
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
10
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
11
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
12
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
14
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
15
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
16
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
17
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
18
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
19
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा

अस्थिविसर्जनातून निसर्ग संगोपनाचा संदेश

By admin | Updated: May 20, 2016 01:53 IST

अंत्यसंस्कारानंतर चितेची राख तसेच अस्थी नदीत विसर्जन केल्याने नदी प्रदूषित होते.

चिलवीरवार कुटुंबियांनी ठेवला आदर्श : अस्थी, रक्षा स्मशानभूमीत पुरून त्यावर वृक्षारोपणहिंगणघाट : अंत्यसंस्कारानंतर चितेची राख तसेच अस्थी नदीत विसर्जन केल्याने नदी प्रदूषित होते. हे प्रदूषण टाळण्याकरिता स्मशानभूमीतच खड्डा करून त्यात अस्थी, चितेची राख पुरून त्यावर वटवृक्षाचे रोपटे लावत येथील तहसील वॉर्डातील लेबर कॉलनीत चिलवीरवार कुटुंबियांनी निसर्ग संगोपणाचा नवीन पायंडा घालून दिला आहे.अस्थी, चितेची राख, पूजाविधीत काढलेले डोक्यांवरील केस नदीत विसर्जन करण्याची परंपरा आहे; पण यातून नदीपात्राचे प्रदूषण होते. हे प्रदूषण थांबविण्याचा निर्णय चिलवीरवार कुटुंबियांनी घेतला. यातून समाजापुढे पर्यावरण रक्षणाचा एक आगळा आदर्श ठेवला गेला.खड्ड्यात ही राख, अस्थी ठेवून त्यावर वटवृक्षाचे रोपटे लावले. या वटवृक्षाच्या सुरक्षेकरिता सुरक्षा कठडाही चिलवीरवार कुटुंबियांनी बसविला. या झाडातून आपल्या वडिलांची आठवण जपण्याचा संकल्पही त्यांनी येथे सोडला. येथील श्याम बळीराम चिलवीरवार यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वणा नदीच्या तिरावरील स्मशानभूमीत अग्निसंस्कार करण्यात आला; पण यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी मृतदेहावरील निर्माल्य, कापलेले केस नदीत विसर्जित न करता स्मशानभूमीवर खड्डा करून त्यात टाकले. यानंतर अस्थी, चितेच्या राखेचे विसर्जन कुठल्याही नदीत वा तलावात न करता स्मशानभूमित एका खड्ड्यात पुरून त्यावर वडाचे रोप लावण्यात आले. यावेळी श्यामराव चिलवीरवार यांची मुले विष्णु चिलवीरवार, अनिल चिलवीरवार, उषा परकोटवार, सामाजिक कार्यकर्ते धनराज गोल्हर आदी उपस्थित होते. सामाजिक बांधिलकीतून आणि पर्यावरण रक्षणाला हातभार लावता यावा म्हणून आम्ही हा निर्णय घेतला, असे विचार चिलवीरवार कुटुंबातील सदस्यांनी यावेळी व्यक्त केले.(तालुका प्रतिनिधी)