शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
2
अमोल मिटकरींचा यू-टर्न! ते ट्विट मागे घेतले, दिलगिरी व्यक्त केली; नेमकं प्रकरण काय?
3
धार्मिक विधीसाठी ठेवलेला १ कोटींचा सोन्याचा मंगल कलश चोरला! आधी धोती घालून रेकी, नंतर साधला डाव
4
पोस्ट ऑफिसच्या PPF योजनेत दरवर्षी ₹५०,००० जमा केल्यास मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
5
वय हरलं अन् स्वप्नं जिंकली! ३ गिर्यारोहकांचा अनोखा आदर्श, एव्हरेस्टवर फडकावला तिरंगा
6
लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत दिसला जान्हवीचा बॉयफ्रेंड, गुलालाने माखला शिखर पहारीयाचा चेहरा, म्हणतो...
7
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
8
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
9
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले
10
"नातवासाठी घेतलेल्या नवीन TESLA खेळण्याची किंमत किती आहे काका?", मराठी अभिनेत्याचा प्रताप सरनाईकांना टोला
11
Punjab Flood : आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू
12
अरेरे! लायब्ररी, जमीन विकून बायकोला शिकवलं; पोलिसात नोकरी मिळताच 'तिने' नवऱ्याला सोडलं
13
"घरच्यांनी लग्नासाठी नकार दिला असता तर आम्ही...", प्रिया आणि उमेशने केला मोठा खुलासा
14
आरोग्य आणि जीवन विमा आता जीएसटी-मुक्त! पण प्रत्यक्षात किती प्रीमियम स्वस्त होईल?
15
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
16
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
17
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
18
३० वर्षीय विवाहितेचे १७ वर्षांच्या तरुणाशी संबंध, मुलीने आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यावर...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
20
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल

पाच ठरावांनी राष्ट्रीय संमेलनाचा समारोप

By admin | Updated: February 23, 2017 00:48 IST

नई तालीम समिती परिसरातील शांती भवन येथे ‘गांधी १५०’ जयंती अभियानांतर्गत दोन दिवसीय राष्ट्रीय संमेलन घेण्यात आले.

गांधी १५० अभियान : ५ आॅक्टोबर रोजी समित्यांचे विधिवत गठण सेवाग्राम : नई तालीम समिती परिसरातील शांती भवन येथे ‘गांधी १५०’ जयंती अभियानांतर्गत दोन दिवसीय राष्ट्रीय संमेलन घेण्यात आले. विविध राज्यातील २६९ प्रतिनिधींचा सहभाग असलेल्या या संमेलनात पाच ठराव घेण्यात आले. या ठरावांसह ५ आॅक्टोबर रोजी विविध समित्या गठित करण्याचा निर्णय घेत संमेलनाची सांगता करण्यात आली. सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर यांनी ठरावाचे वाचन केले. यात आपण सर्वांना गांधीजींना लोकापर्यंत पोहोचवायचे असून न्यायपूर्ण अहिंसक व मानवीय समाजाप्रती निर्भय गांधींना लोकांसमोर मांडावे. गांधीजींच्या विचारांची भूमी असून विचार नित्यनूतन असल्याने सदैव मार्गदर्शन देणारा आहे. या मिशनमध्ये राहणारा आमच्या सोबत सहयोगी राहील. आम्हाला सत्ता निरपेक्ष राहून, लोकाधारीत राहून काम करायचे आहे. आम्हाला माहिती आहे की, आव्हाने खूप आहे, सत्ता, सफलता व संपत्तीकांक्षी समाजात शेवटच्या व्यक्तीशी प्रतिबद्ध राहून कार्यसिद्धीस तयार राहावे आदींचा समावेश होता. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर तर अतिथी म्हणून सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही व गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू राजेंद्र खेमानी उपस्थित होते. याप्रसंगी खेमानी यांनी राष्ट्रीय कार्यक्रमाला रचनात्मक कार्याची जोड मिळाली पाहिजे, असे सांगितले. महादेव विद्रोही यांनी दोन दिवस गांधी १५० वर संमेलन झाले. यात पुनर्रचित समिती बनवावी व ती त्वरित तयार करून विचार आणि कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात यावे, असे सांगितले. मठकर यांनी समितीच्या सूचना देऊन राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाची रूपरेषा ठरवून लवकरच कार्यान्वित करण्यात येईल, असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन अनिल फरसोले यांनी केले तर आभार डॉ. सुगन बरंठ यांनी मानले. प्रशांत गुजर यांनी गीत सादर केले. आश्रमात सकाळी घंटीघर ते बापूकुटीपर्यंत रामधून, सर्वधर्म प्रार्थना झाली. सायंकाळी प्रार्थना भूमीवर सूतकताई व प्रार्थना झाली. यावेळी जयवंत मठकर, डॉ. श्रीराम जाधव, भावेष चव्हाण, बाबा खैरकर, अशोक गिरी, हिराभाई, जालंदरनाथ, डॉ. शिवचरण ठाकुर आदी उपस्थित होते.(वार्ताहर) राष्ट्रीय समितीची घोषणा गांधी १५० च्या राष्ट्रीय समितीची घोषणा करण्यात आली. उपस्थित सर्व सहयोगी असल्याचे मान्य करीत संघटन व संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले. समविचारांना जोडा. सहभागींनी किमान पाच लोकांना तयार करावे. ५ जूनपर्यंत राष्ट्रीय समिती घोषित होईल व ५ आॅक्टोबरला राष्ट्रीय संमेलन घेण्यात येईल. राज्य स्तरावर संमेलन व्हावे, कार्यालय सेवाग्राम आश्रमात आहे. रवींद्र रुख्मीणी पंढरीनाथ, प्रदीप के., रमेश ओझा समितीचे काम पाहणार आहे.