शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
2
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
3
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
4
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
5
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
6
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
7
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
8
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
9
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
10
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
11
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
12
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
13
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
14
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
15
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
16
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
17
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
18
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
19
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
20
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड

पाच ठरावांनी राष्ट्रीय संमेलनाचा समारोप

By admin | Updated: February 23, 2017 00:48 IST

नई तालीम समिती परिसरातील शांती भवन येथे ‘गांधी १५०’ जयंती अभियानांतर्गत दोन दिवसीय राष्ट्रीय संमेलन घेण्यात आले.

गांधी १५० अभियान : ५ आॅक्टोबर रोजी समित्यांचे विधिवत गठण सेवाग्राम : नई तालीम समिती परिसरातील शांती भवन येथे ‘गांधी १५०’ जयंती अभियानांतर्गत दोन दिवसीय राष्ट्रीय संमेलन घेण्यात आले. विविध राज्यातील २६९ प्रतिनिधींचा सहभाग असलेल्या या संमेलनात पाच ठराव घेण्यात आले. या ठरावांसह ५ आॅक्टोबर रोजी विविध समित्या गठित करण्याचा निर्णय घेत संमेलनाची सांगता करण्यात आली. सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर यांनी ठरावाचे वाचन केले. यात आपण सर्वांना गांधीजींना लोकापर्यंत पोहोचवायचे असून न्यायपूर्ण अहिंसक व मानवीय समाजाप्रती निर्भय गांधींना लोकांसमोर मांडावे. गांधीजींच्या विचारांची भूमी असून विचार नित्यनूतन असल्याने सदैव मार्गदर्शन देणारा आहे. या मिशनमध्ये राहणारा आमच्या सोबत सहयोगी राहील. आम्हाला सत्ता निरपेक्ष राहून, लोकाधारीत राहून काम करायचे आहे. आम्हाला माहिती आहे की, आव्हाने खूप आहे, सत्ता, सफलता व संपत्तीकांक्षी समाजात शेवटच्या व्यक्तीशी प्रतिबद्ध राहून कार्यसिद्धीस तयार राहावे आदींचा समावेश होता. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर तर अतिथी म्हणून सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही व गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू राजेंद्र खेमानी उपस्थित होते. याप्रसंगी खेमानी यांनी राष्ट्रीय कार्यक्रमाला रचनात्मक कार्याची जोड मिळाली पाहिजे, असे सांगितले. महादेव विद्रोही यांनी दोन दिवस गांधी १५० वर संमेलन झाले. यात पुनर्रचित समिती बनवावी व ती त्वरित तयार करून विचार आणि कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात यावे, असे सांगितले. मठकर यांनी समितीच्या सूचना देऊन राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाची रूपरेषा ठरवून लवकरच कार्यान्वित करण्यात येईल, असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन अनिल फरसोले यांनी केले तर आभार डॉ. सुगन बरंठ यांनी मानले. प्रशांत गुजर यांनी गीत सादर केले. आश्रमात सकाळी घंटीघर ते बापूकुटीपर्यंत रामधून, सर्वधर्म प्रार्थना झाली. सायंकाळी प्रार्थना भूमीवर सूतकताई व प्रार्थना झाली. यावेळी जयवंत मठकर, डॉ. श्रीराम जाधव, भावेष चव्हाण, बाबा खैरकर, अशोक गिरी, हिराभाई, जालंदरनाथ, डॉ. शिवचरण ठाकुर आदी उपस्थित होते.(वार्ताहर) राष्ट्रीय समितीची घोषणा गांधी १५० च्या राष्ट्रीय समितीची घोषणा करण्यात आली. उपस्थित सर्व सहयोगी असल्याचे मान्य करीत संघटन व संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले. समविचारांना जोडा. सहभागींनी किमान पाच लोकांना तयार करावे. ५ जूनपर्यंत राष्ट्रीय समिती घोषित होईल व ५ आॅक्टोबरला राष्ट्रीय संमेलन घेण्यात येईल. राज्य स्तरावर संमेलन व्हावे, कार्यालय सेवाग्राम आश्रमात आहे. रवींद्र रुख्मीणी पंढरीनाथ, प्रदीप के., रमेश ओझा समितीचे काम पाहणार आहे.