शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

नटाळा हस्तांतरण; जिल्हा परिषद अनभिज्ञ

By admin | Updated: February 13, 2015 00:28 IST

सुकळी प्रकल्पाच्या निर्मितीसाठी नटाळा गाव विस्थापित करण्यात आले़ ग्रामस्थांच्या जमिनी संपादित करून त्यांना कारला रोडलगत पट्टे देण्यात आले़ ...

वर्धा : सुकळी प्रकल्पाच्या निर्मितीसाठी नटाळा गाव विस्थापित करण्यात आले़ ग्रामस्थांच्या जमिनी संपादित करून त्यांना कारला रोडलगत पट्टे देण्यात आले़ मिळालेल्या मोबदल्यात ग्रामस्थांनी आपला निवारा उभारला; पण अद्याप तेथील ग्रामस्थांना मुलभूत सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत़ असे असले तरी लघु पाटबंधारे विभागाने मात्र नटाळा गावाचे परस्पर हस्तांतरण केले़ हा प्रकार १३ आॅक्टोबर २०११ रोजी करण्यात आला़ याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाला अंधारात ठेवण्यात आले़ शिवाय मुलभूत सुविधा न देता हस्तांतरण होऊ शकत नसल्याचा निर्वाळा जि़प़ प्रशासनाने दिल्याने लघु पाटबंधारे विभागाची गोची झाली आहे़नटाळा गावाचे पुनर्वसन करण्यात आले; पण तेथील नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत़ पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना चार किमी पायपीट करावी लागत आहे़ नटाळा गावाला पाणी पुरविण्यासाठी कारला येथील विहिरीचा आधार घेण्यात आला, पाण्याची टाकी बांधली, पाईपलाईन टाकली; पण नळाला एक थेंबही पाणी आले नाही़ भूजल सर्वेक्षण यंत्रणेने अहवाल न दिल्याने कारला येथे विहीर खोदली व दोन हातपंप केल्याची माहिती लघु पाटबंधारे विभाग देत आहे़ हे खरे असले तरी अद्यापही नटाळा गावात पाणी पोहोचलेले नाही़ पाण्यासाठी दिलेले सार्वजनिक नळ तुटक्या अवस्थेत आहे़ नागरिकांच्या घरांपर्यंत पाईप पोहोचले; पण पाणी आले नाही़ नटाळा पुनर्वसन वसाहतीमधील रस्त्यांचे खडीकरण २०१० मध्ये करण्यात आले़ तेव्हापासून त्या रस्त्यांचे डांबरीकरण झालेच नाही़ सध्या रस्त्यावर गिट्टीचा खच दिसून येतो़ यामुळे त्या भागातील नागरिकांना आपली वाहने चालविणेही कठीण झाले आहे़ हा प्रकार केवळ एकाच रस्त्याबाबत नाही तर या वसाहतीतील प्रत्येक रस्त्यावर केवळ गिट्टीचाच खच दिसून येतो़ सांडपाण्यासाठी नाल्या केल्यात; पण त्या नाल्यांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने अनेक ठिकाणी नाल्या जमिनीत रूतल्या आहेत़ काही ठिकाणी नाल्या भंगलेल्याही दिसून येतात़ शाळा, समाज मंदिराचे बांधकाम करण्यात आले; पण तारेचे कुंपण करण्यात आलेले नाही़ बांधकाम करारनाम्यात अंतर्भाव नसल्याने कुंपण करण्यात आले नसल्याचे लघु पाटबंधारे विभागाने नमूद केले आहे़ ग्रामस्थांना अद्याप पाणी पुरवठा झालाच नसल्याचा आरोप होत असताना लघु पाटबंधारे विभाग मात्र २०११ पर्यंत पाणी पुरवठा केल्याचे उत्तर देत आहे़ पिपरी ग्रामपंचायतीने विजेचे देयक अदा न केल्याने महावितरणने मिटर काढून नेल्याचेही उत्तरात नमूद केले आहे़ वास्तविक, नटाळा पुनर्वसितांना अद्याप पाणी पुरवठाच झाला नसल्याचे सांगण्यात येते़ शिवाय हस्तांतरण प्रक्रियाच अधांतरी असल्याने पिपरी ग्रा़पं़ प्रशासनानेही याकडे लक्ष दिल्याचे दिसत नाही़ परस्पर हस्तांतरण प्रक्रिया करता येत नसताना लघु पाटबंधारे विभागाने हा प्रताप कसा केला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ नागरी सुविधा पूर्ण होण्यापूर्वी कुठल्याही पुनर्वसित वसाहतीचे हस्तांतरण करता येत नाही; पण संबंधित विभागाने शासनाच्या नियमांना बगल देत हे सोपस्कार पार पाडले़ यात जिल्हा परिषद प्रशासनालाही अंधारात ठेवण्यात आले़ ही बाब लघु पाटबंधारे विभाग मान्य करीत नसली तरी जि़प़ उपकार्यकारी अधिकारी (ग्रा़पं़) यांनी १३ आॅक्टोबर २०११ रोजी दिलेल्या माहितीमध्ये ते सिद्ध झाले आहे़ यामुळे लघु पाटबंधारे विभागच नटाळा प्रकरणात लपवा-छपवी करीत असल्याचे दिसते़ याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे़(कार्यालय प्रतिनिधी)उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पत्राने फोडले बिंगलघु पाटबंधारे विभागाच्यावतीने १३ आॅक्टोबर २०११ रोजी नटाळाचे हस्तांतरण केल्याचे उत्तरात नमूद करून केवळ ग्रामस्थांचीच नव्हे तर जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाचीही दिशाभूल केली़ माहिती अधिकार कायद्यांतर्गत प्रज्वल चोरे यांनी माहिती मागितली असता उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि़प़ वर्धा यांनी दिलेल्या पत्रावरून हे बिंग फुटले़ हे पत्र १ जानेवारी २०१५ रोजी देण्यात आले आहे़ या पत्रात मौजा नटाळा पुनर्वसन पिपरी (मेघे) येथील १८ नागरी सुविधा अद्याप पूर्ण न झाल्याने नटाळा पुनर्वसन वसाहत जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित झाली नसल्याचे नमूद केले आहे़