शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

नाशिकच्या विनोदिनी आणि राज पीटगे-कालगी यांना ‘माँ-बाबा पुरस्कार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 10:58 IST

येथील नयी तालीमचे शिल्पकार आशादेवी आणि ई.डब्ल्यू. आर्यनायकम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणार ‘माँ-बाबा पुरस्कार’ यावर्षी नाशिक येथील आ विद्यालयाच्या विनोदिनी व राज पिटके- कालगी या दाम्पत्याला जाहीर झाला आहे.

ठळक मुद्देनयी तालीम समितीचे आयोजन १८ नोव्हेंंबरला होणार सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : येथील नयी तालीमचे शिल्पकार आशादेवी आणि ई.डब्ल्यू. आर्यनायकम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणार ‘माँ-बाबा पुरस्कार’ यावर्षी नाशिक येथील आ विद्यालयाच्या विनोदिनी व राज पिटके- कालगी या दाम्पत्याला जाहीर झाला आहे. हा पुरस्कार १८ नोव्हेंबरला सायंकाळी ४ वाजता नयी तालीमच्या शांती भवनात आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात येईल.देशासाठी सर्वोत्तम शिक्षण पद्धती कशी असावी? यासंदर्भात महात्मा गांधींनी १९३७ मध्ये नयी तालीम ही योजना देशापुढे ठेवली. त्यासाठी बापूंनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्याकडून आशादेवी आर्यनायकम आणि ई.डब्ल्यू. आर्यनायकम यांना या शिक्षण पद्धतीकरिता वर्ध्यात आणले होते. बापूंनी जी संस्था सेवाग्रामला स्थापन केली होती त्यास ‘हिंदुस्थानी तालिमी संघ’ असे नाव दिले होते. तीच १९७२ नंतर ‘नयी तालीम समिती’ म्हणून नोंदणीकृत झाले.या संस्थेच्यावतीने आशादेवी आणि ई.डब्ल्यू.आर्यनायकम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ २०१२ पासून ‘माँ-बाबा सन्मान’ दिल्या जातो. आशादेवी आणि ई.डब्ल्यू.आर्यनायकम यांना विद्यार्थी मॉ-बाबा म्हणून संबोधित होते. म्हणून या पुरस्काराचे नाव ‘माँ-बाबा सन्मान’ असे ठेवण्यात आले आहे. नयी तालीमच्या शिल्पकार असलेल्या या दोन्ही स्वयंप्रकाशित ताऱ्यांची उर्जा मिळावी व त्यांची स्मृति जोपासली जावी या उद्देशाने हा पुरस्कार दिल्या जातो. जे आजही नयी तालीम शिक्षण पद्धतीने आजचा अभ्यासक्रम शिकवितात. नव्या प्रयोगातून शिक्षणाचे विकल्प निर्माण करतात. अशा दाम्पत्याची भारतातून या पुरस्कारासाठी निवड केली जाते. यावर्षी नाशिक येथील आनंद निकेतन विद्यालयाच्या विनोदिनी व राज पिटके-कालगी या दाम्पत्याची निवड करण्यात आली आहे. ३१ हजार रुपये रोख,मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. येत्या १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी नयी तालीमच्या शांती भवनाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाला हा सन्मान दिल्या जाणार आहे. या कार्यक्रमाला शिक्षण तज्ज्ञ व माजी मुख्य सचिव तथा प्रशासकीय अकादमीचे प्राचार्य शंरदचंद्र बेहर आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषदेचे डॉ. के.जी. प्रसन्ना यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुगन बरंठ हे अध्यक्षस्थान भूषवतील.

टॅग्स :Sewagramसेवाग्राम