शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

नाफेडला विकलेल्या तुरीचे चुकारे नाही; शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 11:26 IST

नाफेडला तुरी विकून दोन महिन्यांचा काळ लोटला तरी शासनाकडून चुकारा न मिळाल्याने शेतकऱ्यांनी वेळेवरची आर्थिक अडचण तर भागली नाहीच; मात्र खुल्या बाजारात तुरीने सहा हजारांवर उसळी घेतल्याने आर्थिक नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा  : नाफेडला तुरी विकून दोन महिन्यांचा काळ लोटला तरी शासनाकडून चुकारा न मिळाल्याने शेतकऱ्यांनी वेळेवरची आर्थिक अडचण तर भागली नाहीच; मात्र खुल्या बाजारात तुरीने सहा हजारांवर उसळी घेतल्याने आर्थिक नुकसान झाले. चाळणीतून पडलेल्या बारीक तुरी मातीमोल भावाने विकण्याची पाळी तुर उत्पादकांवर आली.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विकला तर त्याचा चुकारा ४८ तासांच्या आत शेतकऱ्यांना द्यावा, असा शासनाचा दंडक नव्हे, स्पष्ट नियम आहे. खासगी व्यापाऱ्यांनी तो पाळावा, अशी त्यांच्यावर सक्ती असते. मात्र शासनाकडूनच वर्षानुवर्षापासून नियम पायदळी तुडविला जात आहे. गतवर्षी शासनाने नाफेड या संस्थेमार्फत शेतकऱ्यांच्या तुरी खरेदी केल्या. त्याचे पैसे सहा महिन्यांपर्यंत दिले नाही. मागीलवर्षी खुल्या बाजारात तुरीला हमीभावापेक्षा कमी भाव असल्याने शासनाला मोठ्या प्रमाणात तुरी खरेदी कराव्या लागल्या. त्यामुळे चुकारे विलंबाने मिळालेत. हे अन्यायकारी असले तरी समजण्यासारखे होते. यावेळी मात्र दुष्काळाच्या निकषावर शासनाने केवळ एकरी अडीच क्विंटल एवढ्या कमी तुरी घेतल्या. खुल्या बाजारात लवकरच तुरीचे भाव हमीभावाच्या आसपास आल्याने शिवाय चाळणीच्या जाचक अटीमुळे अनेक तूर उत्पादकांनी शासनाला तुरी विकण्यापेक्षा खासगी व्यापाऱ्यांना विकून आर्थिक अडचण भागविली. ज्यांनी आपल्या तुरी नाफेडला विकल्या, त्यांना चुकारा न मिळाल्याने त्यांची मात्र आर्थिक अडचण कायम आहे. खुल्या बाजारात भाव सहा हजारांवर गेल्याने शेतकऱ्यांचे प्रती क्विंटल पाचशेच्यावर नुकसान झाले. तसेच शेतकऱ्यांनी नाफेड केंद्रावर आणूच नये ही नकारात्मकता केंद्रावरील अधिकाऱ्यांनी जोपासल्याने चाळणीतून जास्तीत जास्त तुरी खाली कशा पडतील, अशा हमालांना गुप्त सूचना दिल्याने चाळणीतून पडलेल्या तुरी अनेक शेतकऱ्यांनी तेथेच खासगी व्यापाऱ्यांना मातीमोल भावाने विकाव्या लागल्या. कित्येक शेतकऱ्यांना तुरी जनावरांना खाऊ घालाव्या लागल्या. एवढ्या कमी प्रमाणात व दर्जेदार तुरी खरेदी केल्यावर दोन-दोन महिने चुकारे मिळू नये, ही शेतकऱ्यांची थट्टाच असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. चुकारे मिळतील, तेव्हा विलंबाच्या कालावधीचे व्याज देणार नाही, ही बाब तूर उत्पादकांवर अन्याय करणारी आहे. एकंदरीत शेतकऱ्यांवर अन्याय करताना कोणतीच कसर ठेवायची नाही, तरीही त्याला जगाचा पोशिंदा म्हणून कोरडी सद्भावना दाखवायची हाच अनुभव असतो, हे मात्र खरे!

२५ मार्च २०१९ ला आर्वी केंद्रावर नाफेडला तुरी विकल्या. अद्याप चुकारा मिळाला नाही. चाळणीमुळेही बऱ्याच तुरी घरी आणाव्या लागल्या, तर आता बाहेरचे भाव वाढल्याने तिहेरी नुकसान झाले.- बाळा राऊत, शेतकरी रोहणा .

टॅग्स :agricultureशेती