शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

वर्धा रेल्वे स्थानकाला राष्ट्रपिता महात्मा गांधींचे नाव देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 22:42 IST

वर्धा जिल्ह्याची देशपातळीवर गांधी जिल्हा म्हणून ओळख आहे. महात्मा गांधी वर्धेतील सेवाग्राम आश्रमातून अनेक आंदोलनांचे बिगुल फुंकले.

ठळक मुद्देरामदास तडस यांची माहिती : केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : वर्धा जिल्ह्याची देशपातळीवर गांधी जिल्हा म्हणून ओळख आहे. महात्मा गांधी वर्धेतील सेवाग्राम आश्रमातून अनेक आंदोलनांचे बिगुल फुंकले. यासाठी वर्धा रेल्वे स्थानकाला जागतिक दर्जा मिळण्यासोबतच त्याला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नावे देण्याचा प्रस्ताव केंद्रशासनाकडे सादर झाला आहे. आपण त्यासाठी प्रयत्नशील असल्याचा ठाम विश्वास खा. रामदास तडस यांनी ‘लोकमत’शी केलेल्या अनौपचारिक चर्चेतून व्यक्त केला.स्वच्छ भारत सुंदर भारत मोहिमेंतर्गत वर्धा रेल्वे स्थानक राष्ट्रीय पातळीवर अग्रणी आहे. वर्धा रेल्वे स्थानक आंतरराष्ट्रीय दर्जाचे जागतिक रेल्वेस्थानक होणार आहे. बापूंची कर्मभूमी असलेल्या वर्धा रेल्वे स्थानकाला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आपण लोकसभेत मांडणार आहो. त्या संदर्भात कागदपत्रांची पूर्तता रेल्वे मंत्रालयाकडे करणार असल्याचेही खा. तडस म्हणाले. वर्धा रेल्वे स्थानकाला बापूंचे नाव मिळाल्यामुळे गांधी जिल्ह्याचे नाव जागतिक नाकाशावर झळकणार असून या स्थानकाच्या नविनीकरणासाठी विशेष निधीची तरतूदही करण्यात येत आहे. वर्धा रेल्वे स्थानकाचे नाव व दर्जा बदलण्यामुळे प्रवाशांच्या सुखसोईतही भर पडणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.पुलगाव-आर्वी ब्रॉडगेज करणारबंद पडलेल्या पुलगाव-आर्वी मीटरगेज लाईनचे रूपांतर ब्रॉडगेज मध्ये करून ती आमला रेल्वे स्थानकापर्यंत वाढविण्यासाठीही प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी केंद्र शासन आवश्यक निधीही उपलब्ध करून देणार आहे. याबाबत दोनदा लोकसभेत प्रश्न उपस्थित केला असून भाजपा शासन व पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत सकारात्मक भूमिका घेत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. हा मार्ग सुरू झाल्यास या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.