शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

नाचणगाव ग्रा.पं. मधील गोंधळ

By admin | Updated: June 17, 2017 00:37 IST

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालय योजना सुरू आहे. या योजनेंतर्गत ग्रामपंचायतीला सन २०१६-१७ मध्ये

लोकमत न्यूज नेटवर्क पुलगाव : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालय योजना सुरू आहे. या योजनेंतर्गत ग्रामपंचायतीला सन २०१६-१७ मध्ये ४३४ लाभार्थ्यांकरिता ५२ लाख ८ हजार रुपयाची राशी १६ हप्त्यात प्राप्त झाली. यातून रवींद्र गावंडे यांना दिलेला १३ हजार रुपयाचा धनादेश अनादरीत झाला. याची चौकशी सुरू असताना येथे २७ लाख ३६ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत या प्रकाराच्या चौकशीची मागणी जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष शब्बीर पठाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार, सर्वप्रथम या योजनेचे लाभार्थी रवींद्र गावंडे यांचा १२ हजाराचा धनादेश अनादरीत झाल्याचे म्हणने आहे. सदर प्रकार नजरचुकीने झाल्याचे समितीचे म्हणने आहे. हा प्रकार झाकण्याचा प्रकार सुरू असतानाही नाचणगावातील सहा लाभार्थ्यांचे धनादेश बाऊन्स झाल्याची चर्चा होती. परंतु राजकीय दबावामुळे हे प्रकरण थंडबस्त्यात गेल्याची चर्चा आहे. आता तर चक्क २७ लाख ३६ हजाराचे घबाड बाहेर आले आले आहे. यामुळे या समितीच्या कार्य प्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष शब्बीर पठाण, उपसरपंच सुरेश देवतळे व इतर काही ग्रामपंचायत सदस्यांनी केलेल्या तक्रारी नुसार बँक आॅफ इंडिया, नाचणगाव शाखेत ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या नावे बचत खाते आहे. या खात्यातून ३ फेब्रुवारी २०१६ ते ५ मे २०१७ पर्यंत करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारात काही लाभार्थ्यांची रक्कम रोख काढण्यात आली. तर काहींना लाखो रुपयांचे धनादेश दिल्याचे समोर आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ग्रामीण पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष अनुप टेंभुर्णे यांच्या नावे ६ लाख ३५ हजार व त्यांच्या पत्नीचे नाव ४ लाख रुपये काढण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. या समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड होवून दोन वर्षांत केवळ तीनच सभा झाल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. शिवाय या समितीने झालेल्या आर्थिक व्यवहाराबाबत कुठलीही मंजूरी घेतली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ज्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला. त्यापैकी काही लाभार्थ्यांच्या नावे घरच नाही तर काही लाभार्थी हयात नसल्याचा आरोप आहे. यामुळे या प्रकरणाची चौकशी करून शासकीय लेखा परीक्षकांकडून लेखा परीक्षण करण्यात यावे व संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जोर धरत असून याकडे गावकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.