शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

माझ्या मुलाचा मृत्यू विद्युत धक्क्याने नव्हे तर घातपातच!

By admin | Updated: September 20, 2015 02:41 IST

तारासावंगा येथील ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या शेतात रामचंद्र कावळे (५०) यांचा २४ आॅगस्ट रोजी मृतदेह आढळून आला.

वडिलांचा टाहो : मारेकऱ्यांवर कारवाईसाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांना साकडेआष्टी (श.) : तारासावंगा येथील ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या शेतात रामचंद्र कावळे (५०) यांचा २४ आॅगस्ट रोजी मृतदेह आढळून आला. हा अपघात नव्हे तर त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे. याबाबत सखोल चौकशी करून मारेकऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी मृतकाचे वडील महादेव कावळे यांनी केली आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना निवेदन देण्यात आले.निवेदनानुसार रामचंद्रचा शोध घेत असताना कड नदी व नागझरी नाल्याच्या काठावर त्याची बनियान, दुपट्टा व चप्पल आढळून आली. यामुळे ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या शेतात मुलगा असावा, असा संशय आला. यामुळे महादेव व सहकारी पांदण रस्त्याने त्यांच्या शेतात गेले. दरम्यान, शिवहरी ठोंबरे, मुकींदा ठोंबरे, इंद्रजीत ठोंबरे, चेतन ठोंबरे, ओंकार ठोंबरे (गुड्डू) व बेलगाव येथील ट्रॅक्टर चालक येत होते. यातील शिवहरी याने, तुम्ही येथे कशाला आले, तुमचे येथे कोणते काम आहे, चला निघा आमच्या शेतातून, पिकाची नासधुस होईल, असे म्हणत धमकावले. यामुळे संशय आणखी बळावला. रामचंद्र तेथेच कुठेतरी असावा म्हणून शोधाशोध केली असता त्याचा मृतदेह ठोंबरे यांच्याच शेतात नदीच्या काठावर आढळून आला. शिवहरी व सहकाऱ्यांनी शेतात लावलेली विद्युत तार व अन्य पुरावे नष्ट केले. यामुळे हा घातपातच असल्याचा आरोप महादेव कावळे यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही मृतक रामचंद्रच्या वडिलांनी निवेदनातून दिला आहे.(प्रतिनिधी)