शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या कारणातून युवकाची, तर चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 05:00 IST

मयुरी विनोद उरकुडे (२४) या वर्धा येथील गिरीपेठ परिसरातील रहिवासी आई दिपमाला नेहारे यांच्या घरी मुक्कामी होत्या. शुक्रवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास मयुरी हिचा पती विनोद उरकुडे हा काजीपेठवरुन वर्ध्याच्या गिरीपेठमध्ये आला. तो दार तोडून घरात शिरला. मयुरीने हटकले असता तु माहेरी का आली, असे म्हणून वाद करुन लागला. जवळील चाकू काढून पत्नी मयुरी हिच्या पोटावर सपासप वार करु लागला.

ठळक मुद्दे‘क्राईम रेट’ वाढतोय । पिपरी, गिरीपेठ परिसरातील थरारक घटना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गिरड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पिपरी गावात दारु चोरल्याच्या कारणातून युवकास विहिरीत ढकलून देत हत्या करण्यात आली तर वर्ध्याच्या गिरीपेठ परिसरात चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर धारदार शस्त्राने वार करीत हत्या करण्यात आली. इतकेच नव्हेतर एक दिवसापूर्वी श्वानाला दगड मारण्याच्या कारणातून भारतीय खाद्य निगम परिसरातील झोडप ट्टी परिसरात व्यक्तीची हत्या करण्यात आली. तीन दिवसांत तीन खुनाच्या घटना घडल्या असून या घटनांनी जिल्हा हादरला आहे. एकंदरीत चित्र बघता जिल्ह्याचा ‘क्राईम रेट’ वाढत असून कायद्याचा धाक संपल्याचे दिसून येत आहे.मयुरी विनोद उरकुडे (२४) या वर्धा येथील गिरीपेठ परिसरातील रहिवासी आई दिपमाला नेहारे यांच्या घरी मुक्कामी होत्या. शुक्रवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास मयुरी हिचा पती विनोद उरकुडे हा काजीपेठवरुन वर्ध्याच्या गिरीपेठमध्ये आला. तो दार तोडून घरात शिरला. मयुरीने हटकले असता तु माहेरी का आली, असे म्हणून वाद करुन लागला. जवळील चाकू काढून पत्नी मयुरी हिच्या पोटावर सपासप वार करु लागला. मुलाला मारत असल्याचे पाहून तिची आई दीपमाला या वाचविण्यासाठी मधात गेली. आरोपी विनोद याने दीपमाला यांच्यावरही चाकूने वार केले. गंभीर झालेल्या मयुरी आणि तिची आई दीपमाला यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने दोघींनाही नागपूर येथे पाठविण्यात आले. उपचारादरम्यान मयुरी उरकुडे हिचा मृत्यू झाला. तर दीपमाला नेहारे या गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.गिरड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपरी येथे दारु चोरल्याच्या वादातून युवकाला विहिरीत ढकलून हत्या करण्यात आली. यादव चिडाम आणि बालू उर्फ प्रवीण शालीकराम खुरसंगे हे दोघे गावातीलच सार्वजनिक विहिरीवर बसून होते. दरम्यान यादव चिडाम यांचे मोठे भाऊ उद्धव चिडाम हे तेथे गेले असता बालू खुरसंगे याने यादवला तु माझी मोहाच्या दारुची डबकी का चोरुन नेली. या कारणातून दोघांमध्ये वाद सुरु होता.उद्धव चिडाम याला काही समजताच बालू उर्फ प्रवीण खुरसंगे याने यादव चिडाम याची कॉलर पकडून त्याचे डोके विहिरीवर असलेल्या खिराडीवर आपटले तसेच मारहाण करुन त्यास विहिरीत ढकलून दिले. उद्धव चिडाम यांनी आरडा ओरडा केला असता बालूने त्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. तेवढयातच उद्धव चिडाम यांचा पुतण्या प्रशांत चिडाम तेथे आला आणि बालू खुरसंगे याला पकडून ठेवले. बालू खुरसंगे याने तेथून पळ काढला. गावातील नागरिकांच्या मदतीने यादव चिडाम यास विहिरीबाहेर काढून रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले.तर तिसरी घटना वर्ध्यातील भारतीय खाद्य निगम परिसरात असलेल्या झोपडपट्टी परिसरात घडली. या घटेनेत तिघांनी प्रवीण मोहन कांबळे याच्यावर चाकूने वार करीत त्याचा खून केला होता. या घटनेतील आरोपी अनिता राईकवार, योगराज राईकवार, दीपक वैरागडे यांना सेवाग्राम पोलिसांनी अटक केली होती. तिघांनाही दोन दिवस पोलीस कोठडी ठोठाविल्यानंतर शनिवारी त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.कायद्याचा धाक संपला का?शहरासह जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून गुन्हेगारीने डोकेवर काढले आहे. वर्चस्व वादातून, तसेच कौटुंबिक कलहातून वाद होत गंभीर घटना घडत असल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच खून, खूनाचा प्रयत्न, जबर हाणामारी सारख्या घटना घडत असल्याने कायद्याचा धाक संपला का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

टॅग्स :Murderखून