शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

दारूच्या कारणातून युवकाची, तर चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 05:00 IST

मयुरी विनोद उरकुडे (२४) या वर्धा येथील गिरीपेठ परिसरातील रहिवासी आई दिपमाला नेहारे यांच्या घरी मुक्कामी होत्या. शुक्रवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास मयुरी हिचा पती विनोद उरकुडे हा काजीपेठवरुन वर्ध्याच्या गिरीपेठमध्ये आला. तो दार तोडून घरात शिरला. मयुरीने हटकले असता तु माहेरी का आली, असे म्हणून वाद करुन लागला. जवळील चाकू काढून पत्नी मयुरी हिच्या पोटावर सपासप वार करु लागला.

ठळक मुद्दे‘क्राईम रेट’ वाढतोय । पिपरी, गिरीपेठ परिसरातील थरारक घटना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गिरड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पिपरी गावात दारु चोरल्याच्या कारणातून युवकास विहिरीत ढकलून देत हत्या करण्यात आली तर वर्ध्याच्या गिरीपेठ परिसरात चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर धारदार शस्त्राने वार करीत हत्या करण्यात आली. इतकेच नव्हेतर एक दिवसापूर्वी श्वानाला दगड मारण्याच्या कारणातून भारतीय खाद्य निगम परिसरातील झोडप ट्टी परिसरात व्यक्तीची हत्या करण्यात आली. तीन दिवसांत तीन खुनाच्या घटना घडल्या असून या घटनांनी जिल्हा हादरला आहे. एकंदरीत चित्र बघता जिल्ह्याचा ‘क्राईम रेट’ वाढत असून कायद्याचा धाक संपल्याचे दिसून येत आहे.मयुरी विनोद उरकुडे (२४) या वर्धा येथील गिरीपेठ परिसरातील रहिवासी आई दिपमाला नेहारे यांच्या घरी मुक्कामी होत्या. शुक्रवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास मयुरी हिचा पती विनोद उरकुडे हा काजीपेठवरुन वर्ध्याच्या गिरीपेठमध्ये आला. तो दार तोडून घरात शिरला. मयुरीने हटकले असता तु माहेरी का आली, असे म्हणून वाद करुन लागला. जवळील चाकू काढून पत्नी मयुरी हिच्या पोटावर सपासप वार करु लागला. मुलाला मारत असल्याचे पाहून तिची आई दीपमाला या वाचविण्यासाठी मधात गेली. आरोपी विनोद याने दीपमाला यांच्यावरही चाकूने वार केले. गंभीर झालेल्या मयुरी आणि तिची आई दीपमाला यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने दोघींनाही नागपूर येथे पाठविण्यात आले. उपचारादरम्यान मयुरी उरकुडे हिचा मृत्यू झाला. तर दीपमाला नेहारे या गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.गिरड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपरी येथे दारु चोरल्याच्या वादातून युवकाला विहिरीत ढकलून हत्या करण्यात आली. यादव चिडाम आणि बालू उर्फ प्रवीण शालीकराम खुरसंगे हे दोघे गावातीलच सार्वजनिक विहिरीवर बसून होते. दरम्यान यादव चिडाम यांचे मोठे भाऊ उद्धव चिडाम हे तेथे गेले असता बालू खुरसंगे याने यादवला तु माझी मोहाच्या दारुची डबकी का चोरुन नेली. या कारणातून दोघांमध्ये वाद सुरु होता.उद्धव चिडाम याला काही समजताच बालू उर्फ प्रवीण खुरसंगे याने यादव चिडाम याची कॉलर पकडून त्याचे डोके विहिरीवर असलेल्या खिराडीवर आपटले तसेच मारहाण करुन त्यास विहिरीत ढकलून दिले. उद्धव चिडाम यांनी आरडा ओरडा केला असता बालूने त्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. तेवढयातच उद्धव चिडाम यांचा पुतण्या प्रशांत चिडाम तेथे आला आणि बालू खुरसंगे याला पकडून ठेवले. बालू खुरसंगे याने तेथून पळ काढला. गावातील नागरिकांच्या मदतीने यादव चिडाम यास विहिरीबाहेर काढून रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले.तर तिसरी घटना वर्ध्यातील भारतीय खाद्य निगम परिसरात असलेल्या झोपडपट्टी परिसरात घडली. या घटेनेत तिघांनी प्रवीण मोहन कांबळे याच्यावर चाकूने वार करीत त्याचा खून केला होता. या घटनेतील आरोपी अनिता राईकवार, योगराज राईकवार, दीपक वैरागडे यांना सेवाग्राम पोलिसांनी अटक केली होती. तिघांनाही दोन दिवस पोलीस कोठडी ठोठाविल्यानंतर शनिवारी त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.कायद्याचा धाक संपला का?शहरासह जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून गुन्हेगारीने डोकेवर काढले आहे. वर्चस्व वादातून, तसेच कौटुंबिक कलहातून वाद होत गंभीर घटना घडत असल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच खून, खूनाचा प्रयत्न, जबर हाणामारी सारख्या घटना घडत असल्याने कायद्याचा धाक संपला का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

टॅग्स :Murderखून