शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

दारूच्या कारणातून युवकाची, तर चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 05:00 IST

मयुरी विनोद उरकुडे (२४) या वर्धा येथील गिरीपेठ परिसरातील रहिवासी आई दिपमाला नेहारे यांच्या घरी मुक्कामी होत्या. शुक्रवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास मयुरी हिचा पती विनोद उरकुडे हा काजीपेठवरुन वर्ध्याच्या गिरीपेठमध्ये आला. तो दार तोडून घरात शिरला. मयुरीने हटकले असता तु माहेरी का आली, असे म्हणून वाद करुन लागला. जवळील चाकू काढून पत्नी मयुरी हिच्या पोटावर सपासप वार करु लागला.

ठळक मुद्दे‘क्राईम रेट’ वाढतोय । पिपरी, गिरीपेठ परिसरातील थरारक घटना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गिरड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पिपरी गावात दारु चोरल्याच्या कारणातून युवकास विहिरीत ढकलून देत हत्या करण्यात आली तर वर्ध्याच्या गिरीपेठ परिसरात चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर धारदार शस्त्राने वार करीत हत्या करण्यात आली. इतकेच नव्हेतर एक दिवसापूर्वी श्वानाला दगड मारण्याच्या कारणातून भारतीय खाद्य निगम परिसरातील झोडप ट्टी परिसरात व्यक्तीची हत्या करण्यात आली. तीन दिवसांत तीन खुनाच्या घटना घडल्या असून या घटनांनी जिल्हा हादरला आहे. एकंदरीत चित्र बघता जिल्ह्याचा ‘क्राईम रेट’ वाढत असून कायद्याचा धाक संपल्याचे दिसून येत आहे.मयुरी विनोद उरकुडे (२४) या वर्धा येथील गिरीपेठ परिसरातील रहिवासी आई दिपमाला नेहारे यांच्या घरी मुक्कामी होत्या. शुक्रवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास मयुरी हिचा पती विनोद उरकुडे हा काजीपेठवरुन वर्ध्याच्या गिरीपेठमध्ये आला. तो दार तोडून घरात शिरला. मयुरीने हटकले असता तु माहेरी का आली, असे म्हणून वाद करुन लागला. जवळील चाकू काढून पत्नी मयुरी हिच्या पोटावर सपासप वार करु लागला. मुलाला मारत असल्याचे पाहून तिची आई दीपमाला या वाचविण्यासाठी मधात गेली. आरोपी विनोद याने दीपमाला यांच्यावरही चाकूने वार केले. गंभीर झालेल्या मयुरी आणि तिची आई दीपमाला यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने दोघींनाही नागपूर येथे पाठविण्यात आले. उपचारादरम्यान मयुरी उरकुडे हिचा मृत्यू झाला. तर दीपमाला नेहारे या गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.गिरड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपरी येथे दारु चोरल्याच्या वादातून युवकाला विहिरीत ढकलून हत्या करण्यात आली. यादव चिडाम आणि बालू उर्फ प्रवीण शालीकराम खुरसंगे हे दोघे गावातीलच सार्वजनिक विहिरीवर बसून होते. दरम्यान यादव चिडाम यांचे मोठे भाऊ उद्धव चिडाम हे तेथे गेले असता बालू खुरसंगे याने यादवला तु माझी मोहाच्या दारुची डबकी का चोरुन नेली. या कारणातून दोघांमध्ये वाद सुरु होता.उद्धव चिडाम याला काही समजताच बालू उर्फ प्रवीण खुरसंगे याने यादव चिडाम याची कॉलर पकडून त्याचे डोके विहिरीवर असलेल्या खिराडीवर आपटले तसेच मारहाण करुन त्यास विहिरीत ढकलून दिले. उद्धव चिडाम यांनी आरडा ओरडा केला असता बालूने त्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. तेवढयातच उद्धव चिडाम यांचा पुतण्या प्रशांत चिडाम तेथे आला आणि बालू खुरसंगे याला पकडून ठेवले. बालू खुरसंगे याने तेथून पळ काढला. गावातील नागरिकांच्या मदतीने यादव चिडाम यास विहिरीबाहेर काढून रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले.तर तिसरी घटना वर्ध्यातील भारतीय खाद्य निगम परिसरात असलेल्या झोपडपट्टी परिसरात घडली. या घटेनेत तिघांनी प्रवीण मोहन कांबळे याच्यावर चाकूने वार करीत त्याचा खून केला होता. या घटनेतील आरोपी अनिता राईकवार, योगराज राईकवार, दीपक वैरागडे यांना सेवाग्राम पोलिसांनी अटक केली होती. तिघांनाही दोन दिवस पोलीस कोठडी ठोठाविल्यानंतर शनिवारी त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.कायद्याचा धाक संपला का?शहरासह जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून गुन्हेगारीने डोकेवर काढले आहे. वर्चस्व वादातून, तसेच कौटुंबिक कलहातून वाद होत गंभीर घटना घडत असल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच खून, खूनाचा प्रयत्न, जबर हाणामारी सारख्या घटना घडत असल्याने कायद्याचा धाक संपला का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

टॅग्स :Murderखून