शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

पालिका कार्यालयाला स्वच्छतेचा विसर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 22:45 IST

स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून शहरात स्वच्छ शहरासंदर्भात जागर केला जात आहे; पण ज्या कार्यालयाच्या खांद्यावर अस्वच्छतेला शहरातून हद्दपार करण्याची जबाबदारी आहे त्याच वर्धा न. प. च्या कार्यालयाच्या आवारात कचऱ्याचे ढिगारे कायम असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देभिंतींना जाळ्याचा विळखा : परिसरात कचऱ्याचे ढिगारे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून शहरात स्वच्छ शहरासंदर्भात जागर केला जात आहे; पण ज्या कार्यालयाच्या खांद्यावर अस्वच्छतेला शहरातून हद्दपार करण्याची जबाबदारी आहे त्याच वर्धा न. प. च्या कार्यालयाच्या आवारात कचऱ्याचे ढिगारे कायम असल्याचे दिसून येते. शिवाय कार्यालयाच्या भिंतींना जाळ्याचा विळखा असल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. परिणामी, तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून रस्त्याच्याकडेला कचरा टाकणाऱ्या बेशिस्तांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवाय पालिकेच्यावतीने ओला व सुका कचरा प्रत्येक घरातून घंटागाडीच्या माध्यमातून गोळा केल्या जात आहे. इतकेच नव्हे तर रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर आणि कचरा जाळणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही केली जात आहे. मात्र, जे कार्यालय वर्धा शहरातील नागरिकांना स्वच्छतेबाबत शिस्त लावत आहे त्याच वर्धा न. प. कार्यालयातील कर्मचाºयांना कार्यालय व कार्यालय परिसर स्वच्छ ठेवण्याचा विसर तर पडला नाही ना असा प्रश्न कार्यालयाचा फेरफटका मारल्यावर नागरिकांकडून विचारल्या जात आहे. न. प. कार्यालयाच्या मागील भागात मोठा कचºयाचा ढिगारा मागील काही दिवसांपासून कायम आहे. तसेच कर विभागाकडे जाणाºया मार्गावरील भिंतीवर जाळे कायम असल्याचे दिसते. हा प्रकार स्वच्छ शासकीय कार्यालयाल या हेतूला छेद देणारा असल्याने न.प.तील संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.कार्यालयीन कामकाजाबाबत होतोय अपप्रचारन.प.च्या कार्यालयाच्या मागील भागात कचºयाचे ढिगारे कायम आहे. तेथील कचरा वेळीच उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावणे क्रमप्राप्त असताना त्याकडे पालिकेतील कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यावर दारूच्या शिश्या पडून असून विविध कामानिमित्त येणाºया नागरिकांना हा प्रकार सहज निदर्शनास पडतो. त्यांच्याकडून उलट-सुलट चर्चा होत आहे.कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर दारूच्या रिकाम्या बाटल्यायेथील न. प. कार्यालयाच्या मागणी परिसरात गत काही दिवसांपासून कचऱ्याचा ढिगारा कायम आहे. इतकेच नव्हे तर या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर दारूच्या रिकाम्या बाटल्या पडून असल्याचे दिसते. दारूबंदी जिल्ह्यातील शासकीय कार्यालयाच्या आवारातच दारूच्या रिकाम्या बाटल्या विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना सहज निदर्शनास येत असल्याने कार्यालयाच्या कामकाजाबाबत उलट-सुलट चर्चा नागरिक करीत आहेत.