शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पालिकेचा कारभार वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 22:19 IST

अनेक कारणांनी येथील नगर परिषद प्रशासन वादात आहे. नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांची सततची गैरहजेरी आणि त्यांचा भ्रमणध्वनीवर असलेली नॉट रिचेबलची टेप नागरिकांना त्रास देणारी ठरत आहे.

ठळक मुद्देदेवळी येथील प्रकार : सीओ ‘नॉट रिचेबल’

ऑनलाईन लोकमतदेवळी : अनेक कारणांनी येथील नगर परिषद प्रशासन वादात आहे. नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांची सततची गैरहजेरी आणि त्यांचा भ्रमणध्वनीवर असलेली नॉट रिचेबलची टेप नागरिकांना त्रास देणारी ठरत आहे. या प्रकारामुळे नागरिकांची कामे खोळंबत असून त्यांचा त्रास वाढत आहे.या नगर परिषदमध्ये खा. तडस यांच्या प्रयत्नातून कोट्यवधीची विकास कामे सुरू आहे. यामध्ये साडेतील कोटींचे नाट्यगृह, तीन कोटींचे स्टेडियम, सहा कोटींच्या खर्चातून शॉपींग कॉम्प्लेक्स, बाजार ओट्याचे बांधकाम तसेच आठवडी बाजाराचे सौदर्यीकरण, दोन कोटींच्या खर्चातून नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे सौदर्यीकरण, ३५ कोटींच्या खर्चातून नगर परिषदेच्या नवीन पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम सुरू आहे. तसेच अंतर्गत रसते, नाल्या व इतर विकासकामे प्रगतीपथावर आहे. ही सर्व कामे न.प. मुख्याधिकारी यांच्या गैरहजेरीत होत आहे. त्यामुळे या सर्व विकासकामांच्या गुणवत्तेचा वाली कोण याबाबत विचारणा होत आहे.शहराच्या स्वच्छ सर्वेक्षणाकरिता यंत्रणा गत एक ते दीड महिन्यापासून धावत आहे; परतु या सर्व घडामोडीत न.प.चा कमांकडरच नामामत्र ठरल्याने ही मोहीम रखडल्यात जमा आहे. अनेक दैनंदिन कामासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहे.मालकी हक्काच्या जागेच्या विवरणासहीत प्रॉपर्टी बाबतच्या अडचणी तसेच महत्त्वपूर्ण प्रमाणपत्रासाठभ नागरिकांची फरफट होत आहे. बरेचदा न.प. स्थायी समितीच्या बैठकीला सुद्धा ते गैरहजर राहत आहेत. महत्त्वपूर्ण व आर्थिक बाबीवरील निर्णय उपस्थित सदस्यांवर सोडले जात आहे.नगर परिषद कार्यालयातील काहींवर कामाचा अतिभार व काहींवर मर्जी ठेवल्या जात असल्याने कर्मचाºयांत प्रत्येक विभागात आधीच कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने गोंधळाची स्थिती आहे. दिवाबत्तीच्या तक्रारीचे वेळोवेळी निवारण, स्वच्छतेबाबत लोकांच्या अडचणी तसेच उन्हाळ्याच्या दिवसात पाणी पुरवठ्याबाबत येणाऱ्या अडचणी लक्षात घेता मुख्याधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली आहे. विकास कामांसोबतच दैनंदिन येणाऱ्या अडचणीबाबत येथील नगरसेवकांची हतबलता केविलवाणी ठरली आहे. याकडे खासदारांनी लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.कर्मचाऱ्यांचा थाट ‘आऊट आॅफ कंट्रोल’मुख्याधिकारी महिन्यातून फक्त दोन ते चार दिवसच ते पालिकेच्या कार्यालयात हजर राहत आहेत. अधिकारी नसल्याने येथील कर्मचाऱ्यांचा थाट सध्या आऊट आॅफ कंट्रोल होवू पाहता आहे. खा.रामदास तडस यांची नगर परिषद म्हणून याकडे पाहिले जात आहे. असे असताना येथे असलेली अनागोंदी सर्वांना बुचकळ्यात पाडणारी आहे.