शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेचा कारभार वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 22:19 IST

अनेक कारणांनी येथील नगर परिषद प्रशासन वादात आहे. नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांची सततची गैरहजेरी आणि त्यांचा भ्रमणध्वनीवर असलेली नॉट रिचेबलची टेप नागरिकांना त्रास देणारी ठरत आहे.

ठळक मुद्देदेवळी येथील प्रकार : सीओ ‘नॉट रिचेबल’

ऑनलाईन लोकमतदेवळी : अनेक कारणांनी येथील नगर परिषद प्रशासन वादात आहे. नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांची सततची गैरहजेरी आणि त्यांचा भ्रमणध्वनीवर असलेली नॉट रिचेबलची टेप नागरिकांना त्रास देणारी ठरत आहे. या प्रकारामुळे नागरिकांची कामे खोळंबत असून त्यांचा त्रास वाढत आहे.या नगर परिषदमध्ये खा. तडस यांच्या प्रयत्नातून कोट्यवधीची विकास कामे सुरू आहे. यामध्ये साडेतील कोटींचे नाट्यगृह, तीन कोटींचे स्टेडियम, सहा कोटींच्या खर्चातून शॉपींग कॉम्प्लेक्स, बाजार ओट्याचे बांधकाम तसेच आठवडी बाजाराचे सौदर्यीकरण, दोन कोटींच्या खर्चातून नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे सौदर्यीकरण, ३५ कोटींच्या खर्चातून नगर परिषदेच्या नवीन पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम सुरू आहे. तसेच अंतर्गत रसते, नाल्या व इतर विकासकामे प्रगतीपथावर आहे. ही सर्व कामे न.प. मुख्याधिकारी यांच्या गैरहजेरीत होत आहे. त्यामुळे या सर्व विकासकामांच्या गुणवत्तेचा वाली कोण याबाबत विचारणा होत आहे.शहराच्या स्वच्छ सर्वेक्षणाकरिता यंत्रणा गत एक ते दीड महिन्यापासून धावत आहे; परतु या सर्व घडामोडीत न.प.चा कमांकडरच नामामत्र ठरल्याने ही मोहीम रखडल्यात जमा आहे. अनेक दैनंदिन कामासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहे.मालकी हक्काच्या जागेच्या विवरणासहीत प्रॉपर्टी बाबतच्या अडचणी तसेच महत्त्वपूर्ण प्रमाणपत्रासाठभ नागरिकांची फरफट होत आहे. बरेचदा न.प. स्थायी समितीच्या बैठकीला सुद्धा ते गैरहजर राहत आहेत. महत्त्वपूर्ण व आर्थिक बाबीवरील निर्णय उपस्थित सदस्यांवर सोडले जात आहे.नगर परिषद कार्यालयातील काहींवर कामाचा अतिभार व काहींवर मर्जी ठेवल्या जात असल्याने कर्मचाºयांत प्रत्येक विभागात आधीच कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने गोंधळाची स्थिती आहे. दिवाबत्तीच्या तक्रारीचे वेळोवेळी निवारण, स्वच्छतेबाबत लोकांच्या अडचणी तसेच उन्हाळ्याच्या दिवसात पाणी पुरवठ्याबाबत येणाऱ्या अडचणी लक्षात घेता मुख्याधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली आहे. विकास कामांसोबतच दैनंदिन येणाऱ्या अडचणीबाबत येथील नगरसेवकांची हतबलता केविलवाणी ठरली आहे. याकडे खासदारांनी लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.कर्मचाऱ्यांचा थाट ‘आऊट आॅफ कंट्रोल’मुख्याधिकारी महिन्यातून फक्त दोन ते चार दिवसच ते पालिकेच्या कार्यालयात हजर राहत आहेत. अधिकारी नसल्याने येथील कर्मचाऱ्यांचा थाट सध्या आऊट आॅफ कंट्रोल होवू पाहता आहे. खा.रामदास तडस यांची नगर परिषद म्हणून याकडे पाहिले जात आहे. असे असताना येथे असलेली अनागोंदी सर्वांना बुचकळ्यात पाडणारी आहे.