शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

जिल्ह्याचा माता व बालमृत्यूदर शून्यावर आणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 22:08 IST

जिल्ह्याचा माता मृत्यूदर व बाल मृत्यूदर शुन्यावर आणण्याकरिता २८ मे ते ९ जून या कालावधित ० ते ५ वयोगटातील बालकांचे अतिसारामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देशैलेश नवाल : टास्क फोर्स समितीची बैठक; अतिसार पंधरवड्यात होणारे मृत्यू टाळा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्याचा माता मृत्यूदर व बाल मृत्यूदर शुन्यावर आणण्याकरिता २८ मे ते ९ जून या कालावधित ० ते ५ वयोगटातील बालकांचे अतिसारामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबविण्यात येणार आहे. या कालावधित निर्धारीत वयोगटातील बालकांचे आशा कार्यकर्त्यांमार्फत सर्वेक्षण करून अतिसाराची लागण असलेल्याला ओआरएस व झिंक गोळ्या देऊन उपचार करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.मातांना ओआरएस द्रावण तयार करण्याचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात येणार आहे. तसेच ग्राम स्वराज्य अभियानातंर्गत निवड केलेल्या जिल्ह्यातील हिवरा व कवठा (झोपडी) या गावामध्ये विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहीम राबविण्यात येणार आहे. येथे लसीकरणापासून वंचित राहिलेल्या गरोदर माता व बालके तसेच अर्धवट लसीकरण झालेली गरोदर माता व बालके यांचे सर्वेक्षण करून त्यांचे संपूर्ण लसीकरण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकीत केल्यात.या बैठकीला सीईओ अजय गुल्हाणे, डीएचओ डॉ. अजय डवले, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. आर.पी. गहलोत, आरएमओ डॉ. विनोद वाघमारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश रेवतकर, फॉक्झी प्रतिनिधी डॉ. शुभदा जाजू, आय.एम.ए.चे सचिव डॉ. शंतनु चव्हाण, डॉ. सुरेखा तायडे यांची उपस्थिती होती.बैठकीत डॉ. डवले म्हणाले की, प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजनेंतर्गत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये खासगी प्रसुती तज्ज्ञ यांच्या सेवा विनामुल्य उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे सर्व गरोदर मातांची प्रसूतिपूर्व तपासणी तज्ज्ञ डॉक्टरकडून केल्या जाते. त्यामुळे मातामृत्यू निरंक आणण्याचे प्रयत्न आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. आजारी बालकांना बालरोग तज्ज्ञाद्वारे तपासणी करून अर्भकमृत्यू शून्यावर आणण्याचे प्रयत्न होत आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयामध्ये गरोदर मातांना आवश्यक असणारी सर्व औषधी उपलब्ध आहे. तसेच नियमित लसीकरण कार्यक्रमांत प्रत्येक गावात लसीकरण सत्र आयोजित करून सर्व गरोदर माता व बालकांना पूर्ण संरक्षित करण्याबाबत, नियोजन असल्याचेही डॉ. डवले यांनी यावेळी सांगितले.