शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

मृतांत वयाची साठी ओलांडलेले अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 05:00 IST

जिल्ह्याची कोविड बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असे असले तरी वर्धेकर अजूनही गाफिस असल्यागतचे चित्र बघावयास मिळत आहे. शनिवारपर्यंत जिल्ह्यातील ५ हजार ३७१ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यापैकी १६१ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या मृतकांमध्ये सर्वाधिक वयाची साठी पार केलेल्यांचा समावेश आहे. असे असले तरी आतापर्यंत ३ हजार २७० व्यक्तींनी कोविडवर मात केली आहे.

ठळक मुद्देकोविडमुळे १६१ व्यक्तींचा मृत्यू : कोरोना महामारीबाबत वर्धेकर गाफिलच

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनामुळे शनिवारपर्यंत जिल्ह्यातील १६१ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यात वयाची साठी ओलांडलेल्यांचाच सर्वाधिक समावेश आहे. तशी नोंदही आरोग्य विभागाने घेतली आहे. त्यामुळे वयाचे अर्धशतक पूर्ण केलेल्यांनी सध्याच्या कोरोना काळात अधिक सतर्क आणि दक्ष राहण्याची गरज आहे.जिल्ह्याची कोविड बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असे असले तरी वर्धेकर अजूनही गाफिस असल्यागतचे चित्र बघावयास मिळत आहे. शनिवारपर्यंत जिल्ह्यातील ५ हजार ३७१ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यापैकी १६१ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या मृतकांमध्ये सर्वाधिक वयाची साठी पार केलेल्यांचा समावेश आहे. असे असले तरी आतापर्यंत ३ हजार २७० व्यक्तींनी कोविडवर मात केली आहे. तर १ हजार ९४० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.सावधान; तरुणांना कोविड घेतोय कवेतजिल्ह्यातील कोविड बाधितांची गुरूवार ८ ऑक्टोबरपर्यंतच्या आकडेवारीवरून आरोग्य विभागाने केलेल्या अभ्यासात जिल्ह्यातील ० ते १० वयोगटातील ३.४६ टक्के व्यक्तींना, ११ ते २० वयोगटातील ७.३० टक्के व्यक्तींना, २१ ते ३० वयोगटातील २०.९२ टक्के व्यक्तींना, ३१ ते ४० वयोगटातील १८.८८ टक्के व्यक्तींना, ४१ ते ५० वयोगटातील १८.२५ टक्के व्यक्तींना, ५१ ते ६० वयोगटातील १६.२९ टक्के व्यक्तींना, ६१ ते ७० वयोगटातील ९.८१ टक्के व्यक्तींना, ७१ ते ८० वयोगटातील ४.१७ टक्के व्यक्तींना, ८१ ते ९० वयोगटातील ०.७४ टक्के व्यक्तींना, ९१ ते १०० वयोगटातील ०.०३ टक्के व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. यात सर्वाधिक कोविड बाधित तरुण असल्याने जिल्ह्यातील तरुणांनी आता अधिक दक्ष राहण्याची गरज आहे.दुपटीचा दर २८ दिवसांवरसप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील कोविड बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. त्यावेळी जिल्ह्याच्या कोरोना दुपटीचा दर १० दिवसांवर पोहोचला होता. तर सध्या जिल्ह्याचा कोविड दुपटीचा पर २८ दिवसांवर आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.आतपर्यंत जिल्ह्यात १६१ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृताकांमध्ये वयाची साठी पार केलेल्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे वृद्धांनी सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात अधिक दक्षता बागळली पाहिजे. शिवाय नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडून दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.जिल्ह्याचा रिकव्हरी दर उत्तमदिवसेंदिवस कोविड बाधितांच्या संख्येत वाढ होत असली तरी मोठ्या संख्येने वर्ध्यातील कोविडबाधित कोरोनावर मात करीत आहेत. सध्या जिल्ह्याचा कोविडमुक्तीचा दर ७० टक्के असून हा दिलासादायक आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याDeathमृत्यू