शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
4
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
5
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
6
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
7
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
8
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
9
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
10
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
11
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
12
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
13
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
14
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
15
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
16
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
17
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
18
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
19
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
20
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस

भारत बंददरम्यान मोर्चे अन् निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 23:32 IST

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात सोमवारी भारत बंद पुकारण्यात आला होता. या बंदला वर्धेत अत्यल्प प्रतिसाद दिसला.

ठळक मुद्देवर्धा, पुलगाव, हिंगणघाटात भीम आर्मी, बसपा रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात सोमवारी भारत बंद पुकारण्यात आला होता. या बंदला वर्धेत अत्यल्प प्रतिसाद दिसला. सर्वच व्यावसायिक प्रतिष्ठाणे, शाळा महाविद्यालय सुरळीत सुरू होते. वर्धेत या मागणीकरिता भीम आर्मीच्या नेतृत्त्वात एक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. तर बसपाच्यावतीनेही एक निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. पुलगाव शहरात बसपाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने पोलिसांनी बसपाच्या काही कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करून स्थिती आटोक्यात आणली.बसपाचे निवेदनातून राष्ट्रपतींना साकडेवर्धा : अनुसूचित जाती, जमाती अत्याचार निवारण अधिनियम १९८९ ला पुर्ववत लागू करावा, अशी मागणी बसपाच्यावतीने करण्यात आली. तसे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आले. निवेदन देताना बसपाचे जिल्हाध्यक्ष मोहन राईकवार, जि.प. सदस्य उमेश जिंदे, दीपक भगत, मनिष फुसाटे, अभिषेक रामटेके, जयंत वासनिक, विवेक गवळी, विशाल रंगारी, मिलिंद रंगारी, दीपक धारस्कर, अंबादास मसराम, राजेश चन्ने, किशोर चौधरी, सचिन म्हैसकर, अजय येसनकर, रोशन दुधकोहळे आदींची उपस्थिती होती.दलित संघटनांची जिल्हाकचेरीवर धडकवर्धा : भीम आर्मीच्या नेतृत्त्वात स्थानिक बजाज चौक येथून काढण्यात आलेल्या मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.यावेळी अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये एका प्रकरणात न्यायालयाच्या २ बेंचच्या खंडपीठाने २० मार्च २०१८ ला निकाल दिला. यात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये तक्रार दाखल झाल्यास संबंधित आरोपीला तात्काळ अटक करण्यात येऊ नये असा निर्णय दिला आहे. केंद्राने पारीत केलेल्या अ‍ॅट्रासिटी कायद्याच्या विपरीत हा निर्णय लागला असल्याने देशातील तमाम अनुसुचित जाती-जमातीमध्ये नाराजी पसरली आहे. या निर्णयावर पुनर्विचार करावा. यासाठी राज्य व केंद्र सरकारने आपली पुर्नविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या ९ बेंचच्या खंडपीठासमोर सादर करावी. या प्रकरणात अ‍ॅट्रासिटी कायद्यातील तज्ज्ञ ज्येष्ठ वकीलाची नेमणूक करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली.भीम आर्मी, भारत एकता मिशनचे संस्थापक अ‍ॅड. चंद्रशेखर आझाद यांना सर्व प्रकरणात जामीन मिळाला असतांना उत्तर प्रदेश प्रशासनाने त्यांच्यावर अन्यायकारक रासुंका कायदा लावला. गत १० महिन्यांपासून ते सहारनपूर उत्तर प्रदेश येथील कारागृहात आहेत. त्यांच्यावरील रासुंका मागे घेत त्यांची निर्दोष मुक्तता करावी. कोरेगाव भीमा येथील दंगलीनंतर ३ जानेवारीच्या आंदोलनात अनेक भीम सैनिकांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. ते तात्काळ महाराष्ट्र सरकारने मागे घ्यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.पुलगाव येथे बसपाचे कार्यकर्ते ताब्यातपुलगाव : शहरात बसपाद्वारे बंदला समर्थन दिले असतानाही शहरात बंद नसल्याचे दिसले. बंददरम्यान बसपाच्या स्थानिक शाखेद्वारा राजेश लोहकरे, विनोद बोरकर, जयवंत मिश्रा, धर्मपाल गायकवाड, हेमलता शंभरकर यांच्या नेतृत्वात इंदिरा मार्केट येथून २०-२० कार्यकर्त्यांसह मोर्चा काढण्यात आला. मोर्चा स्टेशन चौकात आल्यानंतर मोर्चेकºयांनी काही काळ रस्ता रोको आंदोलन केल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती; परंतु काही वेळातच पोलीस निरीक्षक मुरलीधर बुराडे यांच्या मार्गदर्शनात चोख पोलीस बंदोबस्तात मुंबई पोलीस कायद्याचे कलम ६८,६९ अन्वये मोर्चेकरी कार्यकर्त्यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवून ताब्यात घेतले व वाहतूक सुरळीत केली. या दरम्यान कुठलीही अनुचित प्रकार न घडता आंदोलन शांततेने पार पडले.हिंगणघाट येथेही निवेदनहिंगणघाट : अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात येथील भीम आर्मीच्यावतीने उपविभागिय अधिकाºयांना निवेदन सादर करण्यात आले. या निर्णयामुळे देशातील तमाम अनुसुचित जाती जमातीमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत असून या निर्णयावर पुनर्विचार करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या प्रकरणात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील तज्ज्ञ ज्येष्ठ वकिलाची नेमणूक करावी, अशी विनंती उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे. निवेदन देतेवेळी येथील भीम आर्मीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यांच्यावतीने निवेदनातून या निर्णयाचा निषेध नोंदविण्यात आला.