शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

पैशाअभावी बाळंतिणीचे जेवण केले बंद, सेवाग्राम रुग्णालयाचा प्रताप  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 04:05 IST

मध्यप्रदेशातून मोलमजुरीसाठी सेलू भागात महाबळा येथे वास्तव्यास असलेल्या एका गरीब आदिवासी महिलेची सेवाग्राम रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर पैशाचा भरणा न केल्याने तीन दिवसांपासून तिचे जेवण बंद केल्याचा संतापजनक प्रकार उजेडात आला आहे. अन्नाने व्याकुळ या महिलेवर बाळाला रुग्णालयात सोडून मदतीसाठी भटकण्याची वेळ आली आहे.

वर्धा : मध्यप्रदेशातून मोलमजुरीसाठी सेलू भागात महाबळा येथे वास्तव्यास असलेल्या एका गरीब आदिवासी महिलेची सेवाग्राम रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर पैशाचा भरणा न केल्याने तीन दिवसांपासून तिचे जेवण बंद केल्याचा संतापजनक प्रकार उजेडात आला आहे. अन्नाने व्याकुळ या महिलेवर बाळाला रुग्णालयात सोडून मदतीसाठी भटकण्याची वेळ आली आहे.कुणीतरी मला मदत करेल का? मला न्याय मिळेल का? म्हणत पानावलेल्या डोळ्याने ही महिला पैशाअभावी बाळाला सोडून यावे लागल्याने दु:ख व्यक्त करीत होती. हृदयाला पाझर फोडणारी ही तिची व्यथा ऐकून अनेकांनी शासन तथा रुग्णालय प्रशासनाबाबत रोष व्यक्त करीत तिला जेवण दिले.मध्यप्रदेशातील बैतुल येथील कुटुंब रोजगारासाठी सेलू येथे आले. सुखनंदनची पत्नी रेखा ही गरोदर झाली. तिला प्रसूतीसाठी सेवाग्राम रूग्णालयात दाखल केले. तिथे तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. प्रसुती सात महिन्यांत झाल्याने बाळाची प्रकृती ठिक नसल्याने त्याला अतिदक्षता विभागात ठेवणे गरजेचे होते. त्यासाठी सुखनंदन याने १० सप्टेंबर पर्यंत लागणारे १७ हजार ८३६ रूपयांचा भरणा केला.असे असताना रूग्णालय प्रशासनाच्यावतीने बाळाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्याने या महिलेने बाळासह घर गाठले. या प्रकरणी पोलिसात तक्रारही झाली होती. पोलिसांनी मध्यस्थी करताच बाळाला पुन्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र भरलेल्या पैशाची मुदत संपल्याने रूग्णालयाने या महिलेचे जेवण बंद केले.आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकात मोडणाºया सुखनंदन सिरसाम यांच्याकडे मध्यप्रदेश शासनाचे बीपीएल कार्ड आहे. आधार कार्डही आहे. मात्र तरीही सदर महिलेवर ही परिस्थिती उद्भवली आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार