शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्याची खबरदारी घेत सोमवारी शाळांची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 05:00 IST

जिल्ह्यात ९ ते १२ पर्यंतच्या एकूण ३५८ शाळा असून २ हजार २०० शिक्षक तर १ हजार १०० शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहे. शिक्षकांच्या कोविड चाचणीकरिता तालुका स्तरावर ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे. १७ नोव्हेंबरपासून कोविड चाचणी सुरु झाली असून २२ नोव्हेंबरपर्यंत ९ ते १२ वीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविड चाचणी करणे बंधनकारक आहे.

ठळक मुद्देशिक्षण विभागाकडून नियोजनाला सुरुवात : शिक्षकांना अ‍ॅन्टिजेन किंवा आरटीपीसीआर चाचणीचा पर्याय

  लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा :  राज्य शासनाने  ‘अनलॉक’ नंतर २३ नोव्हेंबरपासून इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आरोग्य विषयक खबरदारी घेण्याचे निर्देश दिले असून शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविड चाचणी करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे आता कोविड चाचणी करण्याकरिता शिक्षकांची गर्दी उसळली आहे. जिल्ह्यात ९ ते १२ पर्यंतच्या एकूण ३५८ शाळा असून २ हजार २०० शिक्षक तर १ हजार १०० शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहे. शिक्षकांच्या कोविड चाचणीकरिता तालुका स्तरावर ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे. १७ नोव्हेंबरपासून कोविड चाचणी सुरु झाली असून २२ नोव्हेंबरपर्यंत ९ ते १२ वीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविड चाचणी करणे बंधनकारक आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षकांना प्रथम अ‍ॅन्टिजेन आणि आवश्यकता असल्यास आरटीपीसीआर चाचणी करण्याचा पर्याय दिला आहे. या शाळांमध्ये तब्बल ७० हजार विद्यार्थी असून आरोग्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग केले जाणार आहेत. तसेच शाळांमध्ये शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. शाळांमधील सोयी-सुविधांचा तसेच शाळा व्यवस्थापन समितीचा आढावा शिक्षण विभागाकडून घेतला जात आहे. यासर्व खबरदारी घेऊनच सुरक्षित वातावरणात सोमवारपासून शाळा सुरु    करायच्या आहेत. पालकांनी भीती न बाळगता पाल्यांना शाळेत पाठवावे. सोबतच मुख्याध्यापकांनी सूचनाचे पालन करावे, असे शिक्षणाधिकारी डॅा. मंगेश घोगरे यांनी सांगितले आहे.

तर ऑनलाईन वर्ग घेतला जाणार नाहीशाळा व्यवस्थापन समितीला पालकांकडून संमतीपत्र घ्यावयाचे आहे. जर काही पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास परवानगी दिली नाही आणि वर्गात ५० टक्केच्यावर विद्यार्थी उपस्थित असल्यास ऑफलाईन वर्ग घेतला जाईल. अनुपस्थित विद्यार्थ्यांकरिता परत ऑनलाईन वर्ग घेतला जाणार नाहीत.

शिक्षकांची चार तास उपस्थिती अनिवार्यशासन निर्णयानुसार शाळेत १०० टक्के शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य असून कोणता वर्ग ऑनलाईन व कोणता ऑफलाईन घ्यावा, हा निर्णय मुख्याध्यापकाचा राहणार आहे. ऑनलाईन वर्ग घ्यावयाचा असल्यास शिक्षकाला शाळेत येण्याची आवश्यकता राहणार नाही. शाळेत शिक्षकांची कमीत कमी चार तास उपस्थिती अनिवार्य आहे. या कोविड काळात शिक्षकाचे अध्यापन झाल्यानंतर मुख्याध्यापक किंवा शाळा प्रशासनास इतर कामकाज नसल्यास घरी जाता येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद केले आहे.

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याSchoolशाळा