शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

आरोग्याची खबरदारी घेत सोमवारी शाळांची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 05:00 IST

जिल्ह्यात ९ ते १२ पर्यंतच्या एकूण ३५८ शाळा असून २ हजार २०० शिक्षक तर १ हजार १०० शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहे. शिक्षकांच्या कोविड चाचणीकरिता तालुका स्तरावर ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे. १७ नोव्हेंबरपासून कोविड चाचणी सुरु झाली असून २२ नोव्हेंबरपर्यंत ९ ते १२ वीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविड चाचणी करणे बंधनकारक आहे.

ठळक मुद्देशिक्षण विभागाकडून नियोजनाला सुरुवात : शिक्षकांना अ‍ॅन्टिजेन किंवा आरटीपीसीआर चाचणीचा पर्याय

  लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा :  राज्य शासनाने  ‘अनलॉक’ नंतर २३ नोव्हेंबरपासून इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आरोग्य विषयक खबरदारी घेण्याचे निर्देश दिले असून शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविड चाचणी करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे आता कोविड चाचणी करण्याकरिता शिक्षकांची गर्दी उसळली आहे. जिल्ह्यात ९ ते १२ पर्यंतच्या एकूण ३५८ शाळा असून २ हजार २०० शिक्षक तर १ हजार १०० शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहे. शिक्षकांच्या कोविड चाचणीकरिता तालुका स्तरावर ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे. १७ नोव्हेंबरपासून कोविड चाचणी सुरु झाली असून २२ नोव्हेंबरपर्यंत ९ ते १२ वीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविड चाचणी करणे बंधनकारक आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षकांना प्रथम अ‍ॅन्टिजेन आणि आवश्यकता असल्यास आरटीपीसीआर चाचणी करण्याचा पर्याय दिला आहे. या शाळांमध्ये तब्बल ७० हजार विद्यार्थी असून आरोग्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग केले जाणार आहेत. तसेच शाळांमध्ये शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. शाळांमधील सोयी-सुविधांचा तसेच शाळा व्यवस्थापन समितीचा आढावा शिक्षण विभागाकडून घेतला जात आहे. यासर्व खबरदारी घेऊनच सुरक्षित वातावरणात सोमवारपासून शाळा सुरु    करायच्या आहेत. पालकांनी भीती न बाळगता पाल्यांना शाळेत पाठवावे. सोबतच मुख्याध्यापकांनी सूचनाचे पालन करावे, असे शिक्षणाधिकारी डॅा. मंगेश घोगरे यांनी सांगितले आहे.

तर ऑनलाईन वर्ग घेतला जाणार नाहीशाळा व्यवस्थापन समितीला पालकांकडून संमतीपत्र घ्यावयाचे आहे. जर काही पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास परवानगी दिली नाही आणि वर्गात ५० टक्केच्यावर विद्यार्थी उपस्थित असल्यास ऑफलाईन वर्ग घेतला जाईल. अनुपस्थित विद्यार्थ्यांकरिता परत ऑनलाईन वर्ग घेतला जाणार नाहीत.

शिक्षकांची चार तास उपस्थिती अनिवार्यशासन निर्णयानुसार शाळेत १०० टक्के शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य असून कोणता वर्ग ऑनलाईन व कोणता ऑफलाईन घ्यावा, हा निर्णय मुख्याध्यापकाचा राहणार आहे. ऑनलाईन वर्ग घ्यावयाचा असल्यास शिक्षकाला शाळेत येण्याची आवश्यकता राहणार नाही. शाळेत शिक्षकांची कमीत कमी चार तास उपस्थिती अनिवार्य आहे. या कोविड काळात शिक्षकाचे अध्यापन झाल्यानंतर मुख्याध्यापक किंवा शाळा प्रशासनास इतर कामकाज नसल्यास घरी जाता येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद केले आहे.

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याSchoolशाळा