शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

मोई, वागदराचा मतदानावर १०० टक्के बहिष्कार; विखणीत पाच जणांचे मतदान

By admin | Updated: February 17, 2017 02:09 IST

कित्येक वर्षांपासूनच्या गावातील समस्या सोडविल्या जात नसल्याने चार गावांतील संतप्त ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.

धुमणखेडा गाव ठरले अपवाद : दुपारपर्यंतच ५० टक्के मतदानवर्धा : कित्येक वर्षांपासूनच्या गावातील समस्या सोडविल्या जात नसल्याने चार गावांतील संतप्त ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. यातील दोन गावांमध्ये कुणीही मतदान केले नाही. एका गावात पाच मतदारांनी हक्क बजावला तर एका गावातील बहिष्काराचा प्रयत्न विफल ठरला.मोई गावात एकही मत नाहीआष्टी तालुक्यातील मोई ग्रा.पं. अंतर्गत मोई, मुबारकपूर, कोल्हाकाळी या तीन गावांमिळून १८०० लोकसंख्या असून १२२५ मतदार आहे. या तीनही गावातील मतदानासाठी मोईमध्ये दोन केंद्र सज्ज करण्यात आले होते; पण ग्रामस्थांनी गावात पाणी नाही म्हणत मतदानावर बहिष्कार टाकला. दुपारी ठाणेदार दिलीप ठाकूर, तहसीलदार सीमा गजभिये यांनी मोई गावात जाऊन ग्रामस्थांना मतदान करण्याची विनंती केली; पण मतदारांनी चक्क नकार दिला. यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मोई येथील मते पारड्यात पाडून घेता आली नाही. याचा परिणाम निकालावर होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. वाघदराच्या ग्रामस्थांचाही बहिष्कारवर्धा तालुक्यातील आंजी जि.प. गट आणि मांडवा पं.स. गणात येणाऱ्या वाघदरा या गावातील नागरिकांनीही मतदानावर बहिष्कार टाकला. या गावात १३५ मतदार असून एकाही मतदाराने मतदान केले नाही. या गावात कुठल्याही मुलभूत सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. रस्ते नाही, नाल्यांचा अभाव आणि शिवाय पाण्यासाठीही भटकंती करावी लागते. याबाबत अनेकदा निवेदने देऊनही उपयोग होत नसल्याने ग्रामस्थांत असंतोष पसरला आहे. यामुळे गुरूवारी कुणीही मतदान केले नाही. रस्ते व मुलभूत सुविधांसाठी बहिष्कार समुद्रपूर तालुक्यातील विखणी हे गाव २० वर्षांपासून रस्ते, नाल्या व मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. यास्तव विखणी येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकला. या गावात सायंकाळपर्यंत केवळ पाच लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. विखणी येथून मुख्य बाजारपेठ सिंदी (रेल्वे) येथे जाण्याकरिता विखणी-जसापूर-दिग्रज असा रस्ता आहे; पण या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. विधानसभा निवडणुकीत गावाकडे लक्ष दिले जाईल, या आशेने ग्रामस्थांनी मतदान केले; पण दुर्लक्ष कायम राहिले. रुग्णालयात जाण्यासाठीही एकमेव रस्ता असल्याने प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे साकडे घातले; पण उपयोग झाला नाही. यामुळे जि.प., पं.स. निवडणुकीवर बहिष्कार टाकला. गुरूवारी येथे केवळ चार पुरूष व एका महिलेने मतदान केले. येथील मतदार संख्या ४५७ अशी आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)