शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

मोई, वागदराचा मतदानावर १०० टक्के बहिष्कार; विखणीत पाच जणांचे मतदान

By admin | Updated: February 17, 2017 02:09 IST

कित्येक वर्षांपासूनच्या गावातील समस्या सोडविल्या जात नसल्याने चार गावांतील संतप्त ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.

धुमणखेडा गाव ठरले अपवाद : दुपारपर्यंतच ५० टक्के मतदानवर्धा : कित्येक वर्षांपासूनच्या गावातील समस्या सोडविल्या जात नसल्याने चार गावांतील संतप्त ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. यातील दोन गावांमध्ये कुणीही मतदान केले नाही. एका गावात पाच मतदारांनी हक्क बजावला तर एका गावातील बहिष्काराचा प्रयत्न विफल ठरला.मोई गावात एकही मत नाहीआष्टी तालुक्यातील मोई ग्रा.पं. अंतर्गत मोई, मुबारकपूर, कोल्हाकाळी या तीन गावांमिळून १८०० लोकसंख्या असून १२२५ मतदार आहे. या तीनही गावातील मतदानासाठी मोईमध्ये दोन केंद्र सज्ज करण्यात आले होते; पण ग्रामस्थांनी गावात पाणी नाही म्हणत मतदानावर बहिष्कार टाकला. दुपारी ठाणेदार दिलीप ठाकूर, तहसीलदार सीमा गजभिये यांनी मोई गावात जाऊन ग्रामस्थांना मतदान करण्याची विनंती केली; पण मतदारांनी चक्क नकार दिला. यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मोई येथील मते पारड्यात पाडून घेता आली नाही. याचा परिणाम निकालावर होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. वाघदराच्या ग्रामस्थांचाही बहिष्कारवर्धा तालुक्यातील आंजी जि.प. गट आणि मांडवा पं.स. गणात येणाऱ्या वाघदरा या गावातील नागरिकांनीही मतदानावर बहिष्कार टाकला. या गावात १३५ मतदार असून एकाही मतदाराने मतदान केले नाही. या गावात कुठल्याही मुलभूत सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. रस्ते नाही, नाल्यांचा अभाव आणि शिवाय पाण्यासाठीही भटकंती करावी लागते. याबाबत अनेकदा निवेदने देऊनही उपयोग होत नसल्याने ग्रामस्थांत असंतोष पसरला आहे. यामुळे गुरूवारी कुणीही मतदान केले नाही. रस्ते व मुलभूत सुविधांसाठी बहिष्कार समुद्रपूर तालुक्यातील विखणी हे गाव २० वर्षांपासून रस्ते, नाल्या व मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. यास्तव विखणी येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकला. या गावात सायंकाळपर्यंत केवळ पाच लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. विखणी येथून मुख्य बाजारपेठ सिंदी (रेल्वे) येथे जाण्याकरिता विखणी-जसापूर-दिग्रज असा रस्ता आहे; पण या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. विधानसभा निवडणुकीत गावाकडे लक्ष दिले जाईल, या आशेने ग्रामस्थांनी मतदान केले; पण दुर्लक्ष कायम राहिले. रुग्णालयात जाण्यासाठीही एकमेव रस्ता असल्याने प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे साकडे घातले; पण उपयोग झाला नाही. यामुळे जि.प., पं.स. निवडणुकीवर बहिष्कार टाकला. गुरूवारी येथे केवळ चार पुरूष व एका महिलेने मतदान केले. येथील मतदार संख्या ४५७ अशी आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)