शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

मोई, वागदराचा मतदानावर १०० टक्के बहिष्कार; विखणीत पाच जणांचे मतदान

By admin | Updated: February 17, 2017 02:09 IST

कित्येक वर्षांपासूनच्या गावातील समस्या सोडविल्या जात नसल्याने चार गावांतील संतप्त ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.

धुमणखेडा गाव ठरले अपवाद : दुपारपर्यंतच ५० टक्के मतदानवर्धा : कित्येक वर्षांपासूनच्या गावातील समस्या सोडविल्या जात नसल्याने चार गावांतील संतप्त ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. यातील दोन गावांमध्ये कुणीही मतदान केले नाही. एका गावात पाच मतदारांनी हक्क बजावला तर एका गावातील बहिष्काराचा प्रयत्न विफल ठरला.मोई गावात एकही मत नाहीआष्टी तालुक्यातील मोई ग्रा.पं. अंतर्गत मोई, मुबारकपूर, कोल्हाकाळी या तीन गावांमिळून १८०० लोकसंख्या असून १२२५ मतदार आहे. या तीनही गावातील मतदानासाठी मोईमध्ये दोन केंद्र सज्ज करण्यात आले होते; पण ग्रामस्थांनी गावात पाणी नाही म्हणत मतदानावर बहिष्कार टाकला. दुपारी ठाणेदार दिलीप ठाकूर, तहसीलदार सीमा गजभिये यांनी मोई गावात जाऊन ग्रामस्थांना मतदान करण्याची विनंती केली; पण मतदारांनी चक्क नकार दिला. यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मोई येथील मते पारड्यात पाडून घेता आली नाही. याचा परिणाम निकालावर होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. वाघदराच्या ग्रामस्थांचाही बहिष्कारवर्धा तालुक्यातील आंजी जि.प. गट आणि मांडवा पं.स. गणात येणाऱ्या वाघदरा या गावातील नागरिकांनीही मतदानावर बहिष्कार टाकला. या गावात १३५ मतदार असून एकाही मतदाराने मतदान केले नाही. या गावात कुठल्याही मुलभूत सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. रस्ते नाही, नाल्यांचा अभाव आणि शिवाय पाण्यासाठीही भटकंती करावी लागते. याबाबत अनेकदा निवेदने देऊनही उपयोग होत नसल्याने ग्रामस्थांत असंतोष पसरला आहे. यामुळे गुरूवारी कुणीही मतदान केले नाही. रस्ते व मुलभूत सुविधांसाठी बहिष्कार समुद्रपूर तालुक्यातील विखणी हे गाव २० वर्षांपासून रस्ते, नाल्या व मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. यास्तव विखणी येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकला. या गावात सायंकाळपर्यंत केवळ पाच लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. विखणी येथून मुख्य बाजारपेठ सिंदी (रेल्वे) येथे जाण्याकरिता विखणी-जसापूर-दिग्रज असा रस्ता आहे; पण या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. विधानसभा निवडणुकीत गावाकडे लक्ष दिले जाईल, या आशेने ग्रामस्थांनी मतदान केले; पण दुर्लक्ष कायम राहिले. रुग्णालयात जाण्यासाठीही एकमेव रस्ता असल्याने प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे साकडे घातले; पण उपयोग झाला नाही. यामुळे जि.प., पं.स. निवडणुकीवर बहिष्कार टाकला. गुरूवारी येथे केवळ चार पुरूष व एका महिलेने मतदान केले. येथील मतदार संख्या ४५७ अशी आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)