शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
2
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
3
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
4
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
5
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
6
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
7
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
8
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
9
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
10
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
11
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
12
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
13
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
14
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
15
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
16
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
17
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
18
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
19
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
20
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!

मोदी चौकीदार नाही तर भागीदार : वर्धेच्या सभेत राहुल गांधी यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 20:45 IST

द्वेषाचे राजकारण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी देश तोडण्याचे काम करीत आहेत. त्यांनी देशाला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. मोदी देशाचे चौकीदार नाहीत तर ‘राफेल’मध्ये भागीदार आहेत. जनतेचा पैसा लुटून निवडक उद्योगपतींच्या खिशात टाकत आहेत, असा थेट आरोप करीत अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. देशाने मोदींना ‘ट्राय’ केले, ते ‘फेल’ ठरले. त्यांची गाडी ‘पंक्चर’ झाली. आता पुढे चालणार नाही, असे टीकास्त्र सोडत आता एकदा काँग्रेसवर विश्वास करून पहा, असे आवाहनही त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.

ठळक मुद्देसोनिया गांधी, मनमोहनसिंग यांच्यासह दिग्गज नेत्यांची उपस्थिती : सेवाग्राममध्ये बापू कुटीला भेट

 

कमलेश वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : द्वेषाचे राजकारण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी देश तोडण्याचे काम करीत आहेत. त्यांनी देशाला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. मोदी देशाचे चौकीदार नाहीत तर ‘राफेल’मध्ये भागीदार आहेत. जनतेचा पैसा लुटून निवडक उद्योगपतींच्या खिशात टाकत आहेत, असा थेट आरोप करीत अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. देशाने मोदींना ‘ट्राय’ केले, ते ‘फेल’ ठरले. त्यांची गाडी ‘पंक्चर’ झाली. आता पुढे चालणार नाही, असे टीकास्त्र सोडत आता एकदा काँग्रेसवर विश्वास करून पहा, असे आवाहनही त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.राहुल गांधी यांच्यासह ‘युपीए’च्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग व काँग्रेस नेत्यांनी मंगळवारी सकाळी सेवाग्राम येथील बापू कुटीला भेट देऊन दर्शन घेतले. यानंतर येथील महादेव भवनात काँग्रेस कार्यसमितीची बैठक झाली. बैठकीनंतर राहुल गांधी यांची वर्धा येथे पदयात्रा होऊन सर्कल ग्राऊंड मैदानावर संकल्प रॅली झाली. या जाहीर सभेत राफेल विमान खरेदीच्या मुद्यावरून राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी विमान निर्मितीचा कुठलाही अनुभव नसताना अनिल अंबानी यांच्या कंपनीला थेट ३० हजार कोटींचे कंत्राट दिले. ४५ हजार कोटींचे कर्ज असलेल्या अंबानींवर मोदींनी कृपा केली. मोदी अंबानीला सोबत फ्रान्सला घेऊन गेले. ५२६ कोटींना मिळणारे एक राफेल विमान तब्बल १६०० कोटींमध्ये करण्याचा प्रताप त्यांनी केला. स्वत:ला देशाचा चौकीदार सांगणारे मोदी हे चौकीदार नसून भागीदार आहेत, असा आरोप त्यांनी केला.गांधी जोडतात, मोदी तोडतात आज मोदी गांधींच्या पुतळ्यासमोर उभे राहून हात जोडतात. मात्र, गांधींनी दिलेली शिकवण त्यांना मान्य नाही. गांधी जोडतात तर मोदी तोडण्याचे काम करतात. मोदी धर्म, जातीत भांडणे लावतात. क्रोध निर्माण करतात, अशी टीकाही त्यांनी केली.दिग्गज नेत्यांची उपस्थितीसभेला लोकसभेतील नेते महाराष्ट्र प्रभारी खा. मल्लिकार्जून खरगे, राज्यसभेतील नेते खा. गुलामनबी आझाद, खा. अहमद पटेल, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, संघटन महासचिव अशोक गहलोत, पुड्डुचेरीचे मुख्यमंत्री नारायण सामी, वीरप्पा मोईली, मोतीलाल व्होरा, ए.के. अ‍ॅन्टोनी, आनंद शर्मा, सुशीलकुमार शिंदे, जनार्दन द्विवेदी, अंबिका सोनी, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, हरीश रावत, पी.एल. पुनिया, ज्योतिरादित्य शिंदे, मोहसिना किदवाई, प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विलास मुत्तेमवार, खा. राजीव सातव,बाला बच्चन, संजय निरुपम, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, नाना पटोले, नितीन राऊत, अनिस अहमद, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, नसिम खान, महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष चारुलता टोकस, हर्षवर्धन सपकाळ, भाई जगताप, आ. अमर काळे, आ. वीरेंद्र जगताप, रावसाहेब शेखावत, आ. प्रणिती शिंदे उपस्थित होते.मोदी केवळ श्रीमंतांसाठी काम करतातमोदींनी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. पंतप्रधान होताच दोन कोटी लोकांना नोकऱ्या देणार होते. देशभरातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार होते, असे सांगत मोदी देशाशी खरे बोलले की खोटे, असा सवाल त्यांनी केला. जनतेनेही त्यांना ‘खोटे बोलले’ असे सांगत जोरदार प्रतिसाद दिला. मोदींनी गेल्या चार वर्षात देशातील निवडक दहा ते पंधरा उद्योगपतींचे तबब्ल ३ लाख २० हजार कोटी माफ केले. शेतकऱ्यांच्या कर्ममाफीसाठी मात्र नकार दिला. मोदींनी नोटबंदी लादून आपल्या घरातील पैसा हिसकावून बँकेत भरण्यास भाग पाडले. बँकेच्या रांगेत अनिल अंबानी, नीरव मोदी, मेहूल चौकसी हे कधीच दिसले नाहीत. त्यांनी बँकेच्या मागच्या दारातून आपला काळा पैसा पांढरा केला. जगात कच्च्या तेलाचे भाव कमी होत असताना भारतात मात्र पेट्रोल, डिझेलचे भाव दररोज वाढत आहेत. मोदी सामान्यांच्या खिशातील पैसा काढून तो निवडक श्रीमंतांच्या खिशात टाकण्याचे काम करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला.मंचावरून उतरले अन् उपस्थितांना जिंकले... सभेनंतर राहुल गांधी मंचावरून खाली उतरले व समोर उपस्थित जनसमुदायाला भेटण्यासाठी पुढे सरसावले. सर्वांना हात उंचावून अभिवादन करीत ते पायी फिरले. यामुळे उपस्थितांमध्ये उत्साह संचारला होता. तत्पूर्वी उपस्थितांमधील एका चिमुकलीला राहुल गांधी यांनी मंचावर बोलावून घेतले. तिला भेटवस्तू दिली व ‘आॅटोग्राफ’ही दिला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSewagramसेवाग्राम