शहरं
Join us  
Trending Stories
1
पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल
2
'राईचा पर्वत केला'; सरन्यायाधीश गवईंनी प्रोटोकॉल प्रकरणात याचिका करणाऱ्या वकिलाला झापले
3
‘७५ वर्षं जगला, खूप झालं, आता पाकिस्तानचे फार दिवस उरलेले नाहीत’, योगी आदित्यनाथ यांचा इशारा 
4
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
5
राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; महावितरणकडून ‘हाय अलर्ट’ जारी
6
रोहित- विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? गंभीरनं एका वाक्यात दिलं उत्तर!
7
जसप्रीत बुमराहने वाढवलं BCCIचं टेन्शन, टीम इंडियातून इंग्लंड दौऱ्यावर फक्त इतकेच सामने खेळणार
8
ज्यांनी ट्रेनिग दिले त्यांनाच डसला! AI ने मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालविल्या
9
मुंबई-दिल्ली महामार्गावर कार थांबवली, महिलेसोबत सुरू केले अश्लील चाळे, भाजपा नेत्याचा व्हिडीओ व्हायरल 
10
२५ लाख रोजगार, ७५ हजार कोटींची गुंतवणूक! मुकेश अंबानी 'या' राज्यातील तरुणांचं बदलणार भविष्य
11
भारत पाकिस्तानला आणखी एक दणका देण्याच्या तयारीत; FATF ग्रे लिस्टमध्ये येणार पाक...
12
'धरीला पंढरीचा चोर' गाण्यातील 'मुक्ता'ने जिंकलं प्रेक्षकांचं मन! सध्या काय करते अभिनेत्री?
13
Ritual: 'हुंडा देणे' ही कुप्रथा भारतीय संस्कृतीत वा इतिहासात नव्हतीच, मग आली कुठून?
14
शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाले? डिमॅट अकाउंट कायमचं कसं बंद करायचं? 'ही' आहे सोपी पद्धत
15
पीडित तरुणीचे आरोपीवर प्रेम, लग्नही केले; सर्वोच्च न्यायालयाला बदलावा लागला आपलाच निर्णय...
16
बीडमधील पवनचक्की प्रकल्प पुन्हा चर्चेत; सुरक्षारक्षकांचा चोरट्यांवर गोळीबार, एक ठार
17
मोठी घटना! भारतीय खासदारांचे विमान लँड होणार, तेवढ्यात युक्रेनने विमानतळावर केला हल्ला
18
"तिला घटस्फोट दे, नाहीतर तुला जिवे मारू’’, पत्नीच्या प्रियकराने दिलेल्या धमकीमुळे पती घाबरला, त्यानंतर...  
19
बिटकॉइन म्हणजे काय? ते कोण बनवतं? बँकेशिवाय कसं काम करतं? वाचा!
20
Vaishnavi Hagawane Death Case : राजेंद्र हगवणे अटकेआधी कुठे-कुठे फिरला?, समोर आली मोठी माहिती

महागाईच्या दिवसांत माफक अन् मोफत धान्याचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 05:00 IST

जिल्ह्यात अंत्योदय, प्राधान्य कुटुंब आणि शेतकरी गटातील ११ लाख ३१ हजार ९६५ लाभार्थी असून या सर्वांना वितरण व्यवस्थेव्दारे स्वस्त दरात धांन्य पुरवठा होतो. पण, कोरोनायनापासून प्राधान्य आणि अंत्योदय गटाकरिता नियमित धान्यासोबत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजनेतून मोफत धांन्य दिले जाते. त्यामुळे धान्य कोंडी सुटली असून दोन वेळच्या जेवणाची सोय झाली आहे.

आनंद इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या महामारीनंतर आता नागरिकांना महागाईची मार सहन करावा लागत आहे. धान्यासोबतच, जीवनावश्यक वस्तूंच्या दराचा भडका उडाल्याने दैनंदिन जीवनाचे अर्थचक्रच कोलमडले आहे. अशा परिस्थिती शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेव्दारे मिळणाऱ्या माफक दरातील आणि मोफत धान्याचा मोठा आधार मिळत आहे.जिल्ह्यात अंत्योदय, प्राधान्य कुटुंब आणि शेतकरी गटातील ११ लाख ३१ हजार ९६५ लाभार्थी असून या सर्वांना वितरण व्यवस्थेव्दारे स्वस्त दरात धांन्य पुरवठा होतो. पण, कोरोनायनापासून प्राधान्य आणि अंत्योदय गटाकरिता नियमित धान्यासोबत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजनेतून मोफत धांन्य दिले जाते. त्यामुळे धान्य कोंडी सुटली असून दोन वेळच्या जेवणाची सोय झाली आहे. लाभार्थी अतिरिक्त धान्याची विक्री करून इतर धान्य किंवा वस्तू विकत घेत असल्याचे गावापासून तर शहरापर्यंतचे चित्र आहे. शासनाकडून मिळणारे गहू, तांदूळ आणि साखरेची किंमत  खुल्या बाजारात दुप्पट ते चौपट असल्याने या महागाईत कधी धान्याची उचल न करणारेही नियमित उचल करायला लागल्याचे चित्र आहे. 

नोव्हेंबरपर्यंत मोफत धांन्य योजनेचा लाभकोरोनाकाळात रोजगार हिरावल्याने धान्य कोंडी होऊन उपासमारीचा सामना करावा लागू नयेत, याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांना नियमित धान्यासोबतच मोफत धान्य देण्याला सुरुवात केली आहे. सुरुवातीला पाच किलो तांदूळ दिले जायचे. त्यानंतर तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ द्यायला सुरुवात केली. अजूनही हे माफत धान्य वितरण सुरूच असून नोव्हेंबर महिन्यापर्यंत हा वाटप राहणार आहे. या योजनेतून जिल्ह्याकरिता दरमहा ५ हजार ४७२ मेट्रिक टन धान्य उपलब्ध होत आहे. यामध्ये ३ हजार २५० मेट्रिक टन गहू आणि २ हजार २३२ मेट्रिक टन तांदळाचा समावेश आहे.

जिल्ह्यामध्ये एकूण २ लाख ७९ हजार ९७४ कार्डधारक असून लाभार्थ्यांची संख्या ११ लाख ३१ हजार ९६५ आहेत. या सर्व लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेव्दारे नियमित धान्य पुरवठा केला जातो. याकरिता दरमहा ६ हजार ५०८ मेट्रिक टन धान्य लागते. सोबतच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजनेतून ५ हजार ५८२ मेट्रिक टन धान्य दिले जाते. ऑगस्ट महिन्याचे आजपर्यंत ८० टक्के धान्य वाटप झाले आहे. उर्वरित लाभार्थ्यांनाही धान्य वाटप सुरु असून त्यांनी दुकानातून धान्याची उचल करावी. - रमेश बेंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या