शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीराव फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

महागाईच्या दिवसांत माफक अन् मोफत धान्याचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 05:00 IST

जिल्ह्यात अंत्योदय, प्राधान्य कुटुंब आणि शेतकरी गटातील ११ लाख ३१ हजार ९६५ लाभार्थी असून या सर्वांना वितरण व्यवस्थेव्दारे स्वस्त दरात धांन्य पुरवठा होतो. पण, कोरोनायनापासून प्राधान्य आणि अंत्योदय गटाकरिता नियमित धान्यासोबत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजनेतून मोफत धांन्य दिले जाते. त्यामुळे धान्य कोंडी सुटली असून दोन वेळच्या जेवणाची सोय झाली आहे.

आनंद इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या महामारीनंतर आता नागरिकांना महागाईची मार सहन करावा लागत आहे. धान्यासोबतच, जीवनावश्यक वस्तूंच्या दराचा भडका उडाल्याने दैनंदिन जीवनाचे अर्थचक्रच कोलमडले आहे. अशा परिस्थिती शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेव्दारे मिळणाऱ्या माफक दरातील आणि मोफत धान्याचा मोठा आधार मिळत आहे.जिल्ह्यात अंत्योदय, प्राधान्य कुटुंब आणि शेतकरी गटातील ११ लाख ३१ हजार ९६५ लाभार्थी असून या सर्वांना वितरण व्यवस्थेव्दारे स्वस्त दरात धांन्य पुरवठा होतो. पण, कोरोनायनापासून प्राधान्य आणि अंत्योदय गटाकरिता नियमित धान्यासोबत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजनेतून मोफत धांन्य दिले जाते. त्यामुळे धान्य कोंडी सुटली असून दोन वेळच्या जेवणाची सोय झाली आहे. लाभार्थी अतिरिक्त धान्याची विक्री करून इतर धान्य किंवा वस्तू विकत घेत असल्याचे गावापासून तर शहरापर्यंतचे चित्र आहे. शासनाकडून मिळणारे गहू, तांदूळ आणि साखरेची किंमत  खुल्या बाजारात दुप्पट ते चौपट असल्याने या महागाईत कधी धान्याची उचल न करणारेही नियमित उचल करायला लागल्याचे चित्र आहे. 

नोव्हेंबरपर्यंत मोफत धांन्य योजनेचा लाभकोरोनाकाळात रोजगार हिरावल्याने धान्य कोंडी होऊन उपासमारीचा सामना करावा लागू नयेत, याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांना नियमित धान्यासोबतच मोफत धान्य देण्याला सुरुवात केली आहे. सुरुवातीला पाच किलो तांदूळ दिले जायचे. त्यानंतर तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ द्यायला सुरुवात केली. अजूनही हे माफत धान्य वितरण सुरूच असून नोव्हेंबर महिन्यापर्यंत हा वाटप राहणार आहे. या योजनेतून जिल्ह्याकरिता दरमहा ५ हजार ४७२ मेट्रिक टन धान्य उपलब्ध होत आहे. यामध्ये ३ हजार २५० मेट्रिक टन गहू आणि २ हजार २३२ मेट्रिक टन तांदळाचा समावेश आहे.

जिल्ह्यामध्ये एकूण २ लाख ७९ हजार ९७४ कार्डधारक असून लाभार्थ्यांची संख्या ११ लाख ३१ हजार ९६५ आहेत. या सर्व लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेव्दारे नियमित धान्य पुरवठा केला जातो. याकरिता दरमहा ६ हजार ५०८ मेट्रिक टन धान्य लागते. सोबतच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजनेतून ५ हजार ५८२ मेट्रिक टन धान्य दिले जाते. ऑगस्ट महिन्याचे आजपर्यंत ८० टक्के धान्य वाटप झाले आहे. उर्वरित लाभार्थ्यांनाही धान्य वाटप सुरु असून त्यांनी दुकानातून धान्याची उचल करावी. - रमेश बेंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या