शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

जलसंधारणासाठी काकडधरा ठरले मॉडेल

By admin | Updated: July 13, 2017 00:52 IST

पाणीटंचाईचा सातत्याने सामना करताना आपले गाव पाण्यासाठी स्वयंपूर्ण व्हावे यासाठी सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेमध्ये

सत्यमेव जयतेच्या वॉटरकपमध्ये घेतली आघाडी : ५२ गावांमध्येही जलसंधारणाचा आदर्श पॅटर्न लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : पाणीटंचाईचा सातत्याने सामना करताना आपले गाव पाण्यासाठी स्वयंपूर्ण व्हावे यासाठी सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेमध्ये सहभागी होवून काकडधरा गावाने जलसंधारणाची कामे पूर्ण केली. संपूर्ण गाव जलयुक्त करण्याचा अभिनव उपक्रम जिल्ह्यातील अतिदुर्गम व आदिवासीबहुल काकडधरा या गावाने यशस्वीपणे राबवित वॉटरकप स्पर्धेत आघाडी घेतली आहे. जलदेवतेचे गाव म्हणून काकडदरा हे गाव संपूर्ण राज्यात ओळखले जात असून जलसंधारणाचे मॉडेल ठरले आहे. यासह आर्वी तालुक्यातील ५२ गावांनीही वॉटरकप स्पर्धेत उतरुन पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना यशस्वीपणे पूर्ण केल्या. सत्यमेव जयतेकडून वॉटरकप स्पर्धा जाहीर झाल्यानंतर नागपूर विभागात केवळ आर्वी तालुक्याने पुढाकार घेवून काकडधरासह ५२ गावांनी स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्धार केला होता. यासाठी आर्वीचे सुमित वानखेडे तसेच युवा सहकाऱ्यांंनी केलेल्या दीड महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर ५२ गावात जलसंधारणाची विविध कामे यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. यासाठी गावातील सरपंच व ग्रामस्थांचा सहभाग मिळाल्यामुळे लोकसहभागातून करावयाच्या विविध कामांना चांगला प्रतिसाद मिळाला. या संपूर्ण उपक्रमाची प्रेरणा ठरली ते गाव म्हणजे काकडधरा. गावात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब अडवून ग्रामस्थांनी श्रमदानाने उभ्या केलेल्या जलसंधारणाच्या उपचारामुळे पहिल्याच पावसात हे गाव पाणीदार ठरले आहे. ग्रामदेवता म्हणून जलदेवतेची प्रतिस्थापना हे या गावाचे वैशिष्ट्य ठरले. वॉटरकप स्पर्धेच्या अंतिम निवडीमध्ये आपले गाव निश्चित आघाडीवर राहील हा आत्मविश्वास येथील ग्रामस्थांना आहे. काकडधरा या गावाने जलसंधारणाच्या केलेल्या विविध उपक्रमामुळे या गावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा निर्माण होणार आहे. यामध्ये सलग समतल चर (सीसीटी) बांधकामामुळे ७५.८४ घनमीटर, कंटुर बांधकामामुळे २ हजार ९३८.६४ घनमीटर तसेच अनघड दगडी बांधामुळे ९१९.०६ घनमीटर कामामुळे मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण होणार आहे. ही संपूर्ण कामे ग्रामस्थांनी सकाळी ६ ते रात्री उशिरापर्यंत श्रमदानाने पूर्ण केली आहे. अशा प्रकारचा उपक्रम प्रथमच होत आहे. श्रमदानाबरोबरच लोकसभागातून मशीनद्वारे खोल, समतल, पातळीचर, शेतीबांध बंदीस्ती, कपॉर्मेंट बंडींग, कंटुर बंध, शेततळे, लहान माती बंधारा, माती नाला बांध, नाला खोलीकरण व रुंदीकरणाची सरासरी ५६ हजार ६६५.८९ घनमीटरची कामे पूर्ण झाली आहेत. जलयुक्त शिवारासोबतच गाव स्वच्छ व पर्यावरणयुक्त राहावे यासाठी प्रत्येक घरातून वाहणारा सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ७० शोषखड्डे खोदण्यात आले आहे. विहीर पूर्नभरण व रचनांची दुरुस्तीची कामे पूर्ण करतानाच गावात वृक्षारोपण करण्यासाठी चारशे खड्डे खोदून तेथे वृक्षलागवड करण्यात आली. काकडधरासह पिंपळगाव (भोसले), नेरी (मिझार्पूर), बोथली (नटाळा) या गावानेही काकडधराचा आदर्श पुढे नेऊन नाला खोलीकरण, रुंदीकरण, शेततळे, कम्पार्टमेन्ट बंडींग, लहान माती बंधारा, दगडी बांध अशी प्रत्येक गावात सरासरी ६० हजार ते ६५ हजार घनमीटरची कामे पूर्ण केली आहे. त्यासोबत गावात शोषखड्डे व प्रत्येक गावात वृक्षारोपणासाठी सरासरी चारशे ते पाचशे खड्डे खोदून वृक्षरोपणाला सुरुवात केली आहे. या गावाचा आदर्श घेत तालुक्यातील सावंगी (पोळ), पिंपळखुटा, माळेगाव (ठेका), बोथली (किन्हाळा), सावद, विरुळ, रसुलाबाद, दिघी, रोहणा, बेढोणा, बेलोरा, वाढोणा, दहेगाव (मुस्तफा), तळेगाव (रघुजी), पानवाडी, बोरगाव (हातला), उमरी (सुकळी) या गावातही जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी सहभाग घेत श्रमदान करुन कामे पूर्ण केली आहे. सत्यमेव जयतेच्या वॉटरकप स्पर्धेच्या निमित्ताने ‘जल है तो कल है’, हा एकच ध्यास घेवून पाण्यासाठी पुढच्या पिढीला त्रास होवू नये यासाठी जलयुक्त शिवारसाठी हजारो हात एकत्र आले आहेत. उद्देश केवळ गावं जलयुक्त करण्याचा. पहिल्याच पावसात ६६ हजार ६९९ घ.मी. जलसाठा पिण्याच्या पाण्यासाठी स्वयंपूर्णतेकडे जातांना आदिवासीबहुल काकडधरा या गावाने लोकसहभागातून तसेच स्व: परिश्रमातून गावात ६२ हजार ५९०.०७ घनमीटर जलसाठा निर्माण होईल ऐवढी कामे केली आहे. या कामाची दखल सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या चमुने सुध्दा घेतली आहे. या गावासोबतच पिंपळगाव (भोसले) येथे ५६ हजार ५८४.९२ घनमीटर, नेरी (मिझार्पूर) एकूण ७० हजार ९६४.१६ घनमीटर तर बोथली (नटाळा) यागावातही राबविलेल्या विविध उपचारामुळे ७५ हजार ६२१.९८ घनमीटर जलसाठा निर्माण होणार आहे. पहिल्याच पावसात या गावांमध्ये राबविलेल्या विविध उपक्रमात जलसाठा निर्माण झाल्यामुळे गावकरी आनंदीत झाले आहेत.