शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

अतिवृष्टीग्रस्तांना मदत वाटपाच्या याद्या गहाळ

By admin | Updated: February 9, 2015 23:17 IST

गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतमाल उद्ध्वस्त होऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याची दखल घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी साडेचार हजार रुपयांची मदत जाहीर झाली़

आष्टी (श़) : गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतमाल उद्ध्वस्त होऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याची दखल घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी साडेचार हजार रुपयांची मदत जाहीर झाली़ यामुळे महसूल यंत्रणा याद्या करण्यात व्यस्त झाली. या याद्या बँकांना पाठविल्याचे सांगण्यात आले़ प्रत्यक्षात मात्र बँकांमध्ये याद्या पोहोचल्याच नसल्याचे बँक अधिकारी बोलत आहे़ यामुळे याद्या गहाळ झाल्या वा त्या तयारच झाल्या नाही, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आष्टी तालुक्यात २६ हजार शेतकरी हे एक हेक्टरवरील तर ९ हजार ३०० शेतकरी अल्पभूधारक आहेत. गतवर्षी कपाशी, तूर, सोयाबीन, संत्रा आदी पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. हातचे पीक गेल्याने शेतकरी निराश झाले़ याच नैराश्यातून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या़ या नुकसानीची दखल घेत शासनाने सरसकट मदत वाटपाचा कार्यक्रम जाहीर केला. प्रारंभी राज्य शासनाने दोन हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले़ केंद्राकडूनही मदत मागण्यात आली़ महसूल यंत्रणेला त्वरित मदत वाटपाचे निर्देश देण्यात आले; पण मदत वाटप अद्यापही झालेच नाही. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत़ थोडीफार मदत कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कामी येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती; पण ती फोलच ठरत आहे़ अतिवृष्टीच्या मदत वाटपात शासनानेच घोळ घालून ठेवल्याचे समोर आले आहे. अनेक तलाठ्यांनी गतवर्षीच्या जुन्याच याद्या पाठविल्याने खरे नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहत असल्याचे दिसून येते़ ज्यांचे नुकसान झाले, त्यांना मदत मिळावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे; पण यातही गौडबंगाल होत असलयचेच दिसून येत आहे़ यामुळे शासनाने निधी वाटपाचा प्रश्न त्वरित मार्गी लावावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहेत.(प्रतिनिधी)