शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी भरतीत गैरप्रकार, पुरवठा विभागात हप्तेवारी

By admin | Updated: June 3, 2016 02:08 IST

तलाठी पदभरतीमध्ये गैरप्रकार करण्यात आला आहे. स्वस्त धान्य दुकानदारांवर मेहरबानी दाखवित वसुली केली ...

तहसीलदारांवर गंभीर आरोप : मोईच्या सरपंचाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारआष्टी (शहीद) : तलाठी पदभरतीमध्ये गैरप्रकार करण्यात आला आहे. स्वस्त धान्य दुकानदारांवर मेहरबानी दाखवित वसुली केली जात असल्याचा आरोप मोई येथील सरपंच सुधाकर पवार यांनी केला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणात काय कार्यवाही होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.निवेदनानुसार, मौजा मुबारकपूर व आबाद (किन्ही) येथील नागरिकांसाठी पुरवठा विभागाने एन.डी. पवार यांना परवाना दिला. त्यांनी योग्यरित्या धान्य पुरवठा केला नाही. एकाच ग्राहकाचे दोन कार्ड तयार करून बेकायदेशीर धान्य उचल केली, असा आरोप पवार यांनी केला आहे. याप्रकरणी तहसीलदारांकडे लेखी तक्रार करूनही कार्यवाही झाली नाही. प्रथमदर्शनी गुन्हा सिद्ध होऊनही पोलिसांत गुन्हा दाखल केला नाही. नवीन कार्ड काढण्याकरिता तहसीलदार गजभिये यांच्याकडे रितसर अर्ज सादर केल्यानंतरही नागरिकांना दोन महिने कार्ड दिले जात नाही. परिणामी, नागरिक धान्यापासून वंचित आहे. तालुक्यात ६० स्वस्त धान्य दुकानदार व ७४ केरोसीन विक्रेते आहे. हे गरजूंना शासकीय मापाप्रमाणे वाटप करीत नाही. याप्रकरणी अनेक तक्रारी केल्या. त्याची दखल घेतली नाही. सरपंच पवार यांनी शासकीय धान्य दुकानदारांकडे चौकशी केली असता सर्व विक्रेत्यांकडून महिन्याकाठी अंदाजे दुकानदार ५०० रुपये व केरोसीन विक्रेते ३०० रुपये, असे ५० हजार रुपये दरमहा उकळतात, असे गंभीर आरोप पवार यांनी केले आहे. आष्टी तहसील कार्यालयांतर्गत रिक्त असलेल्या मौजातील कोतवालाच्या जागा मे महिन्यात भरल्या. यासाठी सुशिक्षीत उमेदवारांनी अर्ज केले होते; पण मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या परिचयातील उमेदवारांना नियम डावलून नियुक्ती दिली. यात प्रत्येकाकडून ५० हजार ते १ लाख २५ हजार रुपये घेण्यात आले. या नियुक्त्या तहसीलदारांनी केल्याचा आरोपही पवार यांनी केला. कोतवाल भरती मंडळ अधिकारी, पटवारी व राजकीय व्यक्तींच्या वरदहस्ताखाली पैसे घेऊन झाली. शिक्षित, मेहनती व गरजुंना डावलण्यात आले. कोतवाल भरतीची चौकशी करून कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली. याप्रकरणी मुख्यमंत्री, महसूल मंत्री, अन्न नागरी पुरवठा मंत्री, मुख्य सचिव, महसूल आयुक्त यांना लेखी निवेदनाद्वारे रजिस्टर्ड तक्रार करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)शेतकऱ्यांच्या नोंदी घेण्यासाठी होते पैशाची मागणीशेतकऱ्यांच्या शेतात नोंदणी, फेरफार व पीक नोंदीकरिता अर्ज देऊनही मंडळ अधिकारी व पटवारी ४-५ महिने नोंदी रेकॉर्डला घेऊन मंजूर करीत नाही. यामुळे शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ घेता येत नाही. एका नोंदीसाठी शेतकऱ्याला २ ते ५ हजार रुपयांची मागणी पटवारी व मंडळ अधिकारी करतात. यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. सदर तक्रार हेतुपुरस्पर व द्वेष भावनेतून केली आहे. मी कुणाकडूनही पैसे घेतले नाही. कोतवाल भरती पारदर्शक झाली आहे. कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे. - सीमा गजभिये, तहसीलदार, आष्टी.तहसीलदार आष्टी यांच्याबाबत कोतवाल भरती व धान्य पुरवठा गैरप्रकार प्रकरणी तक्रार अद्याप माझ्याकडे प्राप्त झाली नाही. सदर प्रकरण जिल्हाधिकारी यांच्याकडे येते. निवेदन आल्यानंतर चौकशी करण्याचा निर्णय होईल. - दीपक नलावडे, अप्पर जिल्हाधिकारी, वर्धा.