शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मिर्झापूर,भूमिहीनांचं एक गाव...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:00 IST

गावात पाण्याची मुबलकता आणि काळी कसदार शेती असल्याने रोजगारही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होता. प्रत्येक कुटुंबाकडे शेती असल्याने त्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच चालायचा. परंतु आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाकरिता हे गाव निम्न वर्धा प्रकल्पात बाधित झाले. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून गावकरी महामारीच्या संकटाशी दोन हात करीत आहे.

ठळक मुद्देसंचारबंदीत रोजगार हिरावला : पोटाची खळगी भरण्यासाठी ग्रामस्थांकडून मदतीची हाक

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी/देऊरवाडा : चारही भोवताल पाणी, नैसर्गीक सौदर्यानं नटलेलं, काळी कसदार जमिन असल्याने कधीकाळी सपन्न असललं आर्वी तालुक्यातील मिर्झापूर (नेरी) हे एक गावं. विकासाच्या ओघात अचानक भकास झालं. शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पात गेल्याने जमिनदारांच गावं आता भूमिहीनांच झालं. त्यातच कोरोनासारख्या महामारीच्या लॉकडाऊनमुळे रोजगारही हिरावल्या गेल्याने प्रत्येकांना भुकेची भ्रांत पडली आहे. त्यामुळे गावातील एकही व्यक्ती उपाशापोटी राहू नये यासाठी सामाजिक संस्थासह दानशुरांनी मदतीचा हात पुढे करण्यासाठी हाक दिली आहे.गावात पाण्याची मुबलकता आणि काळी कसदार शेती असल्याने रोजगारही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होता. प्रत्येक कुटुंबाकडे शेती असल्याने त्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच चालायचा. परंतु आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाकरिता हे गाव निम्न वर्धा प्रकल्पात बाधित झाले. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून गावकरी महामारीच्या संकटाशी दोन हात करीत आहे. कधी दुष्काळाच्या स्वरुपात तर कधी बेरोजगारीच्या. अत्यावश्यक सोयी सुविधांपासून हे गाव कोसो दूर असल्याने येथील तरुणपिढीही उच्च शिक्षणापासून वंचित आहे.मिर्झापूर (नेरी) हे गाव भूमिहीन झाले असून सध्या १५५ परिवार या गावात वास्तव्यास आहे. या सर्वांच्या जमिनी अल्प मोबदल्यात सिंचनाकरिता घेण्यात आल्याने सर्वच ग्रामस्थ आज बेघर व भूमिहीन झाले आहे. दहा वर्षानंतर आता काही लोक स्वत: चा निवारा उभारण्यात यशस्वी झालेले आहेत. येथील बहूतांश ग्रामस्थांची हातावर आणून पाणावर खाने, अशीच अवस्था आहे. ग्रामस्थांनी मोलमजुरी करुन उन्हाळ्याची सोय म्हणून घरात किराणा व धान्य साठवून ठेवले होते. मात्र, लॉकडाऊनच्या काळात ते संपून गेले. स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळाले पण, ते शिजविण्यासाठी आवश्यक असलेला किराणा आणायचा कसा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजीपाला घेण्यासाठीही, अचानक वैद्यकीय उपचाराची गरज पडल्यास गाठीशी पैसे नाहीत. गावातील तरुण मंडळी जवळच्या प्लायवूड फॅक्टरीमध्ये कामाला होते.पण, महिन्याभरापासून फॅक्टरी बंद असल्याने तेही बेरोजगार झाले आहे. गावात काही वयोवृद्ध, निराधार मंडळी असून येत्या दिवसात काय होईल, याची चिंता सतावत आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना मदतीची प्रतीक्षा आहे.श्रमदानातून ग्रामपंचायत झाली ‘स्मार्ट’, दुष्काळग्रस्त भागात पाणी एटीएम सुरू करणारी पहिली ग्रामपंचायतनिम्न वर्धा प्रकल्पात गाव गेल्यानंतर दुष्काळी भागात या गावाचे पुनर्वसन करण्यात आले. गावकऱ्यांच्या एकोप्याने या गावात २०१७ मध्ये स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन झाली. गावकºयांनी बिनविरोध गावातील युवकांच्या हाती नेतृत्व दिले. सर्व गावकºयांच्या मदतीने आदर्श ग्रामपंचायत करण्याची वाट धरली. २०१८ मध्ये या गावाने गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात जिल्ह्यातून प्रथम पुरस्कार मिळविला. २०१९-२० मध्ये तालुका व जिल्ह्यातून स्मार्ट ग्राम हा पुरस्कारही पटकाविला. दुष्काळी परिस्थितीव मात करण्यासाठी गावकºयांनी श्रमदानातून पाणलोटाची कामेही केली. शाश्वत अशी पाणी व्यवस्था करुन जिल्ह्यातील पहिली वॉटर एटीएम असलेल्याचा बहूमान या ग्रामपंचयातीने मिळविला. सातत्याने पाठपुरावा व आंदोलन करुन नागरी सुविधा पूर्ण करण्यात सुद्धा काही प्रमाणात यश आले आहे.दुष्काळी भागात पुनर्वसन झाले तरीही गावकºयांची जिद्द आणि श्रमदानातून गावाचा विकास साधल्या गेला आहे. ९० टक्के ग्रामस्थ रोजंदारीवर जगणारे असल्याने या लॉकडाऊनच्या काळात मोठी अडचण निर्माण झाली आहे. सर्वांच्या श्रमदानातून आदर्श ग्राम झालेल्या या गावाला सध्या कोरोनाच्या महामारीतून सावरणे अश्यक्य होत आहे. आधीच प्रकल्पामुळे महामारीचा सामना सुरु असताना त्यात लॉकडाऊनने आणखी भर घातली आहे. ज्याप्रमाणे सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते व दानशुरांनी गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी साथ दिली. त्याचप्रमाणे ही उपासमारी थांबविण्यासाठी मदतीचा हात पुढे करावा.बाळा सोनटक्के, उपसरपंच, मिर्झापूर (नेरी)

टॅग्स :Socialसामाजिक