शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

रिक्त पदांवर मिनी मंत्रालयाचा डोलारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 00:39 IST

मिनी मंत्रालय, अर्थात जिल्हा परिषदेला हल्ली रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. वर्ग-एक आणि दोनची तब्बल ९० पदे रिक्त आहेत. परिणामी, कार्यरत कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा भार सोसावा लागत असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देवर्ग-१, २ ची तब्बल ९० पदे रिक्त : कामकाजाचा खोळंबा, नागरिकांची गैरसोय

सुहास घनोकार ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मिनी मंत्रालय, अर्थात जिल्हा परिषदेला हल्ली रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. वर्ग-एक आणि दोनची तब्बल ९० पदे रिक्त आहेत. परिणामी, कार्यरत कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा भार सोसावा लागत असल्याचे दिसून येते.ग्रामीण विकासाचा कणा म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते. अपुऱ्या अधिकारी, कर्मचारीवर्गामुळे हा कणाच सध्या डळमळीत झाला आहे. वर्ग-१ ची १५, तर वर्ग-२ ची ७५ पदे रिक्त आहेत. यामुळे सद्यस्थितीत कार्यरत अधिकाऱ्यांकडे एक-दोन नव्हे, तर तीन-तीन विभागांचा अतिरिक्त कार्यभार असून अधिकाºयांच्या टेबलवर दिवसेंदिवस फायलींचा ढीग वाढत असून कामांचा पुरता खेळखंडोबा होत आहे. रिक्त पदांचा अनुशेष आणि अतिरिक्त कार्यभारात फायली अडकून पडल्याने अधिकाऱ्यांना प्रसंगी लोकप्रतिनिधींच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग आणि बालकल्याण विभागाला कुणी वाली नसतानाच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) विवेक इलमे यांची शासनाने चंद्रपूर येथे बदली केली आहे. कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख आहे. मात्र, त्यांच्या जागेवर बदलीने नियुक्ती देण्यात आलेली नसल्यामुळे त्यांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आले नाही. पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे पद सेवनिवृत्तीमुळे तीन महिन्यांपासून रिक्त आहे. आष्टी व समुद्रपूर तालुक्यांना गटविकास अधिकारीच नाहीत. याशिवाय समुद्रपूर, कारंजा आणि आर्वी येथील सहायक गटविकास अधिकाऱ्यांची ३ पदे रिक्त आहेत. गटविकास अधिकारी (रोहयो), सहायक प्रकल्प अधिकारी (रोजगार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा) ही पदे मागील वर्षभरापासून रिती आहेत. याशिवाय सहा पदे १ ते २ वर्षांपासून रिक्त आहेत. बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची तब्बल ८ पदे रिक्त आहेत. वित्त विभागातील लेखा अधिकाºयांचे तीन महिन्यांपासून तर लघुसिंचन विभागात उपअभियंत्याचे पदही रिक्त आहे.ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. वाहणे यांचे निधन झाले. त्यामुळे २०१६ पासून हे पद रिक्त आहे. तर उपअभियंता देखभाल-दुरुस्ती यांचे पदही बदलीमुळे रिक्त आहे. तर कृषी विभागात जिल्हा कृषी अधिकारी- मोहीम आणि जिल्हा कृषी अधिकारी सामान्य) ही दोन्ही पदे अनुक्रमे तीन आणि दोन वर्षांपासून रिक्त आहेत. समाजकल्याण विभागात समाजकल्याण अधिकारी गट-अ यांचे पद तीन महिन्यांपासून रिक्त आहे. बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता यांचे दोन दिवसांपूर्वीच स्थानांतरण झाले. आरोग्य आणि पशुसंवर्धन विभागातही पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदेत पाणीपुरवठा, शिक्षण, बांधकाम, समाजकल्याण हे महत्त्वाचे विभाग आहेत. या विभागातही रिक्त पदांचा अनुशेष असल्याने अनेक महत्त्वाची कामे रखडलेली असून नागरिकांना याचा फटका बसतो.शिक्षण विभाग पांगळाप्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी श्री. कानवडे यांची निरंतर शिक्षण विभागात बदली झाली. सद्यस्थितीत श्री. पटवे यांच्याकडे या विभागाचा कार्यभार आहे. वर्धा आणि नागपूर येथील दोन्ही पदभार ते सांभाळत आहेत. उपशिक्षणाधिकाºयांचे पद तीन वर्षांपासून रिक्त असून सात तालुक्यांना गटशिक्षणाधिकारीच नाहीत. अधीक्षक गट-ब -शालेय पोषण आहार हे पददेखील रिक्त आहे. माध्यमिक शिक्षण विभागात शिक्षणाधिकारी आणि उपशिक्षणाधिकारी ही दोन्ही, तर निरंतर शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकाºयांचे अशी तीन पदे रिक्त आहेत. एकूणच रिक्त पदांमुळे हा विभाग पांगळा झाल्याची स्थिती आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद