शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

मिनी मंत्रालय भरणार गावांतील पथदिव्यांचे देयक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2021 05:00 IST

शासनाने राज्यातील ग्रामपंचायतींची मोठ्या प्रमाणावरील संख्या विचारात घेता प्रत्येक ग्रामपंचायतीस निधी वितरण करून विद्युत देयक वेळेत भरणा करणे, प्रलंबित देयकाचा आढावा घेणे आदी बाबी हाताळणे त्रासाचे व वेळेचा अपव्यय होणारे असल्याने जिल्हा परिषदेने त्यांना प्राप्त झालेला निधी संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना त्यांच्या ग्रामपंचायतीची संख्या व लोकसंख्या यांच्या प्रमाणात वर्ग करण्यात यावा. निधी वर्ग झाल्यानंतर त्यांनी या निधीतून सन २०२१-२२ या वर्षातील ग्रामपंचायतीच्या रस्त्यावरील दिवाबत्तीच्या चालू वीजदेयकाची रक्कम अदा करावी.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पथदिव्यांचे देयक थकल्याने ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये महावितरणकडून विद्युत पुरवठा खंडित करण्याचा सपाटा सुरू केला होता. त्यामुळे सरपंचांनी या कारवाई विरोधात आंदोलन करून विद्युत देयक शासनाने भरण्याची मागणी रेटून धरली होती. अखेर यासंदर्भात शासनाने आदेश पारित करून ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पथदिव्यांचे देयक भागविण्यासाठी शासनाकडून देण्यात येणारे अनुदान महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळास परस्पर अदा न करता ते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अदा करण्यास सांगितले आहे.जिल्ह्यातील आठही तालुक्यामध्ये ५२० ग्रामपंचायती असून, या ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये पथदिव्यांचे एक हजार  ५८२ कनेक्शन आहेत. यातील बहुतांश ग्रामपंचायतीकडे ३३.५२ कोटींची थकबाकी असल्याने महावितरणकडून कारवाईचा बडगा उगारला होता. जवळपास १२६ पथदिव्यांचे कनेक्शन कापले होते. त्यामुळे गावाचा परिसर अंधारात असल्याने सरपंच संघटनेने आक्रमक प्रवित्रा घेऊन आंदोलनाचे अस्त्र उगारले. लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन शासन दरबारी पूर्वीप्रमाणे जिल्हा परिषदेमार्फत विद्युत देयक भरण्याची मागणी लावून धरली. शासनाने राज्यातील ग्रामपंचायतींची मोठ्या प्रमाणावरील संख्या विचारात घेता प्रत्येक ग्रामपंचायतीस निधी वितरण करून विद्युत देयक वेळेत भरणा करणे, प्रलंबित देयकाचा आढावा घेणे आदी बाबी हाताळणे त्रासाचे व वेळेचा अपव्यय होणारे असल्याने जिल्हा परिषदेने त्यांना प्राप्त झालेला निधी संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना त्यांच्या ग्रामपंचायतीची संख्या व लोकसंख्या यांच्या प्रमाणात वर्ग करण्यात यावा. निधी वर्ग झाल्यानंतर त्यांनी या निधीतून सन २०२१-२२ या वर्षातील ग्रामपंचायतीच्या रस्त्यावरील दिवाबत्तीच्या चालू वीजदेयकाची रक्कम अदा करावी. ग्रामपंचायतींना हे अनुदान वितरित न करता पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामसेवकांकडून मासिक देयक प्राप्त करून ग्रामपंचायतीच्या चालू देयकाचा भरणा करावा, असे आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे या आदेशानुसार सध्या सन २०२१-२२ या चालू वर्षातील पथदिव्यांच्या देयकाचा मार्ग सुकर झाल्याचे दिसून येत आहे. आदेशामध्ये नमूद असल्याप्रमाणे याच वर्षीच्या देयकचा विचार करण्यात आला आहे. परंतु दरवर्षीच्या पथदिव्यांच्या देयकाचे काय? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत असल्याचे सरपंचांकडून सांगितले जात आहे.

ग्रामसेवक, सरपंच यांच्यावरही जबाबदारी-    ग्रामपंचायतींनी त्यांच्या हद्दीतील रस्त्यावरील दिवाबत्तीचे एक किंवा त्यापेक्षा अधिक कनेक्शन असल्यास त्यांचा स्वतंत्रपणे तपशील ठेवणे आवश्यक आहे. त्यात ग्रामपंचायतीचे नाव, लोकसंख्या, वीजग्राहक क्रमांक व नाव, एकूण दिव्यांची संख्या, त्यापैकी कमी व उच्च दाब दिव्यांची संख्या, कनेक्शन प्रकार, एकूण थकबाकी, थकबाकीपैकी शासकीय अनुदान किंवा वित्तीय आयोग तसेच ग्रामपंचायतीच्या निधीतून किती भरणा केला, भरणा केल्यावर शिल्लक थकबाकी, मागील व चालू वीज देयकाची आकारणी महावितरणकडून वापराच्या प्रमाणात केली का आदींचा विचार करून तपशील ठेवण्याची जबाबदारी ग्रामसेवक व सरपंचावर असणार आहेत.

गटविकास अधिकाऱ्यांवर वाढणार ताण-   ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दिवाबत्तीच्या विद्युत देयकाची रक्कम यापूर्वी परस्पर महावितरणकडे शासनाकडून वर्ग करण्यात येत होती. आता विद्युत देयकाची रक्कम अदा करण्यासाठी जिल्हा परिषद किंवा पंचायत समितींकडे अनुदान वर्ग करण्यात येत आहे. अनुदान ज्या प्रयोजनाकरिता मंजूर आहे, त्यासाठीच त्याचा वापर करण्यात यावा. शासनाने वितरित केलेले अनुदान व त्यांचा विनियोग याचा तपशील ठेवण्याची जबाबदारी गट विकास अधिकाऱ्यांवर असणार आहे. या अनुदानाचा ताळमेळ न लागल्यास त्याला गटविकास अधिकारी जबाबदार राहणार असल्याने त्यांच्यावरील ताण वाढला आहे.

ग्रामपंचायत क्षेत्रातील पथदिव्यांचे चालू वर्षातील देयक जिल्हा परिषदेमार्फत भरण्यासंदर्भात आदेश काढला आहे; परंतु त्याकरिता किती अनुदान मिळणार किंवा कोणत्या योजनेतून तो निधी खर्च करायचा आहे. याबाबत अद्यापही स्पष्ट मार्गदर्शन प्राप्त झाले नाही. शासनाच्या निर्देशानुसार सर्व कार्यवाही केली जाईल.डॉ. सचिन ओम्बासे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. वर्धा. 

ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचे देयक शासनाने भरावे या मागणीकरिता जिल्हाभरात सरपंच संघटनेने आंदोलन केले होते. जिल्हा परिषदेसमोर एक दिवस आंदोलन करून याकरिता लढा उभारला होता. अखेर शासनाने या आंदोलनाची दखल घेऊन आदेश पारित केल्याने मोठे यश मिळाले आहे.धमेंद्र राऊत, जिल्हाध्यक्ष,  सरपंच संघटना 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदelectricityवीज