शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

अरबोस ग्रुपने घातला शेतकºयांना लाखोंचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 23:19 IST

नोकरीच्या नावाखाली जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील शेकडो बेरोजगार तरुण-तरुणींना लाखों रुपयांनी अरबोज ग्रुपने गंडा घातल्याचा प्रकार एक महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता.

ठळक मुद्देकारवाईसाठी शेतकºयांचे पोलीस अधीक्षकांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नोकरीच्या नावाखाली जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील शेकडो बेरोजगार तरुण-तरुणींना लाखों रुपयांनी अरबोज ग्रुपने गंडा घातल्याचा प्रकार एक महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. त्यावेळी याची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली होती. परंतु, अद्याप काय कार्यवाही झाली हे गुलदस्त्यात असून आता सदर ग्रुपने चक्क समुद्रपूर तालुक्यातील काही शेतकºयांची खोटे आमिष देत लाखों रुपयांनी फसवणूक केल्याचे उजेडात आले आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी फसवणूक झालेल्या शेतकºयांची आहे.अरबोस ग्र्रुपच्या सदस्यांनी जिल्ह्यातील अनेक शेतकºयांना त्यांच्या शेतात अश्वगंधा हे उत्पन्न लावण्याचे आमिष देऊन त्यांच्याकडून अकरा महिन्याचा करार करून घेतला. इतकेच नव्हे तर सदर करार करताना शेतकºयांना ‘तुम्हाला लाखों रुपयांचा फायदा होईल’ असे सांगत ‘घेतल्या जाणाºया उत्पन्नाच्या कमीत कमी ३५ टक्के नफा तुम्हाला देऊ’ असेही सांगितले. शेकडो शेतकºयांनी अरबोस ग्रुपच्यावतीने देण्यात आलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेऊन यंदा शेतामध्ये कुठलेच पारंपारीक पीक घेतले नाही. तसेच सदर ग्रुपने करार केलेल्या शेतकºयांच्या शेतात कुठल्याच पिकांची लागवड केली नाही. त्यामुळे यंदाचा हंगामात शेतकºयांना आपल्या शेतजमीनी पडीक ठेवाव्या लागल्या. सदर प्रकारामुळे शेतकºयांवर आर्थिक संकट कोळसले असून त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे फसवणूक झालेल्या शेतकºयांचे म्हणणे आहे. याच ग्रुपने जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील शेकडो बेरोजगार तरुण-तरुणींना नोकरीच्या नावाखाली गंडा घातला असून सदर प्रकार लक्षात येताच फसवणूक झालेले तरुण-तरूणींनी शहर पोलीस ठाणे गाठून याची माहिती पोलिसांना त्यावेळी दिली होती. परंतु, अद्यापही या ग्रुपच्या अधिकाºयांवर कुठलीच प्रभावी कारवाई झाली नसल्याचे फसवणूक झालेल्यांचे म्हणणे आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी फसवणूक झालेल्या शेतकºयांसह तरुण-तरुणींची आहे.सांगितली आपबितीच्सदर प्रकरणी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन फसवणूक झालेल्या शेतकºयांनी गुरूवारी पोलीस अधीक्षकांना दिले. पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात आलेल्या निवेदनावर अमर चंद्रकांत पसारे, काशीनाथ गो. इटनकर, नितेश सातपुते, प्रमोद देहाकर, सुभाष नवघरे, प्रवीण मेश्राम, विजय नासरे या फसवणूक झालेल्या बेरोजगारांसह अतुल कोल्हे, वासूदेव कोल्हे, प्रमोद देशकर, समीर जुगनाके, रोशन सहस्त्रबुद्धे आदी फसवणूक झालेल्या शेतकºयांची स्वाक्षरी आहे.सदर प्रकरणी कार्यालयात तक्रार शेतकºयांनी दिली आहे. चौकशी करुन योग्य कारवाई करण्यात येईल.-निर्मलादेवी एस. पोलीस अधीक्षक,वर्धा