शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

अरबोस ग्रुपने घातला शेतकºयांना लाखोंचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 23:19 IST

नोकरीच्या नावाखाली जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील शेकडो बेरोजगार तरुण-तरुणींना लाखों रुपयांनी अरबोज ग्रुपने गंडा घातल्याचा प्रकार एक महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता.

ठळक मुद्देकारवाईसाठी शेतकºयांचे पोलीस अधीक्षकांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नोकरीच्या नावाखाली जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील शेकडो बेरोजगार तरुण-तरुणींना लाखों रुपयांनी अरबोज ग्रुपने गंडा घातल्याचा प्रकार एक महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. त्यावेळी याची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली होती. परंतु, अद्याप काय कार्यवाही झाली हे गुलदस्त्यात असून आता सदर ग्रुपने चक्क समुद्रपूर तालुक्यातील काही शेतकºयांची खोटे आमिष देत लाखों रुपयांनी फसवणूक केल्याचे उजेडात आले आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी फसवणूक झालेल्या शेतकºयांची आहे.अरबोस ग्र्रुपच्या सदस्यांनी जिल्ह्यातील अनेक शेतकºयांना त्यांच्या शेतात अश्वगंधा हे उत्पन्न लावण्याचे आमिष देऊन त्यांच्याकडून अकरा महिन्याचा करार करून घेतला. इतकेच नव्हे तर सदर करार करताना शेतकºयांना ‘तुम्हाला लाखों रुपयांचा फायदा होईल’ असे सांगत ‘घेतल्या जाणाºया उत्पन्नाच्या कमीत कमी ३५ टक्के नफा तुम्हाला देऊ’ असेही सांगितले. शेकडो शेतकºयांनी अरबोस ग्रुपच्यावतीने देण्यात आलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेऊन यंदा शेतामध्ये कुठलेच पारंपारीक पीक घेतले नाही. तसेच सदर ग्रुपने करार केलेल्या शेतकºयांच्या शेतात कुठल्याच पिकांची लागवड केली नाही. त्यामुळे यंदाचा हंगामात शेतकºयांना आपल्या शेतजमीनी पडीक ठेवाव्या लागल्या. सदर प्रकारामुळे शेतकºयांवर आर्थिक संकट कोळसले असून त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे फसवणूक झालेल्या शेतकºयांचे म्हणणे आहे. याच ग्रुपने जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील शेकडो बेरोजगार तरुण-तरुणींना नोकरीच्या नावाखाली गंडा घातला असून सदर प्रकार लक्षात येताच फसवणूक झालेले तरुण-तरूणींनी शहर पोलीस ठाणे गाठून याची माहिती पोलिसांना त्यावेळी दिली होती. परंतु, अद्यापही या ग्रुपच्या अधिकाºयांवर कुठलीच प्रभावी कारवाई झाली नसल्याचे फसवणूक झालेल्यांचे म्हणणे आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी फसवणूक झालेल्या शेतकºयांसह तरुण-तरुणींची आहे.सांगितली आपबितीच्सदर प्रकरणी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन फसवणूक झालेल्या शेतकºयांनी गुरूवारी पोलीस अधीक्षकांना दिले. पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात आलेल्या निवेदनावर अमर चंद्रकांत पसारे, काशीनाथ गो. इटनकर, नितेश सातपुते, प्रमोद देहाकर, सुभाष नवघरे, प्रवीण मेश्राम, विजय नासरे या फसवणूक झालेल्या बेरोजगारांसह अतुल कोल्हे, वासूदेव कोल्हे, प्रमोद देशकर, समीर जुगनाके, रोशन सहस्त्रबुद्धे आदी फसवणूक झालेल्या शेतकºयांची स्वाक्षरी आहे.सदर प्रकरणी कार्यालयात तक्रार शेतकºयांनी दिली आहे. चौकशी करुन योग्य कारवाई करण्यात येईल.-निर्मलादेवी एस. पोलीस अधीक्षक,वर्धा