शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

अरबोस ग्रुपने घातला शेतकºयांना लाखोंचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 23:19 IST

नोकरीच्या नावाखाली जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील शेकडो बेरोजगार तरुण-तरुणींना लाखों रुपयांनी अरबोज ग्रुपने गंडा घातल्याचा प्रकार एक महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता.

ठळक मुद्देकारवाईसाठी शेतकºयांचे पोलीस अधीक्षकांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नोकरीच्या नावाखाली जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील शेकडो बेरोजगार तरुण-तरुणींना लाखों रुपयांनी अरबोज ग्रुपने गंडा घातल्याचा प्रकार एक महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. त्यावेळी याची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली होती. परंतु, अद्याप काय कार्यवाही झाली हे गुलदस्त्यात असून आता सदर ग्रुपने चक्क समुद्रपूर तालुक्यातील काही शेतकºयांची खोटे आमिष देत लाखों रुपयांनी फसवणूक केल्याचे उजेडात आले आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी फसवणूक झालेल्या शेतकºयांची आहे.अरबोस ग्र्रुपच्या सदस्यांनी जिल्ह्यातील अनेक शेतकºयांना त्यांच्या शेतात अश्वगंधा हे उत्पन्न लावण्याचे आमिष देऊन त्यांच्याकडून अकरा महिन्याचा करार करून घेतला. इतकेच नव्हे तर सदर करार करताना शेतकºयांना ‘तुम्हाला लाखों रुपयांचा फायदा होईल’ असे सांगत ‘घेतल्या जाणाºया उत्पन्नाच्या कमीत कमी ३५ टक्के नफा तुम्हाला देऊ’ असेही सांगितले. शेकडो शेतकºयांनी अरबोस ग्रुपच्यावतीने देण्यात आलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेऊन यंदा शेतामध्ये कुठलेच पारंपारीक पीक घेतले नाही. तसेच सदर ग्रुपने करार केलेल्या शेतकºयांच्या शेतात कुठल्याच पिकांची लागवड केली नाही. त्यामुळे यंदाचा हंगामात शेतकºयांना आपल्या शेतजमीनी पडीक ठेवाव्या लागल्या. सदर प्रकारामुळे शेतकºयांवर आर्थिक संकट कोळसले असून त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे फसवणूक झालेल्या शेतकºयांचे म्हणणे आहे. याच ग्रुपने जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील शेकडो बेरोजगार तरुण-तरुणींना नोकरीच्या नावाखाली गंडा घातला असून सदर प्रकार लक्षात येताच फसवणूक झालेले तरुण-तरूणींनी शहर पोलीस ठाणे गाठून याची माहिती पोलिसांना त्यावेळी दिली होती. परंतु, अद्यापही या ग्रुपच्या अधिकाºयांवर कुठलीच प्रभावी कारवाई झाली नसल्याचे फसवणूक झालेल्यांचे म्हणणे आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी फसवणूक झालेल्या शेतकºयांसह तरुण-तरुणींची आहे.सांगितली आपबितीच्सदर प्रकरणी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन फसवणूक झालेल्या शेतकºयांनी गुरूवारी पोलीस अधीक्षकांना दिले. पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात आलेल्या निवेदनावर अमर चंद्रकांत पसारे, काशीनाथ गो. इटनकर, नितेश सातपुते, प्रमोद देहाकर, सुभाष नवघरे, प्रवीण मेश्राम, विजय नासरे या फसवणूक झालेल्या बेरोजगारांसह अतुल कोल्हे, वासूदेव कोल्हे, प्रमोद देशकर, समीर जुगनाके, रोशन सहस्त्रबुद्धे आदी फसवणूक झालेल्या शेतकºयांची स्वाक्षरी आहे.सदर प्रकरणी कार्यालयात तक्रार शेतकºयांनी दिली आहे. चौकशी करुन योग्य कारवाई करण्यात येईल.-निर्मलादेवी एस. पोलीस अधीक्षक,वर्धा