शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

जिल्ह्याच्या बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल

By admin | Updated: September 10, 2016 00:33 IST

सण, उत्सव म्हटला की नागरिकांच्या आनंदाला पारावार राहत नाही. त्यात गणेशोत्सवाचे राज्यात विशेष स्थान आहे.

प्रशांत हेलोंडे  वर्धासण, उत्सव म्हटला की नागरिकांच्या आनंदाला पारावार राहत नाही. त्यात गणेशोत्सवाचे राज्यात विशेष स्थान आहे. सर्वांचा आवडता बाप्पाच्या उत्सवाची वाट पाहत असतात. हरितालिका, गणेशोत्सव आणि गौरीच्या आवाहनासाठी मग, बाजारपेठाही त्याच पद्धतीने सजतात. वर्धा जिल्ह्यातील बाजारपेठाही सजल्या आणि त्याच प्रमाणात मोठी उलाढालही झाली. तीन ते चार दिवसांतच जिल्ह्यात तब्बल एक ते दीड कोटींच्या वर उलाढाल झाल्याची माहिती आहे. गणेशोत्सवाची तयारी भाविक उत्साहाने करतात. सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणपतीकरिताही मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. सुबक सजावट, रोषणाई करून बाप्पाला दहा दिवसांकरिता विराजमान केले जाते. दररोज पूजा, आरती होते. यासाठी लागणाऱ्या साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात असल्याचे बाजारात फेरफटका मारला असता दिसून येते. सार्वजनिक व घरगुती गणेशाच्या आगमनापूर्वी सजावटीवर विशेष भर दिला जातो. यासाठी बाजारात थर्माकोलची मंदिरे, विविध रंगांचे प्लास्टीकचे सजावट साहित्य, रोषणाईसाठी विविध प्रकारच्या सिरीज यासह अन्य सुशोभिकरणाचे साहित्यही बाजारात उपलब्ध आहे. जिल्ह्यात २५ लाख रुपयांचे सजावटीचे साहित्य विक्रीस आले होते. यातील १० लाखांपेक्षा अधिक साहित्याची विक्री झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.पूजेमध्ये नारळाला विशेष महत्त्व असते. गणेश मूर्ती स्थापनेपूर्वी कलशाची स्थापना केली जाते. यासाठी नारळ लागतात. शिवाय हरितालिका व गौरी पूजनातही नारळाला विशेष मान असतो. ही बाब लक्षात घेऊनच वर्धा जिल्ह्यात दोन कोटी रुपयांचे तब्बल २० लाख नारळ मागविण्यात आले होते. दोन ते तीन दिवसांतच पाच लाखांवर नारळांची विक्री झाली. यातून बाजारपेठेत ८० लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. गणेश विसर्जन आणि गौरी पूजनाचा शनिवार हा दिवस शिल्लक आहे. या दिवसांतही मोठी उलाढाल होण्याची शक्यता ठोक व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात आली आहे. पूजेसाठी लागणाऱ्या धुप, दीप, अगरबत्ती आदी साहित्याचीही मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे पाहावयास मिळते. जिल्ह्यात सुमारे १० लाख रुपयांच्या विविध कंपनीच्या अगरबत्ती, धुपबत्तीचा माल मागविण्यात आल्याचे ठोक व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. यातील अर्ध्याधिक मालाची विक्री झाल्याची माहितीही देण्यात आली. एकूण गणेशोत्सवाची धूम जिल्ह्यात जोरात आहे. सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात सजावट साहित्य, पूजेचे साहित्य आणि फुलांच्या बाजारामध्ये किमान एक ते दीड कोटी रुपयांची उलाढाल झाली. फुलांचीच बाजारपेठ पाच कोटींच्या घरातगणेश चतुर्थीपासून गुरूवारपर्यंत जिल्ह्यात तब्बल १५० क्विंटल झेंडू, ३५ क्विंटल शेवंती व १० क्विंटल अन्य फुले असा माल आला. या फुलांची किंमत पाहिल्यास ठोकचा विचार केल्यासही तो दोन कोटींच्या घरात जातो. यानंतर महालक्ष्मी पूजनाकरिता जिल्ह्यात फुलांची वेगळी आवक झाली आहे. यात ५०० क्विंटल झेंडू, १५० क्विंटल शेवंती आणि ६० क्विंटल इतर फुले असा माल आला आहे. हा संपूर्ण माल नागपूर येथील बाजारपेठेतून आलेला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून बाजारात आणलेल्या फुलांचा यात समावेश नाही. जिल्ह्यातील केवळ फुलांच्या बाजारपेठेचा विचार केल्यास गत पाच दिवसांच्या काळात चार ते पाच कोटी रुपयांची उलाढाल झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. फुलांच्या बाजारात सर्वाधिक तेजी, मागणी वाढलीयंदा प्रत्येक प्रकारच्या फुलांचे भाव वधारलेले आहे. वर्धा जिल्ह्यात नागपूर, बंगलोर, मंगलोर येथील बाजारपेठांसह जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा फुलांचा माल येतो. यामुळे फुलांच्या माध्यमातून होणारी नेमकी उलाढाल माहिती होत नाही. असे असले तरी नागपूर येथील बाजार भावानुसार फुलांच्या माध्यमातून होणारी उलाढाल सर्वाधिक असल्याचेच दिसते. जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये झेंडू, पांढरी फुले आणि गुलाबाची फुले सर्वाधिक आणली जातात. यात झेंडूची फुले ५० ते ६० रुपये किलो, पांढरी फुले २०० ते ३०० रुपये किलो आणि गुलाब ५०० ते ६०० रुपये किलो प्रमाणे ठोकमध्ये विकले गेले. ही फुले आणि त्यापासून तयार हारांची किंमत जिल्ह्यातील बाजारपेठेमध्ये अधिक होते. गणेशोत्सव, गौरी पूजन हे महत्त्वाचे सण असल्याने एरवी २० ते ५० रुपयांमध्ये मिळणारे हार १०० ते २०० रुपयांवर पोहोचले आहे. यातही विविध प्रकारचे गजरे व अन्य सजावटींच्या गुच्छांचे भावही वाढले आहेत.